ETV Bharat / state

केरळच्या मजुरांसाठी धावले हिंगोलीकर; अखेर कामगार गावी रवाना - हिंगोली मजूर बातमी

गेल्या पाच ते सहा महिन्यापासून कंपनीच्या कामानिमित्त काही कामगार जिल्ह्यात दाखल झाले होते. मात्र, महामारीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू झाल्याने हे कामगार अडकले. त्यांच्याजवळ असलेली शिदोरी संपल्याने आता स्थानिकांनी मदतीचा हात पुढे केलाय.

labours in hingoli
केरळच्या मजूरांसाठी धावले हिंगोलीकर; अखेर कामगार गावी रवाना
author img

By

Published : May 16, 2020, 4:38 PM IST

हिंगोली - गेल्या पाच ते सहा महिन्यापासून कंपनीच्या कामानिमित्त काही कामगार जिल्ह्यात दाखल झाले होते. मात्र, महामारीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू झाल्याने हे कामगार अडकले. त्यांच्याजवळ असलेली शिदोरी संपल्याने आता स्थानिकांनी मदतीचा हात पुढे केलाय. या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच तपासणी करून त्यांची दोन बसमार्फत केरळला रवाना करण्यात आले. या पुढाकारामुळे परप्रांतीयांनी हिंगोलीकरांचे अन् प्रशासनाचे आभार मानले.

केरळच्या मजूरांसाठी धावले हिंगोलीकर
कोरोनामुळे सर्वच व्यवसायांना फटका बसला आहे. हिंगोली येथे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून केरळमधील काही कामगार कंपनीच्या कामासाठी दाखल झाले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जवळपास ३००-३५० कामगारांना अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांना हात दिला. या मजूरांच्या राहण्याची आणि अन्नाची सोय करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला. अखेर त्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करून केरळ राज्य प्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर महाराष्ट्रात दोन बस दाखल झाल्याची माहिती त्यांना मिळाली. अखेर केरळ प्रकाशनाशी संपर्क साधून कामगारांना रवाना करण्यात आले.

याआधी देखील कामगारांनी अनेकदा माघारी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,त्यांना नांदेडपासून परत हिंगोलीकडे पाठवण्यात आले होते. यानंतर त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था गायत्री शक्तिपीठ येथे करण्यात आली. यानंतर आज सर्व कामगारांची तपासणी करून त्यांना गावी रवाना करण्यात आले.

यासाठी समाजसेवक दिलीप बांगर तसेच अजय कुमार वासुदेवन यांनी पुढाकार घेऊन कामगारांना आवश्यक मदत पुरवली. मजूरांनी रवाना होताना या समाजसेवकांसह हिंगोली प्रशासनाचे आभार मानले.

हिंगोली - गेल्या पाच ते सहा महिन्यापासून कंपनीच्या कामानिमित्त काही कामगार जिल्ह्यात दाखल झाले होते. मात्र, महामारीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू झाल्याने हे कामगार अडकले. त्यांच्याजवळ असलेली शिदोरी संपल्याने आता स्थानिकांनी मदतीचा हात पुढे केलाय. या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच तपासणी करून त्यांची दोन बसमार्फत केरळला रवाना करण्यात आले. या पुढाकारामुळे परप्रांतीयांनी हिंगोलीकरांचे अन् प्रशासनाचे आभार मानले.

केरळच्या मजूरांसाठी धावले हिंगोलीकर
कोरोनामुळे सर्वच व्यवसायांना फटका बसला आहे. हिंगोली येथे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून केरळमधील काही कामगार कंपनीच्या कामासाठी दाखल झाले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जवळपास ३००-३५० कामगारांना अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांना हात दिला. या मजूरांच्या राहण्याची आणि अन्नाची सोय करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला. अखेर त्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करून केरळ राज्य प्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर महाराष्ट्रात दोन बस दाखल झाल्याची माहिती त्यांना मिळाली. अखेर केरळ प्रकाशनाशी संपर्क साधून कामगारांना रवाना करण्यात आले.

याआधी देखील कामगारांनी अनेकदा माघारी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,त्यांना नांदेडपासून परत हिंगोलीकडे पाठवण्यात आले होते. यानंतर त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था गायत्री शक्तिपीठ येथे करण्यात आली. यानंतर आज सर्व कामगारांची तपासणी करून त्यांना गावी रवाना करण्यात आले.

यासाठी समाजसेवक दिलीप बांगर तसेच अजय कुमार वासुदेवन यांनी पुढाकार घेऊन कामगारांना आवश्यक मदत पुरवली. मजूरांनी रवाना होताना या समाजसेवकांसह हिंगोली प्रशासनाचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.