ETV Bharat / state

निसर्गरम्य पण धोक्याची वाट, रस्त्यावर आलेल्या वृक्षांच्या फांद्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यास अडचण - road side tree branches

जिवती तालुका गाठण्यासाठी माणिकगड आणि भेंडावी ही २ प्रमुख मार्ग आहेत. या मार्गाच्या एका बाजूने उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूने खोल दरी असून हा मार्ग अतिशय अरुंद आहे. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्यापही झाले नसल्याने स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

jiwati raod
निसर्गरम्य पण धोक्याची वाट
author img

By

Published : Nov 27, 2019, 9:00 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका डोंगर दऱ्यांनी वेढला गेला आहे. याच्या एका बाजूने उंच डोंगर तर दूसऱ्या बाजूने खोल गेलेली दरी असे काहीसे दृष्य येथे पाहायला मिळते. सध्या निसर्गाने जिवती तालुक्यावर मुक्त उधळण केली असून डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू पांघरलेले निसर्गाचे देखणे रूप डोळ्यात भरणारे आहे. मात्र, हे दृष्य बघायला जितके सुंदर तितकेच ते धोकादायकही ठरत आहे. या मार्गातील दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या वृक्षांच्या फांद्या प्रवाशांना ये जा करताना अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

निसर्गरम्य पण धोक्याची वाट

जिवती तालुका गाठण्यासाठी माणिकगड आणि भेंडावी ही २ प्रमुख मार्ग आहेत. या मार्गाच्या एका बाजूने उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूने खोल दरी असून हा मार्ग अतिशय अरुंद आहे. जिवती आणि पाटण ही गावे गाठण्यासाठी याच मार्गाने जावे लागत असून या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्यापही झालेले नाही. त्यामुळे रुंदीकरणाअभावी स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

हेही वाचा - चंद्रपूर: लाठी वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला वाघ; दोन महिन्यात दोन वाघांचा मृत्यू

जिवती, पाटणकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन्ही बाजूंनी असलेल्या वृक्षांच्या फांद्यानी मार्ग झाकोळला गेला आहे. परिणामी या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर, २ वाहने समोरासमोर आल्यावर वाहनांना मार्ग देण्यासही मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच जिवती ते गडचांदूर आणि गडचांदूर ते पाटण हा रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. तर, या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करित असल्याचा आरोप आता केला जात आहे.

हेही वाचा - वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून वेकोलीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर - जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका डोंगर दऱ्यांनी वेढला गेला आहे. याच्या एका बाजूने उंच डोंगर तर दूसऱ्या बाजूने खोल गेलेली दरी असे काहीसे दृष्य येथे पाहायला मिळते. सध्या निसर्गाने जिवती तालुक्यावर मुक्त उधळण केली असून डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू पांघरलेले निसर्गाचे देखणे रूप डोळ्यात भरणारे आहे. मात्र, हे दृष्य बघायला जितके सुंदर तितकेच ते धोकादायकही ठरत आहे. या मार्गातील दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या वृक्षांच्या फांद्या प्रवाशांना ये जा करताना अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

निसर्गरम्य पण धोक्याची वाट

जिवती तालुका गाठण्यासाठी माणिकगड आणि भेंडावी ही २ प्रमुख मार्ग आहेत. या मार्गाच्या एका बाजूने उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूने खोल दरी असून हा मार्ग अतिशय अरुंद आहे. जिवती आणि पाटण ही गावे गाठण्यासाठी याच मार्गाने जावे लागत असून या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्यापही झालेले नाही. त्यामुळे रुंदीकरणाअभावी स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

हेही वाचा - चंद्रपूर: लाठी वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला वाघ; दोन महिन्यात दोन वाघांचा मृत्यू

जिवती, पाटणकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन्ही बाजूंनी असलेल्या वृक्षांच्या फांद्यानी मार्ग झाकोळला गेला आहे. परिणामी या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर, २ वाहने समोरासमोर आल्यावर वाहनांना मार्ग देण्यासही मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच जिवती ते गडचांदूर आणि गडचांदूर ते पाटण हा रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. तर, या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करित असल्याचा आरोप आता केला जात आहे.

हेही वाचा - वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून वेकोलीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू

Intro:निसर्गरम्य पण धोक्याची वाट;एका बाजूने डोंगर तर दूसर्याबाजूने खोल दरी;रस्त्यावर आलेल्या वृक्षांच्या फांद्यानी प्रवाश्यांना अडचण

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेला जिवती तालूका डोंगर दर्यांनी वेढला आहे. एका बाजूने उंचउंच डोंगर तर दूसर्या बाजूने खोलखोल गेलेली दरी. सध्या डोंगर दर्यांनी हीरवा शालू पांघरलेला आहे. निसर्गाने जिवती तालूक्यावर मुक्त उधळण केली आहे. निसर्गाचे देखणे रुप डोळ्यात भरणारे आहे तसे ते धोकादायकही ठरत आहे. मार्गातील दोन्ही बाजूनी उभे असलेल्या वृक्षाचा फांद्या प्रवाशांना अडचणीचा ठरत आहेत. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

जिवती तालुका गाठण्यासाठी माणिकगड आणि भेंडावी हे दोन प्रमुख मार्ग आहेत. या मार्गाचा एका बाजूने उंच डोंगर तर दूसर्या बाजूने खोल दरी आहे. मार्ग अतिशय अरुंद आहे. या मार्गानेच जिवती,पाटण ही गावे गाठावी लागतात. या मार्गाचे रुंदीकरणाचे काम अद्यापही झालेले नाही. रुंदीकरणाअभावी या रस्त्यावरून प्रवास करताना स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

सध्या जिवती,पाटणकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूनी उभे असलेल्या वृक्षांचा फांद्यानी मार्गा झाकोळला गेला आहे. परिणामी या मार्गाने ये जा करणाऱ्या वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. दोन वाहने समोरासमोर आल्यावर वाहनांना मार्ग देण्यास मोठीच अडचण निर्माण होते आहे.

जिवती ते गडचांदूर आणि गडचांदूर ते पाटण हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करित असल्याचा आरोप आता केला जात आहे.Body:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.