ETV Bharat / state

चंद्रपुरात कोरोनाचा भडका; आज तब्बल 176 रुग्णांची नोंद

author img

By

Published : Mar 5, 2021, 7:49 PM IST

कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

chandrapur latest corona news
चंद्रपुरात कोरोनाचा भडका

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकांदेखील चिंता वाढली आहे. आज तब्बल 176 कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आजवर हा आकडा दोन आकडी संख्येवर मर्यादित होता. वेळीच उपाययोजना केली नाही तर, शेजारच्या जिल्ह्यांप्रमाणे चंद्रपुरात देखील कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर, 176 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 49 वर पोहोचली आहे. तसेच, सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 94 झाली आहे. सध्या 555 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 19 हजार 777 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 93 हजार 518 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये बल्लारशा येथील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 400 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 362, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधीत आलेल्या 176 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 33, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर एक, भद्रावती आठ, ब्रम्हपुरी एक, नागभीड तीन, सावली 19, राजूरा आठ, चिमूर सहा, वरोरा 59, कोरपना 14, जीवती 20 व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकांदेखील चिंता वाढली आहे. आज तब्बल 176 कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आजवर हा आकडा दोन आकडी संख्येवर मर्यादित होता. वेळीच उपाययोजना केली नाही तर, शेजारच्या जिल्ह्यांप्रमाणे चंद्रपुरात देखील कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर, 176 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 49 वर पोहोचली आहे. तसेच, सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 94 झाली आहे. सध्या 555 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 19 हजार 777 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 93 हजार 518 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये बल्लारशा येथील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 400 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 362, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधीत आलेल्या 176 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 33, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर एक, भद्रावती आठ, ब्रम्हपुरी एक, नागभीड तीन, सावली 19, राजूरा आठ, चिमूर सहा, वरोरा 59, कोरपना 14, जीवती 20 व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.