ETV Bharat / state

हिंगोली : हळदीच्या मोंढ्यात शेतकऱ्यांनी थांबवली हळदीची विक्री

author img

By

Published : Jan 4, 2020, 2:41 PM IST

हळदीच्या मोंढ्यात व्यापारी हळदीची हराशी एका ठिकाणी अन काटा दुसऱ्या ठिकाणी करत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळदीची विक्री थांबवली. काटा आणि हराशी जोपर्यंत एकत्र होत नाही तोपर्यंत विक्री होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

हळदीचे छायाचित्र
हळदीचे छायाचित्र

हिंगोली - येथील हळदीच्या मोंढ्यात व्यापारी हळदीची हराशी एका ठिकाणी अन काटा दुसऱ्या ठिकाणी करत आहेत. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी हळदीची विक्री थांबवून काटे ही थांबवले आहेत. त्यामुळे काही काळ हिंगोली येथील हळदीच्या मोंढ्यात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते.

हळदीच्या मोंढ्यात शेतकऱ्यांनी थांबवली हळदीची विक्री

हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीला चांगला भाव मिळतो त्याची रक्कमही वेळेत शेतकऱ्यांच्या हातात मिळत असल्याने, हे केंद्र सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, येथे आल्यानंतर या कृषिउत्पन्न बाजार समितीचे खरे रूप समोर येते. या ठिकाणी 20 ते 25 हजार हळदीच्या पोते उतरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे येथे कितीही पोते घेऊन आलेला शेतकरी परत माल वापस घेऊन जात नाही. मात्र, या ठिकाणी शेतकऱ्यांची डोके दुखी ठरते ती एका शेडमध्ये हराशी अन दुसऱ्या शेडमध्ये काटा. हा भुर्दंड शेतकऱ्यावर लादला जात आहे. काहीवेळा शेतकरी एकटा असला तर त्याचा मालही लंपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल घेत ज्या ठिकाणी हराशी केली जाते त्याच ठिकाणी काटा करण्याच्या मागणी केली.

हेही वाचा - धुक्यात हरवली हिंगोली, पिकांचे नुकसान


तर शेतकऱ्यांची मागणी व्यापाऱ्यांनी मान्य न केल्याने शेतकऱ्यांनी हळदीचा काटा बंद पाडला. तर शेतकरी संतप्त होत असल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्यांनी तेथून पळ काढला. शेतकऱ्यांनी उशिरापर्यंत काटे सुरू करू दिले नाहीत. एवढेच नव्हे तर हिंगोली येथील हळदीच्या व्यापाऱ्यांच्या थप्प्या अनेक दिवसांपासून पडून राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल उघड्यावर टाकण्याची वेळ येते . जोपर्यंत व्यापाऱ्यांचा माल उचलला जाणार नाही तोपर्यंत आम्ही देखील माल जागचा हलू देणार नसल्याचे शेतकरी माणिकराव भिंगिकर यांनी सांगितले. उशिरापर्यंत वाद सुरू होता. यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे हळद विक्रीसाठी आलेले शेतकरी ताटकळत बसले होते.

हेही वाचा - साहेब शाळेत खूप थंडी अन् पाऊस पण लागतोय ओ..!

हिंगोली - येथील हळदीच्या मोंढ्यात व्यापारी हळदीची हराशी एका ठिकाणी अन काटा दुसऱ्या ठिकाणी करत आहेत. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी हळदीची विक्री थांबवून काटे ही थांबवले आहेत. त्यामुळे काही काळ हिंगोली येथील हळदीच्या मोंढ्यात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते.

हळदीच्या मोंढ्यात शेतकऱ्यांनी थांबवली हळदीची विक्री

हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीला चांगला भाव मिळतो त्याची रक्कमही वेळेत शेतकऱ्यांच्या हातात मिळत असल्याने, हे केंद्र सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, येथे आल्यानंतर या कृषिउत्पन्न बाजार समितीचे खरे रूप समोर येते. या ठिकाणी 20 ते 25 हजार हळदीच्या पोते उतरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे येथे कितीही पोते घेऊन आलेला शेतकरी परत माल वापस घेऊन जात नाही. मात्र, या ठिकाणी शेतकऱ्यांची डोके दुखी ठरते ती एका शेडमध्ये हराशी अन दुसऱ्या शेडमध्ये काटा. हा भुर्दंड शेतकऱ्यावर लादला जात आहे. काहीवेळा शेतकरी एकटा असला तर त्याचा मालही लंपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल घेत ज्या ठिकाणी हराशी केली जाते त्याच ठिकाणी काटा करण्याच्या मागणी केली.

हेही वाचा - धुक्यात हरवली हिंगोली, पिकांचे नुकसान


तर शेतकऱ्यांची मागणी व्यापाऱ्यांनी मान्य न केल्याने शेतकऱ्यांनी हळदीचा काटा बंद पाडला. तर शेतकरी संतप्त होत असल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्यांनी तेथून पळ काढला. शेतकऱ्यांनी उशिरापर्यंत काटे सुरू करू दिले नाहीत. एवढेच नव्हे तर हिंगोली येथील हळदीच्या व्यापाऱ्यांच्या थप्प्या अनेक दिवसांपासून पडून राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल उघड्यावर टाकण्याची वेळ येते . जोपर्यंत व्यापाऱ्यांचा माल उचलला जाणार नाही तोपर्यंत आम्ही देखील माल जागचा हलू देणार नसल्याचे शेतकरी माणिकराव भिंगिकर यांनी सांगितले. उशिरापर्यंत वाद सुरू होता. यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे हळद विक्रीसाठी आलेले शेतकरी ताटकळत बसले होते.

हेही वाचा - साहेब शाळेत खूप थंडी अन् पाऊस पण लागतोय ओ..!

Intro:


हिंगोली- येथील हळदीच्या मोंढ्यात व्यापारी हळदीची हराशी एका ठिकाणी अन काटा दुसऱ्या ठिकाणी करत आहेत. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी हळदीची विक्री थांबाबून काटे ही थांबवले आहेत. त्यामुळे काही काळ हिंगोली येथील हळदीच्या मोंढ्यात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते.


Body:हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केट मध्ये हळदीला चांगला भाव अन वेळेतच शेतकऱ्यांच्या हातावर रक्कम मिळत असल्याने, हे केंद्र सर्व दूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र येथे आल्यानंतर या कृषिउत्पन्न बाजार समितीचे खरे रूप समोर येते. या ठिकाणी 20 ते 25 हजार हळदीच्या पोते उतरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे येथे कितीही पोते घेऊन आलेला शेतकरी परत माल वापस घेऊन जात नाही. मात्र या ठिकाणी डोके दुखी ठरतेय ती एका शेड मध्ये हराशी अन दुसऱ्या शेड मध्ये काटा. अन हा भुर्दंड शेतकऱ्यावर लादला जातोय. यामध्ये कधीकाळी जर एकटा शेतकरी असला तर त्याचा मालही लंपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच आज शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल घेत ज्या ठिकाणी हराशी केली त्याच ठिकाणी काटा करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिलेConclusion:. तर शेतकऱ्यांची मागणी व्यापाऱ्यांनी मान्य न केल्याने शेतकऱ्यांनी हळदीचा काटा बंद पाडला तर शेतकरी संतप्त होतात व्यापाऱ्यांनी ओढ्यातून पोबारा केला बराच वेळ हा वाद सुरू होता उशिरापर्यंत काटे सुरू करू दिले नाहीत. एवढेच नव्हे तर हिंगोली येथील हळदीच्या व्यापाऱ्यांच्या थप्प्या अनेक दिवसापासून पडून राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल उघड्यावर टाकण्याची वेळ येते . जोपर्यंत व्यापाऱ्यांचा माल उचलला जाणार नाही तोपर्यंत आम्ही देखील माल जागचा हलु देणार नसल्याचे शेतकरी माणिकराव भिंगिकर यांनी सांगितले. उशिरापर्यंत वाद सुरू होता. यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे हळद विक्रीसाठी आलेले शेतकरी ताटकळत बसले होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.