ETV Bharat / state

भारत बंदला बुलडाण्यात संमिश्र प्रतिसाद; रॅली काढून दर्शविला 'सीएए'ला विरोध

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात बुधवारी (दि. 29 जानेवारी) भारत बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी बुलडाणा शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला.

author img

By

Published : Jan 30, 2020, 10:19 AM IST

रॅलीत सहभगी आंदोलनकर्ते
रॅलीत सहभगी आंदोलनकर्ते

बुलडाणा - एनआरसी, सीएए व एनपीआरच्या निषेधार्थ बुधवारी (दि. २९ जानेवारी) बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला बुलडाणा शहर व जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी बुलडाणा शहरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅली काढून एनआरसी, सीएएचा विरोध केला.

रॅलीत सहभगी आंदोलनकर्ते

भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर लोकसभा व राज्यसभेत सीएए कायदा मजूर केला. त्याचबरोबर एनआरसी व एनपीआर कायद्याबाबत चर्चा सुरू आहे. याला सर्वधर्मीयांचा महाराष्ट्रासह देशभरात विरोध आहे. हे कायदे आणून देशात जातीयवाद निर्माण करण्याचा भाजप प्रयत्न असल्याचा आरोपही विविध पक्षांकडून होत आहे. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती.

हेही वाचा - बेकायदा उत्खनन बंद व्हावे म्हणून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

या बंदला शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश व्यावसायिकांची दुकाने उघडी होती. त्यामुळे नागरिकांना कुठलीच अडचण झाली नाही. दरम्यान, सकाळी साडे अकराच्या सुमारास विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जयस्तंभ चौकात सुरु असलेल्या 'शाहीनबाग' या आंदोलन स्थळापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत विविध समाजाचे शेकडो नागरिक, युवक व महिला सहभागी झाल्या होत्या. ही रॅली जयस्तंभ चौक, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक, तहसील चौक, आयडीबीआय बँक चौक, संगम चौक मार्गे जयस्तंभ चौकातील शाहीनबाग या आंदोलनाच्या ठिकाणी आली. या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार, सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात घोषणाबाजी करुन शहर दणाणून सोडले होते. या बंदला विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला. रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा - भारत बंद: शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर; व्यापारी आणि आंदोलकांमध्ये वाद

बुलडाणा - एनआरसी, सीएए व एनपीआरच्या निषेधार्थ बुधवारी (दि. २९ जानेवारी) बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला बुलडाणा शहर व जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी बुलडाणा शहरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅली काढून एनआरसी, सीएएचा विरोध केला.

रॅलीत सहभगी आंदोलनकर्ते

भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर लोकसभा व राज्यसभेत सीएए कायदा मजूर केला. त्याचबरोबर एनआरसी व एनपीआर कायद्याबाबत चर्चा सुरू आहे. याला सर्वधर्मीयांचा महाराष्ट्रासह देशभरात विरोध आहे. हे कायदे आणून देशात जातीयवाद निर्माण करण्याचा भाजप प्रयत्न असल्याचा आरोपही विविध पक्षांकडून होत आहे. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती.

हेही वाचा - बेकायदा उत्खनन बंद व्हावे म्हणून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

या बंदला शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश व्यावसायिकांची दुकाने उघडी होती. त्यामुळे नागरिकांना कुठलीच अडचण झाली नाही. दरम्यान, सकाळी साडे अकराच्या सुमारास विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जयस्तंभ चौकात सुरु असलेल्या 'शाहीनबाग' या आंदोलन स्थळापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत विविध समाजाचे शेकडो नागरिक, युवक व महिला सहभागी झाल्या होत्या. ही रॅली जयस्तंभ चौक, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक, तहसील चौक, आयडीबीआय बँक चौक, संगम चौक मार्गे जयस्तंभ चौकातील शाहीनबाग या आंदोलनाच्या ठिकाणी आली. या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार, सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात घोषणाबाजी करुन शहर दणाणून सोडले होते. या बंदला विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला. रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा - भारत बंद: शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर; व्यापारी आणि आंदोलकांमध्ये वाद

Intro:Body:बुलडाणा:- एनआरसी, सीएए व एनपीआरच्या निषेधार्थ आज बुधवारी २९ जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला बुलडण्यात तर जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी बुलडाणा शहरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅली काढून एनआरसी, सीएएचा विरोध केला.

भाजपा सरकारने बहुमताच्या जोरावर लोकसभेत व राज्यसभेत एनआरसी अर्थात नागरीकत्व संशोधन बिलाला मंजुरी दिली. परंतु या विधेयकात भारतातील
मुस्लिमांना वगळुन सर्व धार्माचे नागरीकांना समाविष्ट करून मुस्लिमांवर अन्याय करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून देशात जातीयवाद व हिंदु-मुस्लिम वाद निर्माण करण्याच कट भाजप सरकार रचित आहे. सोबतच देशाची अखंडता, बंधुत्वतेला संपुन देशाला हिंदुराष्ट्र बनविण्याच षडयंत्र भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश व्यावसायीकांची दुकाने उघडी होती. त्यामुळे नागरिकांना कुठलीच अडचण झाली नाही. दरम्यान आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास विविध सामाजिक संघटनांच्यावतीने जयस्तंभ चौकात सुरु असलेल्या शाहीनबाग या आंदोलन स्थळापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत विविध समाजाचे शेकडो नागरिक, युवक व महिला सहभागी झाल्या होत्या. ही रॅली जयस्तंभ चौक, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक, तहसिल चौक, आयडीबीआय बँक चौक, संगम चौक मार्गे या रॅलीचा समारोप शाहीनबाग येथे करण्यात आला. रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करुन कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले होते. या बंदला विविध
सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दर्शविला. रॅली दरम्यान कुठलीही अनुचित घटना होवू नये यासाठी शहर पोलिसाच्यावतीने तगडा बंदोबस्त
ठेवण्यात आला होता.

बाईट:- 1) कुणाल पैठणकर, सदस्य बहुजन क्रांती मोर्चा
2) सौ दिपाली इंगळे जिल्हाउपाध्यक्ष
राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.