ETV Bharat / state

चंद्रपुरात 1 हजार 213 कोरोनाबाधितांचा नोंद, तर 22 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 20, 2021, 12:44 AM IST

चंद्रपूरमध्ये मागील 24 तासात 631 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1 हजार 213 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. 22 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 43 हजार 444 वर पोहोचली आहे.

चंद्रपुरात 1 हजार 213 कोरोनाबाधितांचा नोंद
चंद्रपुरात 1 हजार 213 कोरोनाबाधितांचा नोंद

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 631 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1 हजार 213 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. 22 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 43 हजार 444 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 31 हजार 281 झाली आहे. सध्या 11 हजार 541 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 32 हजार 411 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 81 हजार 856 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 622 बाधितांचे मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत 622 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 573, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा 3, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

सोमवारी बाधीत आलेल्या 1213 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रातील 302, चंद्रपूर तालुका 70, बल्लारपूर 58, भद्रावती 86, ब्रम्हपुरी 148, नागभिड 25, सिंदेवाही 34, मूल 45, सावली 13, पोंभूर्णा 8, गोंडपिपरी 16, राजूरा 102, चिमूर 93, वरोरा 157, कोरपना 30, जीवती 13 व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.

सूचनांचे पालन करावे, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रींचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी. तसेच 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा - १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस; मुख्यमंत्री ठाकरेंनी मानले केंद्राचे आभार

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 631 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1 हजार 213 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. 22 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 43 हजार 444 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 31 हजार 281 झाली आहे. सध्या 11 हजार 541 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 32 हजार 411 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 81 हजार 856 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 622 बाधितांचे मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत 622 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 573, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा 3, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

सोमवारी बाधीत आलेल्या 1213 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रातील 302, चंद्रपूर तालुका 70, बल्लारपूर 58, भद्रावती 86, ब्रम्हपुरी 148, नागभिड 25, सिंदेवाही 34, मूल 45, सावली 13, पोंभूर्णा 8, गोंडपिपरी 16, राजूरा 102, चिमूर 93, वरोरा 157, कोरपना 30, जीवती 13 व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.

सूचनांचे पालन करावे, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रींचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी. तसेच 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा - १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस; मुख्यमंत्री ठाकरेंनी मानले केंद्राचे आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.