ETV Bharat / state

दोन बोअरवेल खोदूनही पाणी न लागल्याने गोंदियात शेतकऱ्याची आत्महत्या - गोंदिया शेतकरी आत्महत्या न्यूज

कर्ज काढून दोनवेळा बोअरवेल खोदले, मात्र तरीही पाणी न लागल्याने हताश झालेल्या 55 वर्षीय शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील किडगीपार येथे घडली.

farmer suicide
गोंदिया शेतकरी आत्महत्या
author img

By

Published : Dec 4, 2019, 4:30 PM IST

Updated : Dec 4, 2019, 4:45 PM IST

गोंदिया - कर्ज काढून दोनवेळा बोअरवेल खोदले, मात्र तरीही पाणी न लागल्याने हताश झालेल्या 55 वर्षीय शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील किडगीपार येथे घडली. मृत शेतकऱ्याचे नाव अनंतराम लोटनजी हरिणखेडे (वय 55) असे आहे.

दोन बोअरवेल खोदूनही पाणी न लागल्याने गोंदियात शेतकऱ्याची आत्महत्या

हेही वाचा - महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था, पोलीस बंदोबस्त तैनात

आमगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या किडगीपार या गावातील शेतकरी अनंतराव लोटनजी हरिणखेडे यांची 2 एकर भाताची शेती आहे. या शेतीवरच वृद्ध आई, पत्नी व दोन मुले यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या भाताच्या शेतीसाठी पाण्याची सोय नसल्याने 4 वर्षांपूर्वी 400 फूट बोअरवेल खोदून शेतीला पाणीपुरवठा करत होते. मात्र, बोअरवेलद्वारे आवश्यक पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांनी दुसरा बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी त्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतून कर्ज घेतले. त्यानंतर दुसरा 350 फूट बोअरवेल खोदून ही त्याला पाणी न लागल्याने ते हताश झाले. त्यामुळे शेती कशी करायची व कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून ते खचून गेले. नैराश्येतून शेतात जाऊन त्यांनी विष घेतले व त्यानंतर घरी येऊन झोपी गेले. काही वेळातच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गोंदिया - कर्ज काढून दोनवेळा बोअरवेल खोदले, मात्र तरीही पाणी न लागल्याने हताश झालेल्या 55 वर्षीय शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील किडगीपार येथे घडली. मृत शेतकऱ्याचे नाव अनंतराम लोटनजी हरिणखेडे (वय 55) असे आहे.

दोन बोअरवेल खोदूनही पाणी न लागल्याने गोंदियात शेतकऱ्याची आत्महत्या

हेही वाचा - महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था, पोलीस बंदोबस्त तैनात

आमगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या किडगीपार या गावातील शेतकरी अनंतराव लोटनजी हरिणखेडे यांची 2 एकर भाताची शेती आहे. या शेतीवरच वृद्ध आई, पत्नी व दोन मुले यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या भाताच्या शेतीसाठी पाण्याची सोय नसल्याने 4 वर्षांपूर्वी 400 फूट बोअरवेल खोदून शेतीला पाणीपुरवठा करत होते. मात्र, बोअरवेलद्वारे आवश्यक पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांनी दुसरा बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी त्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतून कर्ज घेतले. त्यानंतर दुसरा 350 फूट बोअरवेल खोदून ही त्याला पाणी न लागल्याने ते हताश झाले. त्यामुळे शेती कशी करायची व कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून ते खचून गेले. नैराश्येतून शेतात जाऊन त्यांनी विष घेतले व त्यानंतर घरी येऊन झोपी गेले. काही वेळातच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 04-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_04.dec.19_farmer suicide_7204243
दोन दोन बोरवेल खोदून हि पाणी न लागल्याने शेतकऱ्याने केली आत्महत्या 
Anchor :- कर्ज काढून दोन दोन बोरवेल्स खोदुन ही पाणी न लागल्याने हताश झालेल्या 55 वर्षीय शेतकऱ्यांने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची ह्रदय हेलावनारी घटना गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील किडगीपार येथे घडली आहे. मृतक शेतकऱ्याचे नाव अनंतराम लोटनजी हरिणखेड़े वय 55 वर्ष आहे. 
VO :- आमगाव पासुन अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या किडगीपार या गावातील शेतकरी अनंतराव लोटनजी हरिणखेड़े यांची 2 एकर भाताची शेती आहे. या शेतीवरच वृद्ध आई, पत्नी व दोन मुले यांच्या उदरनिर्वाह अवलंबून आहे. या भाताच्या शेतीकरिता पाण्याच्या सोयी नसल्याने 4 वर्षापुर्वी 400 फुट बोरवेल्स खोदुन शेतीला पानी पुरवठा करत होते, मात्र बोरवेलद्वारे आवश्यक पाणी पुरवठा न होत असल्याने त्यांनी दूसरी बोरवेल खोदन्याच्या निर्णय घेतला, त्यासाठी त्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतुन कर्ज घेतले. व 350 फुट बोरवेल्स खोदून ही त्याला पाणी न लागल्याने ते हताश झाले. त्यामुळे शेती कशी करायची व कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असतांना खचून जाऊन शेतात जाऊन विष प्राशान करून घरी आले व झोपी गेले. काही वेळातच त्यांची प्रकृति खालावल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केन्द्रात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
BYTE :- यादवराव हरिनखेड़े (मृतक शेतकऱ्याच्या मुलगा),,,
BYTE  :- देवेंद्र भंडारकर (पोलिस पाटिल),,,Body:VO :- Conclusion:
Last Updated : Dec 4, 2019, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.