ETV Bharat / state

भाजपच्या उमेदवाराला संतप्त ग्रामस्थांनी विचारला जाब, नंतर घडले असे काही...

भाजपचे उमेदवार व आमदार चैनसुख संचेती ग्रामवडी गावात प्रचाराला गेले असता, तेथील संतप्त ग्रामस्थांनी त्यांना गावातील समस्या न सोडवल्याबद्दल जाब विचारला. ग्रामस्थांच्या रोष पाहून संचेती देखील हतबल झाले होते... सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

author img

By

Published : Oct 11, 2019, 11:06 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

बुलडाणा - राज्यात सर्वत्र प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्व मतदारसंघातील उमेदवार आपल्या प्रचारासाठी गावागावात जाऊन गाठीभेटी घेत आहेत. त्याचप्रमाणे मलकापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार व माजी आमदार चैनसुख संचेती हे बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामवडी या गावात प्रचार करण्यासाठी गेले असता, त्यांना मात्र ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेवटी गावकऱ्यांचा विरोध पाहून संचेती यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.

भाजपचे उमेदवार व माजी आमदार चैनसुख संचेती यांना बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामवडी गावात ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले

हेही वाचा... आरमोरीत काँग्रेसच्या उमेदवारावर अपहरणाचा गुन्हा दाखल ; राजकिय क्षेत्रात खळबळ

आमदारच उमेदवार.. गावात आले भेटीला पण गावकऱयांनी वाचाला समस्यांचा पाढा

उमेदवार चैनसुख संचेती हे ग्रामवडी गावात येताच ग्रामस्थांनी या गावात विकास केला नाही, म्हणून त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. नांदुरा तालुक्यातील वडी गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नाही, गावाजवळील केदार नदीवर पूल नाही, वाडी ते पोटा रस्त्याचे काम अर्धवट असल्याने ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा ग्रामस्थांनी याबद्दल सांगूनही संचेती यांनी फक्त आश्वासन दिल्याचे गावातील लोकांचे म्हणने होते, यामुळे आमदार संचेती गावात प्रचारासाठी येताच संतप्त ग्रामस्थांनी त्यांना याबद्दल जाब विचारला.

हेही वाचा... शरद पवार तुम्हाला स्वस्थ बसू देणारच नाही - उध्दव ठाकरे

ग्रामस्थांचा रोष पाहून संचेती देखील हतबल झाले होते. त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना आश्वासन देत त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. मलकापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार चैनसुख संचेती हे मागील 25 वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र आमदार निधीतून या गावात एक ही काम न केल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहे.

बुलडाणा - राज्यात सर्वत्र प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्व मतदारसंघातील उमेदवार आपल्या प्रचारासाठी गावागावात जाऊन गाठीभेटी घेत आहेत. त्याचप्रमाणे मलकापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार व माजी आमदार चैनसुख संचेती हे बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामवडी या गावात प्रचार करण्यासाठी गेले असता, त्यांना मात्र ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेवटी गावकऱ्यांचा विरोध पाहून संचेती यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.

भाजपचे उमेदवार व माजी आमदार चैनसुख संचेती यांना बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामवडी गावात ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले

हेही वाचा... आरमोरीत काँग्रेसच्या उमेदवारावर अपहरणाचा गुन्हा दाखल ; राजकिय क्षेत्रात खळबळ

आमदारच उमेदवार.. गावात आले भेटीला पण गावकऱयांनी वाचाला समस्यांचा पाढा

उमेदवार चैनसुख संचेती हे ग्रामवडी गावात येताच ग्रामस्थांनी या गावात विकास केला नाही, म्हणून त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. नांदुरा तालुक्यातील वडी गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नाही, गावाजवळील केदार नदीवर पूल नाही, वाडी ते पोटा रस्त्याचे काम अर्धवट असल्याने ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा ग्रामस्थांनी याबद्दल सांगूनही संचेती यांनी फक्त आश्वासन दिल्याचे गावातील लोकांचे म्हणने होते, यामुळे आमदार संचेती गावात प्रचारासाठी येताच संतप्त ग्रामस्थांनी त्यांना याबद्दल जाब विचारला.

हेही वाचा... शरद पवार तुम्हाला स्वस्थ बसू देणारच नाही - उध्दव ठाकरे

ग्रामस्थांचा रोष पाहून संचेती देखील हतबल झाले होते. त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना आश्वासन देत त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. मलकापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार चैनसुख संचेती हे मागील 25 वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र आमदार निधीतून या गावात एक ही काम न केल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहे.

Intro:Body:बुलडाणा:- सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरूय , अशातच मलकापूर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार तथा आमदार चैनसुख संचेती हे बुलडाणा जिल्ह्यातील ग्राम वडी या गावात काल  सायंकाळी प्रचार  करण्यासाठी गेले होते .. मात्र संचेती गावात येताच ग्रामस्थांनी संचेती याना गावात विकास केला नाहीय , म्हणून त्यांच्यावर  अनेक प्रश्नाचा भडीमार केलाय , यावेळी संचेती याना गावातून काढता पाय घ्यावा लागला .. आणि ग्रामस्थांचा प्रश्नाचा भडीमार सुरु असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय .. नांदुरा तालुक्यातील वडी गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नाही , गावाजवळील केदार नदीवर पुल नाही ,वाडी ते पोटा रस्त्याचे काम अर्धवट  असल्याने ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागतोय .. अनेकवेळा ग्रामस्थांनी याबद्दल सांगूनही संचेती यांनी फक्त आश्वासन दिलेय .. त्यामुळे आमदार संचेती गावात प्रचारासाठी येताच संतप्त ग्रामस्थ आमदार संचेती याना याबद्दल जाब विचारला असता त्यांना काहीच बोलता आले नाहीय .. शिवाय आश्वासन दिलेय आणि त्याठिकाणावरून काढताय पाय घेतला  .. मलकापूर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार आमदार  चैनसुख संचेती हे मागील  25 वर्षांपासून या मतदार संगःचे प्रतिनिधित्व करतात ..  मात्र आमदार निधीतून या गावात एक ही काम न केल्याचा आरोप करत ग्रामथानी नाराजी व्यक्त केलीय .. यावेळी संचेती सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे सह भाजपचे अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय .. 


-वसीम शेख, बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.