ETV Bharat / state

'राजकारण्यांनी सत्तेचा सारीपाट थांबवून आमच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे'

author img

By

Published : Nov 15, 2019, 8:40 PM IST

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना दुसरीकडे मात्र सत्तेच्या सारीपाटात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. पावसामुळे कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून ८०० ते १ हजार रुपये एवढा कमी हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कांद्याला किमान ३ हजार रुपये क्विंटल भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

राजकारण्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे - शेतकऱ्यांची मागणी

धुळे - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यासाठी राजकारण्यांनी आपल्या सत्तेच्या सारीपाटाचा चाललेला खेळ थांबवावा. तसेच लवकरात लवकर सरकार स्थापन करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी कळकळीची विनंती धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.

राजकारण्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे - शेतकऱ्यांची मागणी

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन २० ते २२ दिवस उलटून देखील अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. यामुळे राज्यातील विविध प्रश्नांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. एकीकडे संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना दुसरीकडे मात्र सत्तेच्या सारीपाटात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अतिवृष्टीमुळे कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून ८०० ते १ हजार रुपये एवढा कमी हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कांद्याला किमान ३ हजार रुपये क्विंटल भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा - धुळे: चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश, तीन आरोपी गजाआड

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिलेला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. सध्या मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले जात आहत, मात्र निवडणुकांवरती खर्च होणारा पैसा हा शेतकऱ्यांवर खर्च झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक संकटातून मुक्तता होईल, अशी मागणी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा - धुळे महापालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित

धुळे - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यासाठी राजकारण्यांनी आपल्या सत्तेच्या सारीपाटाचा चाललेला खेळ थांबवावा. तसेच लवकरात लवकर सरकार स्थापन करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी कळकळीची विनंती धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.

राजकारण्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे - शेतकऱ्यांची मागणी

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन २० ते २२ दिवस उलटून देखील अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. यामुळे राज्यातील विविध प्रश्नांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. एकीकडे संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना दुसरीकडे मात्र सत्तेच्या सारीपाटात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अतिवृष्टीमुळे कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून ८०० ते १ हजार रुपये एवढा कमी हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कांद्याला किमान ३ हजार रुपये क्विंटल भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा - धुळे: चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश, तीन आरोपी गजाआड

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिलेला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. सध्या मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले जात आहत, मात्र निवडणुकांवरती खर्च होणारा पैसा हा शेतकऱ्यांवर खर्च झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक संकटातून मुक्तता होईल, अशी मागणी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा - धुळे महापालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित

Intro:अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यासाठी राजकारण्यांनी आपल्या सत्तेच्या सारीपटाचा चाललेला खेळ थांबवावा, आणि लवकरात लवकर सरकार स्थापन करून शेतकऱ्याना मदत द्यावी अशी कळकळीची विनंती धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.


Body:विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन वीस ते बावीस दिवस उलटून देखील अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. यामुळे राज्यातील विविध प्रश्नांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे,एकीकडे संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असताना दुसरीकडे मात्र सत्तेच्या सारीपाटात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून कांद्याला आठशे ते हजार रुपये एवढा कमी हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कांद्याला किमान तीन हजार रुपये क्विंटल भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिलेला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले जात आहे, मात्र निवडणुकांवरती खर्च होणारा पैसा हा शेतकऱ्यांवर खर्च झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक संकटातून मुक्तता होईल अशी मागणी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना व्यक्त केली.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.