ETV Bharat / state

तुम्ही काय केले ते आधी आरशामध्ये बघा; मग आम्हाला विचारा, लाज वाटते का? - उद्धव ठाकरे

author img

By

Published : Apr 17, 2019, 9:30 AM IST

मागच्यावेळी यांचे सरकार असताना यांनी शेण घोटाळा केला होता. हे काहीच सोडत नाहीत. आता कोणता घोटाळा करायचा राहिला आहे, ह्यांनाच माहित. लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही, असेही उद्धव म्हणाले.

उद्धव ठाकरेंची मुंबई सभा

मुंबई - आघाडीच्या काळात आदर्श घोटाळा, कोळसा घोटाळा, शेण घोटाळा आणि बोफोर्स घोटाळे झाले. शरद पवार आणि राहुल गांधी आधी तुमची चौकशी होवू द्या. आधी तुम्ही आरशामध्ये बघा, तुम्ही काय केले ते, मग आम्हाला विचारा, लाज वाटते का? अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. मुंबई येथे प्रचारसभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंची मुंबई सभेतील भाषण

देशात पहिल्यांदा काँग्रेसेत्तर अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले होते. ते यांनी १३ दिवसातच काढून टाकले. यांना दुसरे कोणी सत्तेत आलेले चालत नाही. सत्ता तुम्हालाच हवी आहे. सत्तेची हाव तुम्हालाच आहे. सोनिया गांधीना पंतप्रधानासाठी विरोध करणारे शरद पवार पुन्हा वाडग घेवून सत्तेसाठी त्यांच्या मागे गेले. मनमोहनसिंग सरकारच्या काळात जेवढे घोटाळे झालेत तेवढेच घोटाळे काढा, आणि मग आम्हाला विचारा, लाज वाटते का? आघाडी म्हणजे भोक पडलेला फुगा. ज्या फुग्याला कुठला आकारच नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आघाडीवर केली.

सध्या शेतकऱ्यांसोबत शरद पवार भेट घेत आहेत. त्यांचे शेतकऱ्यांसोबत फोटो आहेत. आत्ता शरद पवारांना साक्षात्कार झाला की या देशात शेतकरी आहे आणि दुष्काळग्रस्त आहे. याआधी फक्त क्रिकेटरसोबतच त्यांचे फोटो होते. ज्या शेतकऱ्यांची चौकशी शरद पवार यांनी केली ते शेतकरी धास्तावले आहेत. मागच्यावेळी यांचे सरकार असताना यांनी शेण घोटाळा केला होता. हे काहीच सोडत नाहीत. आता कोणता घोटाळा करायचा राहिला आहे, ह्यांनाच माहित. लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही. कारण, आम्ही शिवाजी महाराजांचे मर्द मावळे आहोत, असेही उध्दव ठाकरे म्हणाले.

मुंबई - आघाडीच्या काळात आदर्श घोटाळा, कोळसा घोटाळा, शेण घोटाळा आणि बोफोर्स घोटाळे झाले. शरद पवार आणि राहुल गांधी आधी तुमची चौकशी होवू द्या. आधी तुम्ही आरशामध्ये बघा, तुम्ही काय केले ते, मग आम्हाला विचारा, लाज वाटते का? अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. मुंबई येथे प्रचारसभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंची मुंबई सभेतील भाषण

देशात पहिल्यांदा काँग्रेसेत्तर अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले होते. ते यांनी १३ दिवसातच काढून टाकले. यांना दुसरे कोणी सत्तेत आलेले चालत नाही. सत्ता तुम्हालाच हवी आहे. सत्तेची हाव तुम्हालाच आहे. सोनिया गांधीना पंतप्रधानासाठी विरोध करणारे शरद पवार पुन्हा वाडग घेवून सत्तेसाठी त्यांच्या मागे गेले. मनमोहनसिंग सरकारच्या काळात जेवढे घोटाळे झालेत तेवढेच घोटाळे काढा, आणि मग आम्हाला विचारा, लाज वाटते का? आघाडी म्हणजे भोक पडलेला फुगा. ज्या फुग्याला कुठला आकारच नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आघाडीवर केली.

सध्या शेतकऱ्यांसोबत शरद पवार भेट घेत आहेत. त्यांचे शेतकऱ्यांसोबत फोटो आहेत. आत्ता शरद पवारांना साक्षात्कार झाला की या देशात शेतकरी आहे आणि दुष्काळग्रस्त आहे. याआधी फक्त क्रिकेटरसोबतच त्यांचे फोटो होते. ज्या शेतकऱ्यांची चौकशी शरद पवार यांनी केली ते शेतकरी धास्तावले आहेत. मागच्यावेळी यांचे सरकार असताना यांनी शेण घोटाळा केला होता. हे काहीच सोडत नाहीत. आता कोणता घोटाळा करायचा राहिला आहे, ह्यांनाच माहित. लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही. कारण, आम्ही शिवाजी महाराजांचे मर्द मावळे आहोत, असेही उध्दव ठाकरे म्हणाले.

Intro:आदर्श घोटाळा, कोळसा घोटाळा, शेण घोटाळ्यांची शरद पवार आणि राहुल गांधी आधी तुमची चौकशी होऊ देत, मग आम्हाला विचारा लाज कशी वाटत नाही असा प्रतिहल्ला उध्दव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवर केला.
आघाडी म्हणजे भोक पडलेला फुगा. ज्यांच्या फुग्याला कुठला आकारच नाही आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले होते ते 13 दिवसातच काढून टाकले. सत्ता तुम्हालाच हवी आहे. शरद पवार संरक्षण मंत्री असताना त्यांनी जमिनी विकायला काढल्या होत्या. संरक्षण मंत्रयांच्या विमानातून गुन्हेगार शर्मा बंधूंना फिरवलं होत असा आरोपही उध्दव ठाकरेंनी शरद पवारांवर केला. Body:युतीचा जो निर्णय घेतला तो काही व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही. शिवसेनाप्रमुख यांचा आशीर्वाद घेऊन आणि वारसा घेऊन मी पुढे चाललो आहे.
शेतकऱ्यांसोबत शरद पवार भेट घेत आहेत. त्यांचे शेतकऱ्यांसोबत आणि क्रिकेटर सोबत फोटो आहेत. आत्ता शरद पवारांना साक्षात्कार झाला की या देशात शेतकरी आहे आणि दुष्काळग्रस्त आहे. ज्या शेतकऱ्यांची चौकशी शरद पवार यांनी केली ते शेतकरी धास्तावले आहेत. मागच्यावेळी यांचे सरकार असताना शेण घोटाळा केला होता हे काहीच सोडत नाहीत.
लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही कारण, आम्ही शिवाजी महाराजांचे मर्द मावळे आहोत असे उध्दव ठाकरे म्हणाले.Conclusion:बॉम्बस्फोट घडवलेला दाऊद मुंबईत आल्यास त्याला फासावर लटकवायचे काम आपलं सरकार करेल. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर देशद्रोहाचा खटला चालवला जाणार नाही कारण आम्ही ते कलमच काढून टाकणार आहोत. तुम्ही तर देश प्रेमी आहात. भारत मातेशी द्रोह करणाऱ्यांवर खटला चालणार नाही असे बोलणाऱ्या नेत्यांच्या हातात तुम्ही देश देणार आहात का असा सवाल उध्दव ठाकरेंनी काँग्रेसच्या मतदारांना केला.
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे काँग्रेसचे आधीचे असे नेते काही होऊन गेले की त्यांच्याकडे पाहून आदराने आपली मान खाली जाते, पण आता जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याकडे पाहून लाजेने मान खाली जाते.
समोरचा उमेदवार याबद्दल बोलण्याची त्याचे लायकीच नाही. काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आणि मिलिंद देवरा यांना मुंबई अध्यक्ष केलं अशी टीका उध्दव यांनी संजय निरुपम यांच्यावर केली.
जिथे मतदार मर्द असतो तिथे खासदारही मर्दच असतो. यासाठी फक्त धनुष्यबाण आणि कमळ या दोनच चिन्हांकडे लक्ष ठेवा बाकी ठिकाणी नको असे आवाहन उध्दव ठाकरेंनी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.