ETV Bharat / state

कोरपणा तहसील कार्यालयावर शेतकरी धडकले; नुकसान भरपाईपासून अनेक शेतकरी वंचित - farmers agitation on tehsil office in korpana

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील नारंडा येथील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान भरापई मिळाली नाही. यामुळे भाजपयुमोच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.

मोर्चात सहभागी शेतकरी
author img

By

Published : Nov 25, 2019, 11:13 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात येणाऱ्या नारंडा येथील शेतपिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे प्रशासनाने केले. परंतु, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यात नुकसानभरपाई मंजूर यादीत शेतकऱ्यांची नावे समाविष्ट नसल्याने बळीराजा संतापला. नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी, ही मागणी करत नारंडा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

बोलताना आशिष ताजने


पंचनाम्यानंतर नुकसानभरपाईची मंजूर यादी प्रसिद्ध केली. मंजूर झालेल्या यादीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट नव्हते. या प्रकाराने बळीराजा संतापला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.


कोरपणा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नारंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल शेंडे, दिपक मोहूर्ले, गजानन भोंगळे, सत्यवान चामाटे,यांसह बहुसंख्येने शेतकरी या धडक मोर्चात सहभागी झाले होते.

हेही वाचा - कृषी विभागाकडून हरभऱ्याचे बियाणे मिळेना; संतप्त शेतकऱ्यांचा चिमूर कृषी कार्यालयात ठिय्या

चंद्रपूर - जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात येणाऱ्या नारंडा येथील शेतपिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे प्रशासनाने केले. परंतु, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यात नुकसानभरपाई मंजूर यादीत शेतकऱ्यांची नावे समाविष्ट नसल्याने बळीराजा संतापला. नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी, ही मागणी करत नारंडा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

बोलताना आशिष ताजने


पंचनाम्यानंतर नुकसानभरपाईची मंजूर यादी प्रसिद्ध केली. मंजूर झालेल्या यादीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट नव्हते. या प्रकाराने बळीराजा संतापला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.


कोरपणा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नारंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल शेंडे, दिपक मोहूर्ले, गजानन भोंगळे, सत्यवान चामाटे,यांसह बहुसंख्येने शेतकरी या धडक मोर्चात सहभागी झाले होते.

हेही वाचा - कृषी विभागाकडून हरभऱ्याचे बियाणे मिळेना; संतप्त शेतकऱ्यांचा चिमूर कृषी कार्यालयात ठिय्या

Intro:कोरपणा तहसिल कार्यालयावर शेतकरी धडकले;नुकसानभरपाईत अनेक शेतकरी वंचित

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या नारंडा येथील शेतपिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे प्रशाशनाने केले परंतु अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही.त्यात नुकसानभरपाई मंजूर यादीत शेतकऱ्यांची नावे समाविष्ट नसल्याने बळीराजा संतापला. नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी करित नारंडा येथील शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयावर धडक दिली. तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

सन 2018 मध्ये जुलै व आगस्ट महिण्यात जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये कोरपना तालुक्याचाही समावेश होता. कोरपणा तालूक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होती.नुकसानग्रस्त शेतपिकांचे प्रशाशनाने पंचनामे केले.
नुकसानभरपाईची मंजूर यादी प्रसिद्ध केली. मंजूर झालेल्या यादीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट नव्हते. या प्रकाराने बळीराजा संतापला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर धडक दिली. कोरपणा
तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नारंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल शेंडे, दिपक मोहूर्ले, गजानन भोंगळे,सत्यवान चामाटे, प्रवीण हेपट, तुळशीराम पाटील भोंगळे,नामदेव घुगुल,मारोती शेंडे,साईनाथ भोंगळे,अंकुश वांढरे,बाळा गाडगे,विठ्ठल भोंगळे,मारोती खामनकर,रमेश हस्तक आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.Body:विडीओ बाईट
आशिष ताजने,जिल्हा सचिव,भाजयुमोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.