ETV Bharat / state

अर्ज केला म्हणून कर्जदार; कर्ज न घेताच 20 दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा

जिल्ह्यातील 20 दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज न घेताच बोजा चढवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. राज्यात हा आकडा 109 वर गेला आहे.

author img

By

Published : Jun 29, 2019, 2:33 PM IST

Updated : Jun 29, 2019, 7:39 PM IST

दिव्यांग शेतकरी कैलास कोसरकर

गोंदिया - राज्यातील शेतकरी दुष्कळाने होरपळत आहे. अशातच जिल्ह्यातील 20 दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज न घेताच बोजा चढवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. राज्यात हा आकडा 109 वर गेला आहे. अपंग विकास महामंडळाच्या या प्रतापामुळे केवळ अर्ज केला म्हणून कर्जदार ठरविण्यात आलेल्या या शेतकऱ्यांना दुसरीकडे कर्ज मिळणे अवघड झाले आहे.

दिव्यांग शेतकरी कैलास कोसरकर यांची व्यथा


गोंदिया जिल्हातील दिव्यांग शेतकरी कैलास कोसरकर हे अपंग आहेत. अल्पभूधारक शेतकरी असूनसुद्धा जोडधंदा करावा, या उद्देशाने 2017 साली कुक्कुटपालनासाठी 20 हजार रुपये कर्ज घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी गोंदिया अपंग विकास महामंडळाकडे अर्ज केला. आवश्यक ती कागदोपत्री सर्व पूर्तता करून प्लॉटही गहाण ठेवला. मात्र आजपावतो त्यांना निधी नसल्याने कर्ज मिळाले नाही. मात्र अपंग विकास महामंडळाने त्यांच्या गहाण प्लॉटवर कर्जाचा बोजा चढविला आहे. आता केवळ अर्ज केल्यावर कर्जदार म्हणून त्यांची गणना केली जात आहे. त्यामुळे कर्ज असल्याने आता शेतीसाठी त्यांना पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे आता कर्ज देत नसाल, तर दिलेले कागद व चेक वापस करण्याची मागणी या अपंग शेतकऱ्याने केली आहे.


मंत्री मंडळाचे खांदेपालट होण्यापूर्वी गोंदियाचे पालकमंत्री व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अखत्यारित हा विभाग येत होता. 2017 पासून हा प्रश्न त्यांना मार्गी लावता आला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक आत्महत्या होत असलेल्या विदर्भात आता केवळ अर्ज केला म्हणून कर्जदार झालेल्या शेतकऱ्यांनीही आत्महत्या करण्यास सुरुवात केली, तर त्याला जबाबदार कोण, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला.

गोंदिया - राज्यातील शेतकरी दुष्कळाने होरपळत आहे. अशातच जिल्ह्यातील 20 दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज न घेताच बोजा चढवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. राज्यात हा आकडा 109 वर गेला आहे. अपंग विकास महामंडळाच्या या प्रतापामुळे केवळ अर्ज केला म्हणून कर्जदार ठरविण्यात आलेल्या या शेतकऱ्यांना दुसरीकडे कर्ज मिळणे अवघड झाले आहे.

दिव्यांग शेतकरी कैलास कोसरकर यांची व्यथा


गोंदिया जिल्हातील दिव्यांग शेतकरी कैलास कोसरकर हे अपंग आहेत. अल्पभूधारक शेतकरी असूनसुद्धा जोडधंदा करावा, या उद्देशाने 2017 साली कुक्कुटपालनासाठी 20 हजार रुपये कर्ज घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी गोंदिया अपंग विकास महामंडळाकडे अर्ज केला. आवश्यक ती कागदोपत्री सर्व पूर्तता करून प्लॉटही गहाण ठेवला. मात्र आजपावतो त्यांना निधी नसल्याने कर्ज मिळाले नाही. मात्र अपंग विकास महामंडळाने त्यांच्या गहाण प्लॉटवर कर्जाचा बोजा चढविला आहे. आता केवळ अर्ज केल्यावर कर्जदार म्हणून त्यांची गणना केली जात आहे. त्यामुळे कर्ज असल्याने आता शेतीसाठी त्यांना पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे आता कर्ज देत नसाल, तर दिलेले कागद व चेक वापस करण्याची मागणी या अपंग शेतकऱ्याने केली आहे.


मंत्री मंडळाचे खांदेपालट होण्यापूर्वी गोंदियाचे पालकमंत्री व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अखत्यारित हा विभाग येत होता. 2017 पासून हा प्रश्न त्यांना मार्गी लावता आला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक आत्महत्या होत असलेल्या विदर्भात आता केवळ अर्ज केला म्हणून कर्जदार झालेल्या शेतकऱ्यांनीही आत्महत्या करण्यास सुरुवात केली, तर त्याला जबाबदार कोण, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 29-06-2019
Feed By :-Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_29.JUNE.19_DIVYNAG LON THATA
कर्ज न घेताच 20 अपंग शेतकऱ्यांवर चढला बोजा - गोंदिया जिल्ह्यतील प्रकार
राज्यातील संख्या 109 वर...बोजा चढ़ल्याने अपंग शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळेणात
अपंग विकास महामंडळाच्या प्रताप

Anchor:- एकिकडे राज्यातील शेतकरी दुष्कळाने होरपळुन गेला असतांना गोंदिया जिल्हातील 20 अपंग शेतकऱ्यांवर कर्ज न घेताच बोजा चढ़विल्याच्या धक्कादायक प्रकार ऊघड आला असुन राज्यात हा आकड़ा 109 वर गेला आहे. अपंग विकास महामंडळाच्या या प्रतापामुळे केवळ अर्ज केला म्हणून कर्जदार ठरविण्यात आलेल्या या शेतकऱ्यांना दुसरीकडे कर्ज मिळने अवघड झाले आहे.
VO :- हे आहे गोंदिया जिल्हातील अपंग शेतकरी कैलास कोसरकर, जन्मता अपंग असले तरी नियति पुढे न झुकता स्वाभीमानाने जगावे हा निश्चय त्यांनी करत अल्पभूधारक शेतकरी असुन सुद्धा जोड़धंदा करावा या उद्देशाने 2017 साली कुक्कुटपालन करण्यासाठी 20 हजार रुपये कर्ज मिळण्यासाठि त्यांनी गोंदिया अपंग विकास महामंडळ कड़े अर्ज केला, आवश्यक ती कागदोनपत्री सर्व पूर्तता करून म्हणून प्लाट ही गहान केला. मात्र आजपावतो त्यांना निधि नसल्याने कर्ज मिळाले नाही. मात्र अपंग विकास महामंडलाने त्यांच्या गहान प्लाट वर कर्जाचा बोजा मात्र चढविला आहे. आता केवल अर्ज केल्यावर कर्जदार म्हणून त्यांची गणना केली जात आहे. त्यामुळे कर्ज असल्याने आता शेतीसाठी त्यांना पिक कर्ज मिळत नाही आहे. त्यामुळे आता कर्ज देत नसाल तर दिलेले कागद व चेक वापस करन्यासची मागणी हा अपंग शेतकरी करत आहे.
BYTE कैलास कोसरकर बाइट (पीड़ित शेतकरी)
BYTE:- आकाश मेश्राम
VO :- मंत्री मंडळाचे खांदेपालट होण्यापूर्वी गोंदिया चे पालकमंत्री व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलें यांच्या अख़्यारित हा विभाग येत असल्याने गृह जिल्हातील 2017 पासुन हा प्रश्न त्यांना मार्गी लावता आला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक आत्महत्या होत असलेल्या विदर्भात आता केवल अर्ज केला म्हणून कर्जदार झालेल्या शेतकऱ्यांनी हि आत्महत्य करण्यास सुरुवात केली तर त्याला जवाबदार कोण हाच मोठा प्रश निर्माण झाला असुन ह्या अनुषनघने समोर आला आहे. Body:VO:-Conclusion:
Last Updated : Jun 29, 2019, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.