ETV Bharat / state

धुळ्यातील पांझरा नदीला आलेला पूर गिरीश महाजनांच्या आदेशामुळे; अनिल गोटेंचा आरोप

author img

By

Published : Aug 12, 2019, 4:43 PM IST

पांझरा नदीला आलेला पूर हा मानवनिर्मित आहे, नैसर्गिक आपत्ती नाही, तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या इशाऱ्यामुळे हे झाले असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

माजी आमदार अनिल गोटे

धुळे - पांझरा नदीला आलेला पूर हा मानवनिर्मित आहे, नैसर्गिक आपत्ती नाही. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशामुळेच हे झाले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

माजी आमदार अनिल गोटे
अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा नदी पात्रात सोडण्यात आल्याने नदीला पूर आला होता. यामुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वरची धरण भरल्यानंतर अक्कलपाडा धरणाचे दरवाजे १ फुटाने उघडणे आवश्यक असताना तसे न करता धरणाचे दरवाजे एकदम दीड मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे तब्बल 60 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात झाला, त्यामुळेच ही आपत्ती आली होती.
पांझरा नदीवर आपण बांधलेल्या रस्त्याची दुरवस्था व्हावी, तसेच पुलावर उभारण्यात आलेली शंकराची मूर्ती पाण्यामुळे खाली पडावी, अशा दृष्ट हेतूने हे करण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशामुळे हे झाले असल्याचा आरोप धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठवले असल्याची माहिती गोटे यांनी दिली.

धुळे - पांझरा नदीला आलेला पूर हा मानवनिर्मित आहे, नैसर्गिक आपत्ती नाही. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशामुळेच हे झाले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

माजी आमदार अनिल गोटे
अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा नदी पात्रात सोडण्यात आल्याने नदीला पूर आला होता. यामुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वरची धरण भरल्यानंतर अक्कलपाडा धरणाचे दरवाजे १ फुटाने उघडणे आवश्यक असताना तसे न करता धरणाचे दरवाजे एकदम दीड मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे तब्बल 60 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात झाला, त्यामुळेच ही आपत्ती आली होती.
पांझरा नदीवर आपण बांधलेल्या रस्त्याची दुरवस्था व्हावी, तसेच पुलावर उभारण्यात आलेली शंकराची मूर्ती पाण्यामुळे खाली पडावी, अशा दृष्ट हेतूने हे करण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशामुळे हे झाले असल्याचा आरोप धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठवले असल्याची माहिती गोटे यांनी दिली.
Intro:पांझरा नदीला आलेला पूर हा मानवनिर्मित आहे नैसर्गिक आपत्ती नाही तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या इशाऱ्या मुळे हे झाला असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.


Body:अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा नदी पात्रात सोडण्यात आल्याने नदीला पूर आला होता. यामुळे अनेक नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. वरची धरण भरल्यानंतर अक्कलपाडा धरणाचे दरवाजे १ फुटाने उघडणे आवश्यक असताना तसे न करता एकदम दीड मीटरने उघडण्यात आल्याने तब्बल 60 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने ही आपत्ती आली होती.पांझरा नदीवर आपण बांधलेल्या रस्त्याची दुरावस्था व्हावी तसेच पुलावर उभारण्यात आलेली शंकराच्या मूर्ती पाण्यामुळे खाली पडावी अश्या दुष्ट हेतुतुन हे करण्यात आलं आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशामुळे हे झालं असल्याचा आरोप धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठवले असल्याची माहिती गोटे यांनी दिली.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.