ETV Bharat / state

धुळे : पावसाच्या संततधारेमुळे रब्बी हंगामाची पिके धोक्यात

author img

By

Published : Oct 23, 2019, 7:52 AM IST

धुळ्यात पावसाची संततधार सुरू असून सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलपाडा धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा पांझरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

धुळ्यात पावसाची संततधार

धुळे - शहरासह आजूबाजूच्या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवेळी आलेल्या या पावसामुळे रब्बी हंगामाची पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

धुळ्यात पावसाची संततधार

हेही वाचा - नंदुरबारमधील या गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; केवळ एका मतदाराने बजावला हक्क

पुढील दोन दिवस पावसाची संततधार सुरू राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा तयार झाला आहे. मंगळवारी अक्कलपाडा धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा पांझरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धुळे - शहरासह आजूबाजूच्या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवेळी आलेल्या या पावसामुळे रब्बी हंगामाची पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

धुळ्यात पावसाची संततधार

हेही वाचा - नंदुरबारमधील या गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; केवळ एका मतदाराने बजावला हक्क

पुढील दोन दिवस पावसाची संततधार सुरू राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा तयार झाला आहे. मंगळवारी अक्कलपाडा धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा पांझरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:धुळे शहरासह परिसरात गेल्या दोन तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. दमदार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. या पावसामुळे रब्बी हंगामाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे....

Body:मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पावसानंतर आज पुन्हा एकदा पावसाने धुळे शहरासह परिसरात दमदार हजेरी लावली आहे, गेल्या दोन तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे, या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल आहे, सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण पसरल आहे, पुढील दोन दिवस पावसाची संततधार सुरू राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा तयार झाला असून सायंकाळी अक्कलपाडा धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदीपात्रात करण्यात आला आहे, त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.