ETV Bharat / state

Ravikant Tupkar : आठवडाभरात सोयाबीन, कापसाला भाव द्या अन्यथा,....; रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा - अन्यथा महाराष्ट्र पेटेल

यावर्षीच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा प्रंचड नुकसान झाले आहे. सोयाबीन तसेच कापसाच्या पीकाचे मोठे नुकसान झाल्याने, त्या उत्पादनातून शेतकऱ्याचा खर्चही निघाला नाही, शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल साडेआठ हजार रुपये तर कापसाला साडेबारा हजार प्रति क्विंटल भाव द्यावा. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी व शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ( Swabhimani Shetkar Sangathan Ravikant Tupkar )यांच्या नेतृत्वात भव्य एल्गार मोर्चा ( grand Elgar march in buldhana) काढण्यात आला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 6, 2022, 8:44 PM IST

Updated : Nov 6, 2022, 9:06 PM IST

बुलढाणा : यावर्षीच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा प्रंचड नुकसान झाले आहे. सोयाबीन तसेच कापसाच्या पीकाचे मोठे नुकसान झाल्याने, त्या उत्पादनातून शेतकऱ्याचा खर्चही निघाला नाही, शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल साडेआठ हजार रुपये तर कापसाला साडेबारा हजार प्रति क्विंटल भाव द्यावा. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी व शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ( Swabhimani Shetkar Sangathan Ravikant Tupkar )यांच्या नेतृत्वात भव्य एल्गार मोर्चा ( grand Elgar march in buldhana) काढण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर माध्यमांशी संवाद साधताना

मोर्चाला पाठिंबा - या मोर्चामध्ये संपूर्ण विदर्भासह इतर जिल्ह्यातून पंधरा हजारापेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, महिला सहभागी झाल्या होत्या. तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वच राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवल्याने विविध पदाधिकारी व कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

तर संपूर्ण राज्यात आंदोलन पेटेल - सरकारने आठवडाभरात मागण्यांप्रमाणे पिकांचे भाव जाहीर करावे, अन्यथा आठवडाभरानंतर शेतकरी शेतमजुरांच्या संयमाचा बांध तुटून संपूर्ण राज्यात आंदोलन पेटेल, असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

चिमुकलीकडून सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न - या मोर्च्यात अनेक शेतकऱ्यांनी मोर्च्यात आसुळ फोडले तर अनेक शेतकऱ्यांनी हातात रुमन घेवून सरकारला इशारा देत मोर्च्यात सहभागी झाले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या एका चिमुकलीने महिला शेतकरीची वेशभूषा करीत डोक्यावर सोयाबीनची सुळी घेत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


या मार्गाने निघाला मोर्चा - रविकांत तुपकारांनी बुलढाण्याचे ग्रामदैवत असलेल्या जंगदबा मातेचे दर्शन घेऊन मोर्च्याला प्रारंभ करण्यात आले. हा मोर्चा तहसील कार्यालयापासून संगम चौक, जयस्तंभ चौक कडून जिल्हाधिकारी कार्यालजवळ पोहचला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मोर्च्याला कॉग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अनेक संघटनांनी पाठींबा दिला होता. पाठींबा देणाऱ्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी-कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्च्यात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

बुलढाणा : यावर्षीच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा प्रंचड नुकसान झाले आहे. सोयाबीन तसेच कापसाच्या पीकाचे मोठे नुकसान झाल्याने, त्या उत्पादनातून शेतकऱ्याचा खर्चही निघाला नाही, शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल साडेआठ हजार रुपये तर कापसाला साडेबारा हजार प्रति क्विंटल भाव द्यावा. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी व शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ( Swabhimani Shetkar Sangathan Ravikant Tupkar )यांच्या नेतृत्वात भव्य एल्गार मोर्चा ( grand Elgar march in buldhana) काढण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर माध्यमांशी संवाद साधताना

मोर्चाला पाठिंबा - या मोर्चामध्ये संपूर्ण विदर्भासह इतर जिल्ह्यातून पंधरा हजारापेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, महिला सहभागी झाल्या होत्या. तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वच राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवल्याने विविध पदाधिकारी व कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

तर संपूर्ण राज्यात आंदोलन पेटेल - सरकारने आठवडाभरात मागण्यांप्रमाणे पिकांचे भाव जाहीर करावे, अन्यथा आठवडाभरानंतर शेतकरी शेतमजुरांच्या संयमाचा बांध तुटून संपूर्ण राज्यात आंदोलन पेटेल, असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

चिमुकलीकडून सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न - या मोर्च्यात अनेक शेतकऱ्यांनी मोर्च्यात आसुळ फोडले तर अनेक शेतकऱ्यांनी हातात रुमन घेवून सरकारला इशारा देत मोर्च्यात सहभागी झाले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या एका चिमुकलीने महिला शेतकरीची वेशभूषा करीत डोक्यावर सोयाबीनची सुळी घेत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


या मार्गाने निघाला मोर्चा - रविकांत तुपकारांनी बुलढाण्याचे ग्रामदैवत असलेल्या जंगदबा मातेचे दर्शन घेऊन मोर्च्याला प्रारंभ करण्यात आले. हा मोर्चा तहसील कार्यालयापासून संगम चौक, जयस्तंभ चौक कडून जिल्हाधिकारी कार्यालजवळ पोहचला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मोर्च्याला कॉग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अनेक संघटनांनी पाठींबा दिला होता. पाठींबा देणाऱ्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी-कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्च्यात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Last Updated : Nov 6, 2022, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.