ETV Bharat / state

हिंगोलीकर दंड भरण्यात सरस! वर्षभरात वाहतूक शाखेने वसूल केला 80 लाखांचा दंड - हिंगोली वाहतूक विभाग न्यूज

हिंगोली वाहतूक शाखेने मागील वर्षभरात 30 हजार 338 वाहनांवर कारवाया करून 80 लाख रुपये दंड वसूल केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेल्या ई चालान मशीन, बॉडी कॅमेरे, वाहन कॅमेरे, अत्याधुनिक वाहन, टोईंग व्हॅनच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

हिंगोलीकर दंड भरण्यात सरस
हिंगोलीकर दंड भरण्यात सरस
author img

By

Published : Jan 10, 2020, 8:12 AM IST

हिंगोली - वाहतूक शाखेने वर्षभरात 80 लाख रुपये दंड वसूल केला आहे. 30 हजार 338 वाहनांवर कारवाया केल्या असून, जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करत आहेत. त्यामुळे वाहन चालक आपली वाहने सोडवून घेण्यासाठी वाहतूक शाखेत धाव घेत असल्याचे चित्र दिसते आहे.

हिंगोलीकर दंड भरण्यात सरस


शहरात नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी हिंगोलीत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. येथील वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम वाहन धारकांना कळावेत यासाठी जनजागृती केली. यासाठी रस्ता सुरक्षा अभियान काटेकोरपणे राबवले. मात्र, ज्या बेशिस्त वाहन चालकांनी याला दाद दिली नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

हेही वाचा - दप्तरातील वस्तूबद्दल विचारणा करत शिक्षकाची विद्यार्थीनीला बेदम मारहाण

पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू केली. सहायक पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा धडाका लावला. पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेल्या ई चालान मशीन, बॉडी कॅमेरे, वाहन कॅमेरे, अत्याधुनिक वाहन, टोईंग व्हॅनच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. या माध्यमातून वाहन चालकांकडून दंडात्मक रक्कम वसूल केली. यातून 80 लाख रुपये दंड जमा झाला आहे.


वाहन चालकांना चांगली शिस्त लागून अपघाताचे प्रमाणात कमी व्हावे, हा या कारवायांमागे उद्देश आहे, असे चिंचोळकर यांनी सांगितले. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हिंगोली - वाहतूक शाखेने वर्षभरात 80 लाख रुपये दंड वसूल केला आहे. 30 हजार 338 वाहनांवर कारवाया केल्या असून, जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करत आहेत. त्यामुळे वाहन चालक आपली वाहने सोडवून घेण्यासाठी वाहतूक शाखेत धाव घेत असल्याचे चित्र दिसते आहे.

हिंगोलीकर दंड भरण्यात सरस


शहरात नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी हिंगोलीत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. येथील वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम वाहन धारकांना कळावेत यासाठी जनजागृती केली. यासाठी रस्ता सुरक्षा अभियान काटेकोरपणे राबवले. मात्र, ज्या बेशिस्त वाहन चालकांनी याला दाद दिली नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

हेही वाचा - दप्तरातील वस्तूबद्दल विचारणा करत शिक्षकाची विद्यार्थीनीला बेदम मारहाण

पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू केली. सहायक पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा धडाका लावला. पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेल्या ई चालान मशीन, बॉडी कॅमेरे, वाहन कॅमेरे, अत्याधुनिक वाहन, टोईंग व्हॅनच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. या माध्यमातून वाहन चालकांकडून दंडात्मक रक्कम वसूल केली. यातून 80 लाख रुपये दंड जमा झाला आहे.


वाहन चालकांना चांगली शिस्त लागून अपघाताचे प्रमाणात कमी व्हावे, हा या कारवायांमागे उद्देश आहे, असे चिंचोळकर यांनी सांगितले. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Intro:
हिंगोली- वाहतूक शाखेत रुजू झालेले सपोनि ओमकांत चिंचोळकर यांनी हिंगोली कराना वाहतुकीच्या बाबतीत वेळोवेळी दंड लावल्याने चांगलेच वठणीवर आणलंय. एवढेच नव्हे तर यातून दंड ही मिळवून दिलाय, तो बी कमी नाही तर वर्षभरात 80 लाख रुपये. 30 हजार 338 कारवाई केल्या असून, आजूनही वाहतुकीला शिस्त लावण्याचाच प्रयत्न त्यांच्याकडून सुरूच आहे. त्यामुळे रोजच वाहन चालक आपली वाहने सोडून घेण्यासाठी वाहतूक शाखेत धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.



Body:हिंगोली येथील वाहतूक शाखेने वाहतुक शाखेचे नियम वाहन धारकांना कळावेत यासाठी वर्षभर जनजागृती केली. या मध्ये रस्ता सुरक्षा या महत्वपूर्ण कार्यक्रमातुन वाहन चालकांना खुप वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मुजोर वाहन चालकांवर याचा काहीच परिणाम झालेला नसल्याने, आशा वाहन चालकावर पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चिंचोळकर यांनी कारवाई करण्याचा सपाटा लावला. यातून कायद्याच्या पुढे सर्व एक समान ही भूमिका निभावण्यास सुरुवात केलीय. अन त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल केलीय. विशेष म्हणजे वाहतूक शाखेने पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेल्या ई चालान मशीन, बॉडी कॅमेरे, वाहन कॅमेरे, अत्याधुनिक वाहन, टोईंग व्हॅन च्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आलीय. अजूनही शिस्त लावण्याचेच प्रयत्न सुरू आहेत. आता शहरात नगर पालिकेच्या वतीने दोन ठिकाणी मोफत वाहन तळ उभारून दिलेले असले तरी रस्त्यावर दुचाकी लावण्याची वाईट सवय गेलेली नाही. त्यामुळे अशा वाहन चालकांना टोईंग द्वारे जाग्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाहन चालकांना चांगली शिस्त लागून अपघाताचे प्रमाणात कमी होतील हाच एक मेवा उद्देश असल्याचे पोनि चिंचोळकर यांनी सांगत वाहन चालकांनी चांगली सवय लावण्याचे आव्हानही त्यांनी केले आहे.

Conclusion:*अशी आहे वर्षभरातील दंडात्मक रक्कम*

मोटार वाहन कायद्यांतर्गत 29 हजार 167 केसेस यातून 68 लाख 1 हजार रुपये दंड

अवैध प्रवास वाहतूक 562 केसेस

ड्रिंक अँड ड्राईव्ह 71 केसेस, भादवी 283 कलम नुसार 200


भादवी 279 नुसार 65

मकोपा केसेस 102/117 नुसार 55 केसेस

लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात आचारसंहिता भंगच्या 30 केसेस

भादवी 379 नुसार 3 केसेस

बिना नंबर प्लेर, फॅन्सी नंबर प्लेट 240 केसेस

चोरीची वाहन जप्त 2

कलम 66/192 नुसार 562 केसेस दाखल करून दोन लाख दराप्रमाणे 11 लाख 24 हजार रुपये दंड न्यायालयात भरलाय.

आशा एकूण वर्षभरात 30 हजार 388 केसेस केल्या असून 79 लाख 25 हजार रुपयांचा दंड वसूल केलाय.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.