ETV Bharat / state

सारंग स्वामी यात्रेतील भाजीचा महाप्रसाद भाविकांसाठी पर्वणीच

सारंग स्वामी यात्रा महोत्सवातील भाजी महाप्रसादाचे भाविकांना विशेष आकर्षण आहे. वीरशैव लिंगायत समाजाचे आराध्य दैवत म्हणून सारंग स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा असतो. या यात्रेला भाजी महाप्रसाद यात्रा, असेही म्हणतात. या यात्रेला 529 वर्षांची परंपरा लाभली आहे.

author img

By

Published : Jan 17, 2020, 9:45 PM IST

सारंग स्वामी यात्रा महोत्सव
सारंग स्वामी यात्रा महोत्सव

हिंगोली - सारंग स्वामींचा एकदिवसीय यात्रा महोत्सव आज(शुक्रवार) उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने भाविक या टेकडीवर धाव घेतात. या भाजी महाप्रसादाला जवळपास 529 वर्षांची परंपरा लाभली आहे.

सारंग स्वामी यात्रा महोत्सव

सारंग स्वामी यात्रा महोत्सवातील भाजीच्या महाप्रसादाची भाविक वर्षभरापासून प्रतिक्षा करतात. हा दिवस म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणीच असतो. वीरशैव लिंगायत समाजाचे आराद्य दैवत म्हणून सारंग स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा असतो. याठिकाणी सरंगस्वामी महाराज यांनी जीवन संजीवनी समाधी घेतलेली आहे. त्यांच्या पुण्यातिथीनिमित्ताने आजचा महाप्रसादाचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी या ठिकाणी भरण्यात येणारी यात्रा सर्वदूर प्रसिद्ध आहे. या यात्रेचा समारोप देखील १५ प्रकारच्या मिश्रीत केलेल्या भाजीने केला जातो.

हेही वाचा - ...तर मग तुमची थेट भेट होईल माझ्याशी, ती ही स्वर्गात

भाजीचा प्रसाद घेतल्यानंतर वर्षभर आरोग्य ठणठणीत राहते, असा भविकाचा मानस आहे. त्यामुळे शक्यतो हा महाप्रसाद कोणीही टाळत नाही. उंच टेकडीवर असलेले सारंग स्वामीचे मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. सारंग स्वामीचे दर्शन घेण्यासाठी भाविक टेकडीवर पायऱ्या रेंगत जातात. अनेक पायऱ्या रेंगूनही अजीबात थकवा येत नसल्याचे भाविक अनुभव सांगतात.

भाजीच्या महाप्रसादाबरोबरच २ वर्षापासून वसमतच्या माजी नगराध्यक्ष उज्ज्वला ताभाळे या ठिकाणी भाकरीचे देखील वाटप करत आहेत. त्यामुळे या महाप्रसादामध्ये अजून रंगत आली आहे. भाजी घेण्यासाठी पहाटेपासून, तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाजीच्या महाप्रसादाचे वाटप सुरू राहते. हा महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागतात, तर मंदिर परिसरात थाटलेल्या दुकानावरही मोठी गर्दी असते. एस. टी. महामंडळाच्यावतीने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी येथे ६ ज्यादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसभर यात्रा महोत्सवात रेलचेल सुरू होती.

हेही वाचा - अनुदानित गोशाळेची दयनीय अवस्था, सुविधेअभावी 'गाई' मोजताहेत शेवटची घटका

हिंगोली - सारंग स्वामींचा एकदिवसीय यात्रा महोत्सव आज(शुक्रवार) उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने भाविक या टेकडीवर धाव घेतात. या भाजी महाप्रसादाला जवळपास 529 वर्षांची परंपरा लाभली आहे.

सारंग स्वामी यात्रा महोत्सव

सारंग स्वामी यात्रा महोत्सवातील भाजीच्या महाप्रसादाची भाविक वर्षभरापासून प्रतिक्षा करतात. हा दिवस म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणीच असतो. वीरशैव लिंगायत समाजाचे आराद्य दैवत म्हणून सारंग स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा असतो. याठिकाणी सरंगस्वामी महाराज यांनी जीवन संजीवनी समाधी घेतलेली आहे. त्यांच्या पुण्यातिथीनिमित्ताने आजचा महाप्रसादाचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी या ठिकाणी भरण्यात येणारी यात्रा सर्वदूर प्रसिद्ध आहे. या यात्रेचा समारोप देखील १५ प्रकारच्या मिश्रीत केलेल्या भाजीने केला जातो.

हेही वाचा - ...तर मग तुमची थेट भेट होईल माझ्याशी, ती ही स्वर्गात

भाजीचा प्रसाद घेतल्यानंतर वर्षभर आरोग्य ठणठणीत राहते, असा भविकाचा मानस आहे. त्यामुळे शक्यतो हा महाप्रसाद कोणीही टाळत नाही. उंच टेकडीवर असलेले सारंग स्वामीचे मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. सारंग स्वामीचे दर्शन घेण्यासाठी भाविक टेकडीवर पायऱ्या रेंगत जातात. अनेक पायऱ्या रेंगूनही अजीबात थकवा येत नसल्याचे भाविक अनुभव सांगतात.

भाजीच्या महाप्रसादाबरोबरच २ वर्षापासून वसमतच्या माजी नगराध्यक्ष उज्ज्वला ताभाळे या ठिकाणी भाकरीचे देखील वाटप करत आहेत. त्यामुळे या महाप्रसादामध्ये अजून रंगत आली आहे. भाजी घेण्यासाठी पहाटेपासून, तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाजीच्या महाप्रसादाचे वाटप सुरू राहते. हा महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागतात, तर मंदिर परिसरात थाटलेल्या दुकानावरही मोठी गर्दी असते. एस. टी. महामंडळाच्यावतीने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी येथे ६ ज्यादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसभर यात्रा महोत्सवात रेलचेल सुरू होती.

हेही वाचा - अनुदानित गोशाळेची दयनीय अवस्था, सुविधेअभावी 'गाई' मोजताहेत शेवटची घटका

Intro:*
हिंगोली- शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या सारंग स्वामी यात्रा महोत्सवातील मुख्य आकर्षण असते ते पंधरा भाज्यांपासून बनविलेल्या महाप्रसादाच. हा महाप्रसाद घेण्यासाठी जिल्ह्यासह जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने या टेकडीवर धाव घेतात. याठिकाणी सरंगस्वामी महाराज यांनी जिवन संजीवनी समाधी घेतलेली आहे. जवळपास 529 वर्षांची परंपरा आहे.


Body:सारंग स्वामी यात्रेतील भाजीच्या महाप्रसादाची वर्षभरापासून भाविक प्रतीक्षा करतात. आज तो क्षण आल्याने हा प्रसाद घेण्यासाठी भाविक आवर्जून या ठिकाणी हजेरी लावतात हा दिवस म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणीच असतो. वीरशैव लिंगायत समाजाच आराध्य दैवत म्हणून सारंग स्वामी महाराज यांची पुण्यतिथी म्हणून आजचा महाप्रसादाचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी या ठिकाणी भरण्यात येणारी यात्रा सर्वदूर प्रसिद्ध असते त्याच दिवशी या यात्रेचा समारोप देखील या पंधरा प्रकारच्या मीश्चित केलेल्या भाजीने केला जातोय. भाजीचा प्रसाद घेतल्यानंतर वर्षभर आरोग्य ठणठणीत राहतेय असा भविकाचा मानस आहे. त्यामुळे शक्यतोर हा महाप्रसाद कोणीही टाळत नाहीत. उंच टेकडीवर असलेलं सारंग स्वामीच मंदिर सर्वदूर प्रसिध्द आहे. सरंगस्वामीचे दर्शन घेण्यासाठी टेकडीवर पायऱ्या रेंगत भाविक जातात. अनेक पायऱ्या रेंगूनही अजीबात थकवा येत नसल्याचे भाविक अनुभव सांगतात. तर भाजीच्या महाप्रसादा बरोबरच दोन वर्षापासून वसमत च्या माजी नगराध्यक्षा उज्वला ताभाळे या ठिकाणी भाकरीचे देखील वाटप करत आहेत. त्यामुळे या महाप्रसादा मध्ये अजून रंगत आलीय. Conclusion:भाजी घेण्यासाठी पहाटे पासून या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाजीच्या महाप्रसादाचे वाटप सुरू राहते. तर मंदिर परिसरात थाटलेल्या दुकानावर ही मोठी गर्दी असते. तर एस. टी महामंडळाच्या वतीने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सहा ज्यादा बसेस उपलब्द करून दिल्या आहेत. त्यामुळे दिवसभर यात्रा महोत्सवात रेलचेल सुरू होती.





ही बातमी या पूर्वी अपलोड केलेली आहे
फक्त विवो देऊन आता अपलोड केलीय
प्लिज चेक करून बातमी वापरावी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.