ETV Bharat / state

मुख्यमंत्री सभास्थळी पोहचले ३ तास उशीराने, काँग्रेसवर केली सडकून टीका

मुख्यमंत्र्याची सभा १२ वाजून ३० मिनिटांनी होणार होती. सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, बराच वेळ होऊन देखील मुख्यमंत्री सभेसाठी आले नाहीत.

author img

By

Published : Apr 13, 2019, 8:28 AM IST

हिंगोली सभा

हिंगोली - जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा होती. या सभेत मुख्यमंत्री सभास्थळी ३ तास उशिराने पोहोचले. उशिराने मुख्यमंत्री आल्याने आयोजकांवर खुर्च्या गुंडाळून ठेवण्याची वेळ आल्याचे चित्र पहायला मिळाले.

हिंगोली मुख्यंत्र्यांची जाहीर सभा

मुख्यमंत्र्याची सभा १२ वाजून ३० मिनिटांनी होणार होती. सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, बराच वेळ होऊन देखील मुख्यमंत्री सभेसाठी आले नाहीत. यामुळे तहानेने व भुकेने व्याकूळ झालेली जनता सभेतून निघून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर दिसले त्यावेळी मंडपात बसलेले होते ते जाग्यावरच बसून राहिले.

मुख्यमंत्री आल्यानंतर महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांचे भाषण झाले. नंतर मुख्यमंत्र्याच्या भाषणास सुरुवात झाली. त्यांनी काँगेसच्या '७२ हजार गरीबीवर वार' या घोषवाक्यावर टीका केली. अर्थमंत्री चिदंबरम यांना पत्रकाराने विचारले, तुम्ही जनतेला ७२ हजार कसे देणार, तिजोरीत आलेल्या रक्कमेतून जनतेला ७२ हजार देणार असल्याचे चिदंबरम यांनी सांगत त्यांची खिल्ली उडवली. अरे वारे वा या ठिकाणी मोदींनी काळ्या पैशावर आघात करायचा अन काळा पैसा तिजोरीत जमा करायचा, अन तो पैसा तुम्ही वाटायचा मग तुम्ही कशाला मोदी आहेत ना, काँग्रेस पक्षाला नीती नाही, धोरण नाही, नियम नाही, केवळ आश्वासने देण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर केली.

आतापर्यंत काँग्रेस सरकारने काहीही केले नाही. तसेच गांधी घराण्यातील राहुल गांधी यांच्या घराण्यातील सर्वांचीच नावे घेत त्यांनीही आतापर्यंत काहीच केले नाही. तसेच राहुल गांधी देखील स्वतः काही करू शकत नाहीत. त्यांचे भाषण म्हणजे मनोरंजन असल्याची टीका मुख्यंत्र्यांनी केली. आता येथून पुढे एखाद्या जाहिरातीप्रमाणे राहुल गांधी यांचे भाषण हे काल्पनिक आहे, याचा कशाशीही संबंध नाही, असे होणार आहे. सभेसाठी पालकमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.

हिंगोली - जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा होती. या सभेत मुख्यमंत्री सभास्थळी ३ तास उशिराने पोहोचले. उशिराने मुख्यमंत्री आल्याने आयोजकांवर खुर्च्या गुंडाळून ठेवण्याची वेळ आल्याचे चित्र पहायला मिळाले.

हिंगोली मुख्यंत्र्यांची जाहीर सभा

मुख्यमंत्र्याची सभा १२ वाजून ३० मिनिटांनी होणार होती. सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, बराच वेळ होऊन देखील मुख्यमंत्री सभेसाठी आले नाहीत. यामुळे तहानेने व भुकेने व्याकूळ झालेली जनता सभेतून निघून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर दिसले त्यावेळी मंडपात बसलेले होते ते जाग्यावरच बसून राहिले.

मुख्यमंत्री आल्यानंतर महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांचे भाषण झाले. नंतर मुख्यमंत्र्याच्या भाषणास सुरुवात झाली. त्यांनी काँगेसच्या '७२ हजार गरीबीवर वार' या घोषवाक्यावर टीका केली. अर्थमंत्री चिदंबरम यांना पत्रकाराने विचारले, तुम्ही जनतेला ७२ हजार कसे देणार, तिजोरीत आलेल्या रक्कमेतून जनतेला ७२ हजार देणार असल्याचे चिदंबरम यांनी सांगत त्यांची खिल्ली उडवली. अरे वारे वा या ठिकाणी मोदींनी काळ्या पैशावर आघात करायचा अन काळा पैसा तिजोरीत जमा करायचा, अन तो पैसा तुम्ही वाटायचा मग तुम्ही कशाला मोदी आहेत ना, काँग्रेस पक्षाला नीती नाही, धोरण नाही, नियम नाही, केवळ आश्वासने देण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर केली.

आतापर्यंत काँग्रेस सरकारने काहीही केले नाही. तसेच गांधी घराण्यातील राहुल गांधी यांच्या घराण्यातील सर्वांचीच नावे घेत त्यांनीही आतापर्यंत काहीच केले नाही. तसेच राहुल गांधी देखील स्वतः काही करू शकत नाहीत. त्यांचे भाषण म्हणजे मनोरंजन असल्याची टीका मुख्यंत्र्यांनी केली. आता येथून पुढे एखाद्या जाहिरातीप्रमाणे राहुल गांधी यांचे भाषण हे काल्पनिक आहे, याचा कशाशीही संबंध नाही, असे होणार आहे. सभेसाठी पालकमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.

Intro:
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सभास्थळी तीन तास उशिराने पोहोचले होते. तर सभेत ही तेच ते मुद्दे घेत काँग्रेस पक्षाची लाज काढली. तसेच हेच काँग्रेस भारतीय सैनिकांने आतिरेक्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक चे पुरावे मागत आहे. काँग्रेस सरकारमधील काही नेत्याना भारतीय सैनिका सोबत पाठवून तिथे सोडून त्यांच्यावर हल्ला केला असता तर यांना पुरावा मिळाला असता. असे सांगत काँग्रेस सरकार केवळ जनतेला फसवत असल्याचे सांगितले. उशिराने मुख्यमंत्री आल्याने त आयोजकांवर खुर्च्या गुंडाळून ठेवण्याची वेळ आल्याचे पहावयास मिळाले.



कर्ज माफी सुरूच राहणार आहे,

जुन्या सर


204 कोटींचा कर्ज माफीमचा

905 कोटींचा

3 हजार विहिरी,

हिंगोली जिल्ह्यांचा अनुशेष राज्यपालांकडून मंजूर करून घेतला.


90 टक्के खात्यात पैसे गेले आहेत. नानाजी देशमुख कृषि समृद्धी प्रकल्प सुरू केला या योजनेतुन दिपरिदेशन करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिलेजत आहे शेतकऱ्यांच्या जीवणत परिवर्तन करण्याचं काम करीत आहोत, 50 हजार

नरसी नामदेव सनसनासाठी काम खेळू आहेत


Body:मुख्यमंत्र्याची सभा साडे बारा वाजता होणार होती. त्यामुळे सकाळपासूनच याठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र बराच वेळ होऊन मुख्यमंत्री सभेसाठी न आल्यामुळे तहानेने व भुकेने व्याकूळ झालेली जनता सभेतून निघून गेल्याचे पहावयास मिळाले. जेव्हा मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर दिसले तेव्हा मंडपात बसलेले होते ते जाग्यावरच बसले. मुख्यमंत्री आल्यानंतर महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांचे भाषण झाले. त्यानी स्वतःवर विरोधक कसल्या कसल्या टीका करतात याचा पाढा वाचला. नंतर मुख्यमंत्र्याच्या भाषणास सुरुवात झाली. त्यांनी काँगेसच्या'' ७२ हजार गरिबीवर वार'' या घोष वाक्यावर काँग्रेसची लाज काढली. अर्थमंत्री चिदंबरम यांना पत्रकाराने विचारलं तर तुम्ही जनतेला ७२ हजार कसे देणार, तर चिदंबरम यांची खिल्ली उडवून तिजोरीत आलेल्या रक्कमेतून जनतेला देणार असल्याचे चिदंबरम यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी हसत सांगितले. अरे वारे वा या ठिकाणी मोदीने काळ्या पैशावर आघात करायचा अन कळा पैसा तिजोरीत जमा करायचा अन तो पैसा तुम्ही वाटायचं मग तुम्ही कशाला मोदी आहेत ना. काँग्रेस पक्षाला नीती नाही धोरण नाही नियम नाही केवळ आश्वासने देण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचे त्यानी सांगितले.


Conclusion:आता पर्यंत काँग्रेस सरकारने काहीही केले नाही. तसेच गांधी घराण्यातील राहुल गांधी यांच्या घराण्यातील सर्वांचीच नावे घेत त्यानी देखील आतापर्यंत काहीच केले नसल्याचे सांगितले. तसेच राहुल गांधी देखील स्वतः काही करू शकत नाहीत. त्यांचे भाषण म्हणजे मनोरंजना सारखे असल्याची ही टीका करत आता येथुज पुढे एखाद्या जाहिराती प्रणाने राहुल गांधी यांचे भाषण हे काल्पनिक आहे याचा कशासाठी ही संबंध नाही असे होणार आहे. असे वेगवेगळे खिसे सांगत काँगेस वर सडकून टीका केली. तर मोदी सरकारने घेतलेले निर्णय हे महत्वाचे असुन, याचा सर्वसामान्य, शेतकऱ्यांना सर्वाधिक जास्त फायदा झाला आहे. तसेच स्वच्छ भारत योजनेमुळे अन उज्वल भारत गॅस योजनेमुळे महिलांना जास्तीत जास्त फायदा झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावेळी पालकमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील पाटील. आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.