ETV Bharat / state

नियमाची ऐशीतैशी : बड्या अधिकाऱ्यासाठी चक्क शासकीय कार्यालयचं केलं 'क्वारंटाइन सेंटर'

author img

By

Published : Jun 14, 2020, 10:43 AM IST

Updated : Jun 24, 2020, 2:56 PM IST

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. रेड झोनमध्ये जाणे आणि येण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. येथून विना परवानगी प्रवास करणाऱ्याना क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने शासकीय, निमशासकीय इमारती ताब्यात घेतल्या आहे. सामान्य माणूस येथे निमूटपणे राहतात. पण, उच्चभ्रू लोकं क्वारंटाईन टाळण्यासाठी विविध क्लूप्त्या करत असल्याचे समोर आले. असाच एक प्रकार समोर आला.

chandrapur atma office Did institutional quarantine centre for one officer
नियमाची ऐशीतैशी : बड्या अधिकाऱ्यासाठी चक्क शासकीय कार्यालयचं केलं 'संस्थात्मक क्वारंटाइन सेंटर'

चंद्रपूर - जिल्ह्यात अन्य जिल्हा अथवा राज्यातून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण (क्वारंटाइन) केले जाणे बंधनकारक आहे. मात्र, हा नियम केवळ सामान्य नागरिकांसाठी लागू होतोय. बड्या लोकांसाठी असले नियम फक्त कागदावर असल्याचा प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे. 'आत्मा'शी संबंधित एका अधिकाऱ्याला होम क्वारंटाइन करण्यासाठी, चक्क कृषी विभागाचे ऑफिस देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे त्या अधिकाऱ्याच्या बडदास्तीसाठी एक शिपाईही नेमण्यात आला आहे.

माहिती देताना आमचे प्रतिनिधी अमित वेल्हेकर..

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. रेड झोनमध्ये जाणे आणि येण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. येथून विना परवानगी प्रवास करणाऱ्याना क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने शासकीय, निमशासकीय इमारती ताब्यात घेतल्या आहे. सामान्य माणूस येथे निमूटपणे राहतात. पण, उच्चभ्रू लोकं क्वारंटाइन टाळण्यासाठी विविध क्लूप्त्या करत असल्याचे समोर आले. असाच प्रकार कृषी कार्यालयात दिसून येत आहे.

चंद्रपुरातील 'आत्मा' कार्यालयाचे लेखाधिकारी नागपूरहून परतले. यांची माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेला दिली. तेव्हा त्यांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितले. विशेष बाब म्हणजे, त्या अधिकाऱ्याला प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या कार्यालयात न पाठवता, त्यांच्यासाठी खास 'आत्मा' कार्यालयचं क्वारंटाइन सेंटर केले.

गंभीर बाब म्हणजे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या कार्यालयावर तसा शिक्काही मारला. या काळात त्या अधिकाऱ्याला भेटण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच त्या अधिकाऱ्याच्या बडदास्तीसाठी एका शिपायाची नेमणूकही करण्यात आली. कोणत्याही इमारतीला क्वारंटाइन सेंटरची मंजूरी देताना अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. त्यानंतरच त्याला परवानगी दिली जाते. मात्र 'आत्मा'चे कार्यालय याला अपवाद ठरले. यामुळे सर्व सामान्य जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तो अधिकारी रात्री आत्मा कार्यालयात राहत नसल्याची माहिती मिळत आहे. तो नागपूरहून ये-जा करत असल्याचे समजते.

कार्यालय झाले 'क्वारंटाइन सेंटर', शेतकऱ्यांचे काय?

अशात खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे, त्यांचे गट स्थापन करण्याची जबाबदारी या कार्यालयाकडे आहे. मात्र, अशावेळी येथे शेतकऱ्यांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्याच्या बडदास्तीमुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे.

यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक पाटील यांना विचारले असता, त्यांनी आपल्याला या प्रकरणाबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. दुसरीकडे मनपाचे अधिकाऱ्यांनी खास एका अधिकाऱ्यासाठी कार्यालयचं कसे संस्थात्मक क्वारंटाइन सेंटर केले यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


हेही वाचा - मनपाच्या विकासकामांना कोरोनाचा संसर्ग; करातून मिळणाऱ्या उत्पन्नाला कात्री

हेही वाचा - जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांची थट्टा; खरीप हंगामातही पिककर्जासाठी बँकेकडे हेलपाटे

चंद्रपूर - जिल्ह्यात अन्य जिल्हा अथवा राज्यातून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण (क्वारंटाइन) केले जाणे बंधनकारक आहे. मात्र, हा नियम केवळ सामान्य नागरिकांसाठी लागू होतोय. बड्या लोकांसाठी असले नियम फक्त कागदावर असल्याचा प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे. 'आत्मा'शी संबंधित एका अधिकाऱ्याला होम क्वारंटाइन करण्यासाठी, चक्क कृषी विभागाचे ऑफिस देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे त्या अधिकाऱ्याच्या बडदास्तीसाठी एक शिपाईही नेमण्यात आला आहे.

माहिती देताना आमचे प्रतिनिधी अमित वेल्हेकर..

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. रेड झोनमध्ये जाणे आणि येण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. येथून विना परवानगी प्रवास करणाऱ्याना क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने शासकीय, निमशासकीय इमारती ताब्यात घेतल्या आहे. सामान्य माणूस येथे निमूटपणे राहतात. पण, उच्चभ्रू लोकं क्वारंटाइन टाळण्यासाठी विविध क्लूप्त्या करत असल्याचे समोर आले. असाच प्रकार कृषी कार्यालयात दिसून येत आहे.

चंद्रपुरातील 'आत्मा' कार्यालयाचे लेखाधिकारी नागपूरहून परतले. यांची माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेला दिली. तेव्हा त्यांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितले. विशेष बाब म्हणजे, त्या अधिकाऱ्याला प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या कार्यालयात न पाठवता, त्यांच्यासाठी खास 'आत्मा' कार्यालयचं क्वारंटाइन सेंटर केले.

गंभीर बाब म्हणजे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या कार्यालयावर तसा शिक्काही मारला. या काळात त्या अधिकाऱ्याला भेटण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच त्या अधिकाऱ्याच्या बडदास्तीसाठी एका शिपायाची नेमणूकही करण्यात आली. कोणत्याही इमारतीला क्वारंटाइन सेंटरची मंजूरी देताना अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. त्यानंतरच त्याला परवानगी दिली जाते. मात्र 'आत्मा'चे कार्यालय याला अपवाद ठरले. यामुळे सर्व सामान्य जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तो अधिकारी रात्री आत्मा कार्यालयात राहत नसल्याची माहिती मिळत आहे. तो नागपूरहून ये-जा करत असल्याचे समजते.

कार्यालय झाले 'क्वारंटाइन सेंटर', शेतकऱ्यांचे काय?

अशात खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे, त्यांचे गट स्थापन करण्याची जबाबदारी या कार्यालयाकडे आहे. मात्र, अशावेळी येथे शेतकऱ्यांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्याच्या बडदास्तीमुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे.

यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक पाटील यांना विचारले असता, त्यांनी आपल्याला या प्रकरणाबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. दुसरीकडे मनपाचे अधिकाऱ्यांनी खास एका अधिकाऱ्यासाठी कार्यालयचं कसे संस्थात्मक क्वारंटाइन सेंटर केले यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


हेही वाचा - मनपाच्या विकासकामांना कोरोनाचा संसर्ग; करातून मिळणाऱ्या उत्पन्नाला कात्री

हेही वाचा - जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांची थट्टा; खरीप हंगामातही पिककर्जासाठी बँकेकडे हेलपाटे

Last Updated : Jun 24, 2020, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.