ETV Bharat / state

हिंगोलीत दोन गटात राडा : कावड यात्रा शांततेत काढण्याचे खासदार पाटलांचे आवाहन

या घटनेवरून परिस्थिती नियंत्रणात असली तरी दिवसभर हिंगोली शहरात वातावरण तापलेले आहे. तर पोलीस कर्मचारी दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व दुकानेही बंद ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

author img

By

Published : Aug 12, 2019, 1:23 PM IST

खासदार हेमंत पाटील

हिंगोली - हिंगोली विधानसभा मतदारसंघातील चिंचोली निळोबा येथे आज कावड यात्रा निघाली होती. यावेळी ही यात्रा इदगाह मैदानाजवळ आल्यानंतर काही जणांनी वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये 25 ते 30 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिस्थिती पाहता पोलीस प्रशानाने कावड स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खासदार हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शांततेत कावड नेण्याचे आवाहन केले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने परवानगी दिली असून पोलीस बंदोबस्तामध्ये कावड कलमनुरीकडे रवाना केली आहे.

कावड शांततेत काढण्याचे खासदार पाटलांचे आवाहन

हिंगोलीतील कयाधू नदी तीरावरील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर येथून दरवर्षी कावड यात्रा काढली जाते. यावर्षीही कळमनुरीकडे कावड रवाना असताना इदगाह मैदानावरजवळ दोन गटामध्ये राडा झाला. त्यामुळे पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत त्यांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज केला. यामध्ये राड्यामध्ये 10 ते 15 जण जखमी झाले आहेत. जवळपास 18 ट्रकने ही कावड कळमनुरीकडे रवाना होत होती. त्यावेळी ही घटना घडली.

खासदार हेमंत पाटील यांनी पोलीस प्रशासनाला आम्ही कावड शांततेत नेणार असल्याचे सांगितले. शिवाय जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी देखील कावड शांततेत नेणार असल्याचे सांगितले. त्यावरून कावडीत सहभागी झालेल्या युवकांना जिल्हाप्रमुख बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांनी शांततेचे आवाहन केले. त्यानंतर पोलीस संरक्षणात कावड कळमनुरीमार्गे रवाना झाली.

हिंगोली - हिंगोली विधानसभा मतदारसंघातील चिंचोली निळोबा येथे आज कावड यात्रा निघाली होती. यावेळी ही यात्रा इदगाह मैदानाजवळ आल्यानंतर काही जणांनी वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये 25 ते 30 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिस्थिती पाहता पोलीस प्रशानाने कावड स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खासदार हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शांततेत कावड नेण्याचे आवाहन केले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने परवानगी दिली असून पोलीस बंदोबस्तामध्ये कावड कलमनुरीकडे रवाना केली आहे.

कावड शांततेत काढण्याचे खासदार पाटलांचे आवाहन

हिंगोलीतील कयाधू नदी तीरावरील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर येथून दरवर्षी कावड यात्रा काढली जाते. यावर्षीही कळमनुरीकडे कावड रवाना असताना इदगाह मैदानावरजवळ दोन गटामध्ये राडा झाला. त्यामुळे पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत त्यांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज केला. यामध्ये राड्यामध्ये 10 ते 15 जण जखमी झाले आहेत. जवळपास 18 ट्रकने ही कावड कळमनुरीकडे रवाना होत होती. त्यावेळी ही घटना घडली.

खासदार हेमंत पाटील यांनी पोलीस प्रशासनाला आम्ही कावड शांततेत नेणार असल्याचे सांगितले. शिवाय जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी देखील कावड शांततेत नेणार असल्याचे सांगितले. त्यावरून कावडीत सहभागी झालेल्या युवकांना जिल्हाप्रमुख बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांनी शांततेचे आवाहन केले. त्यानंतर पोलीस संरक्षणात कावड कळमनुरीमार्गे रवाना झाली.

Intro:हिंगोली येथील कयाधू नदी तीरावरील ओम कयादु अमृतधारा महादेव मंदिर येथून दरवर्षीच कावड यात्रा काढली जाते तर या वर्षी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील चिंचोली निळोबा येथे कावड यात्रा निघाली होती तर इतका मैदानाजवळ कावड यात्रा गेल्यानंतर अचानक काही वाहनावर मुस्लिम बांधवाकडुन दगडफेक करण्यात आली. यामध्ये 25 ते 30 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिस्थिती पाहता पोलीस प्रशानाने कावड स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र खा. हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शांततेत कावड नेण्याचे आव्हान केले. त्या मुळे पोलीस प्रशासनाने परवानगी दिली. अन पोलीस बंदोबस्तात कावड कलमनुरी कडे रवाना केली.


Body:हिंगोली येथून कळमनुरीकडे कावड रवाना होता, तर इदगा मैदानावर नमाज अदा करताना कावड घेऊन जाणाऱ्या वाहनावर दगड फेक झाली. त्या मुळे हिंदू मुस्लिम दंगल झाली. त्यामुळे पोलीस प्राशन घटनास्थळी दाखल झाले अन शहरात लाठीचार्ज करण्यास सुरुवात झाली. हिंदू मुस्लिम दंगल मध्ये दगड फेक झाल्याने 10 ते 15 जण जखमी झालेत. हा वाद एवढा विकोपाला गेलाय की, दोन्ही गट आमने सामने आले होते. पोलीसांची फोर्स दाखल झाल्याने, एकच गोंधळ उडाला. कावड साठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने युवक वर्ग दाखल झाला होता. जवळपास 18 ट्रक ने ही कावड कळमनुरी कडे रवाना होत होती. काही ट्रक समोर गेले होते. मात्र चार ते पॅसिग ट्रक माघे राहिले होते, अन अचानक गोंधळ वाढला. मात्र नमाज अदा सुरू असताना त्याठिकाणी संरक्षणासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी हे ट्रक समोर जाऊच दिले कसे हाही एक प्रश्नच आहे. यदाकदाचित काही वेळासाठी कावडीचे ट्रक हे थांबवले असते तर हे वादंग झाले नसते.


Conclusion:खासदार हेमंत पाटील यांनी पोलिस प्रशासनाला आम्ही कावड शांततेत येणार असल्याचे सांगितले शिवाय जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी देखील कावड शांततेत येणार असल्याचे सांगितले त्यावरून कावडीत सहभागी झालेल्या युवकांना जिल्हाप्रमुख बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांनी शांततेचे आवाहन केले तेव्हा कुठे पोलिस संरक्षणात कावड कळमनुरी मार्गे रवाना झाली. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरीही दिवसभर हिंगोली शहरात वातावरण तापलेले होते. तर पोलीस कर्मचारी दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत शहरभर फिरत होते. नांदेड नाका परिसरात नुकसान झालेल्या गाड्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पडलेल्या दिसून येत आहेत. हिंगोली शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तर शहरातील सर्व दुकानेही बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशादनाने
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.