ETV Bharat / state

हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी; रब्बीचे नुकसान

author img

By

Published : Jan 2, 2020, 9:54 AM IST

जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांच्या आजारात वाढ होत आहे. सोबतच गहू, हरभरा, ज्वारी, तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

heavy Rain in Hingoli
हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी

हिंगोली - जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री पाऊस झाला. शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे रब्बीचे नुकसान झाले आहे.

हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी

हेही वाचा - कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया; गडचिरोलीत महिलेच्या अन्ननलिकेला इजा

जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांच्या आजारात वाढ होत आहे. सोबतच गहू, हरभरा, ज्वारी, तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पावसामुळे गव्हावर तांबेरा तर हरभऱ्यावर अळीचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान होत आहे.

हेही वाचा - हिंगोलीत 'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह'चा 14 जणांवर गुन्हा दाखल

पहाटे हजेरी लावलेल्या पावसाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांची पावसामुळे एकच धांदल उडाली.

हिंगोली - जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री पाऊस झाला. शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे रब्बीचे नुकसान झाले आहे.

हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी

हेही वाचा - कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया; गडचिरोलीत महिलेच्या अन्ननलिकेला इजा

जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांच्या आजारात वाढ होत आहे. सोबतच गहू, हरभरा, ज्वारी, तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पावसामुळे गव्हावर तांबेरा तर हरभऱ्यावर अळीचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान होत आहे.

हेही वाचा - हिंगोलीत 'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह'चा 14 जणांवर गुन्हा दाखल

पहाटे हजेरी लावलेल्या पावसाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांची पावसामुळे एकच धांदल उडाली.

Intro:


हिंगोली- तस पहिला तर हिवाळा हा अतिशय आनंदी असतो, थंडी घालवण्यासाठी जिकडे तिकडे शकोट्या पेटवून बोचरी थंडी घालावण्याचा प्रयत्न करतात. मात्र दोन दिवसांपासून अधून - मधून पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांना उबदार कपडे घालावे की छत्री घ्यावी हेच समजेनासे झालेय. मुख्य म्हणजे या मुसळधार पावसामुळे रबीचे नुकसान ही होत आहे.




'Body:घडीत पडतेय श्रावण धारा, घडीत बाई ऊन पडे, वुई श्रावण महिन्यात. दादा कोंडकेच्या या गीता प्रमाणे दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा अनुभव येतोय. जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने, आजारात तर वाढ होत आहे. सोबतच गहू, हरभरा, ज्वारी, टाळकी, तूरीचे अतोनात नुकसान होत आहे. या पावसामुळे गव्हावर तांबाऱ्या तर हरभऱ्यावर अळीचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला वर्गीय पिकांचे नुकसान होत आहे. Conclusion:पहाटे पहाटे हजेरी लावलेल्या पावसाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मॉर्निंगवाक साठी गेलेले नागरिक मात्र पावसापासून बचाव करण्यासाठी धाव घेत होते. एकंदरीतच हिवाळ्यात पाऊस हजेरी लावत असल्याने, नागरिकांची मात्र चांगलीच गैरसोय होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही वेळासाठी हिवाळा की पावसाळा हे कळायला मार्ग नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.