ETV Bharat / state

'वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी'

मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे राज्यातील पहिली पाणी परिषद मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा पहिल्या पाणी परिषदेत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.

author img

By

Published : Feb 28, 2019, 9:06 AM IST

पाणी परिषद

बुलडाणा - सातत्याने पडणारा दुष्काळ पाहता उपयुक्त असलेला वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा पहिल्या पाणी परिषदेत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.

पाणी परिषद
मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे राज्यातील पहिली पाणी परिषद मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार प्रताप जाधव, जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीचे विकास डाळीमकर, प्रविण खंडेलवाल, श्याम पठाडे, भास्कर कदम, ज्ञानेश्वर डहाके, डॉ. सुकेश झंवर माजी पाटबंधारे मंत्री भारत बोंद्रे, नदीजोड तज्ज्ञ डॉ. स्वामी, जलदूत डॉ. सतीश चव्हाण, वल्लभ देशमुख, जलसल्लागार माधव कोटस्थाने, नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके आदी उपस्थित होते.


वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार झालेला आहे. मात्र घाटावरील भागाला याचा लाभ होणार नाही. पैनगंगा प्रकल्पापर्यंत हे पाणी असल्यास घाटावरील भागासह अगदी यवतमाळ आणि मराठवाड्यालाही याचा लाभ होऊ शकतो. त्यादृष्टीने नदीजोड प्रकल्पाबाबत जागृती होऊन जिल्ह्यात ही लोकचवळ म्हणून उभी रहावी, यासाठी ही पाणी परिषद आयोजित करण्यात आल्याचे यावेळी खासदार प्रताप जाधव यांनी सांगितले. तर महाबीजचे संचालक वल्लभ देशमुख म्हणाले, की तापी आणि गोदावरी हे दोन्ही नदीखोरे जोडल्या जाऊन पाण्याची उपलब्धता या भागात निर्माण होईल, शेतकऱ्यांकडे सुबत्ता येईल. हा प्रकल्प मार्गी लागल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मिटण्यास मदत होईल. यासोबतच गोसेखुर्द ते नळगंगा या 400 किमी अंतरामधील बरेच बारकावे त्यांनी स्पष्ट केले.


नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके म्हणाले, की गोसेखुर्दमधून वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यापैकी 100 टीएमसी पाणी मिळाल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांच्या पाण्याची समस्या सुटेल. बुलडाणा जिल्ह्यालाही यातून जवळपास 25 टिएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल. वैनगंगेचे हे पाणी पेनटाकळी प्रकल्पात आणण्यासाठी अवघड 47 किमी लांबीच्या पट्ट्याचे सर्व्हेक्षण अपेक्षीत आहे. पाणी प्रश्नावर सजग असलेल्या खासदार प्रताप जाधव यांनी त्यासाठी विकास निधीतून पाच लाख रुपये देऊन या 47 किमीच्या डीपीआरसाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. त्यामुळे आता प्रत्येकाने कामाला लागून ही लोकचवळ उभी करावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

undefined


यावेळी जल सल्लागार माधव कोटस्थाने, जलदूत सतीश चव्हाण यांनीही उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. सोबतच नदी जोड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना काय फायदे मिळतील, तथा हा प्रकल्प आवश्यक का आहे? शेतीसाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान नदी जोड प्रकल्प एक लोकचळवळ होऊन पीपीपीच्या माध्यमातून हा प्रकल्प विकसीत करण्यासाठी बुलडाण्यात होत असलेल्या प्रयत्नाबद्दल या परिषदेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. टंचाईवर मात करण्यासाठी तथा कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी हा प्रकल्प गरजेचे असल्याचे गडकरी यांनी पत्रात नमूद केल्याची माहिती खासदार प्रताप जाधव यांनी यावेळी दिली.

बुलडाणा - सातत्याने पडणारा दुष्काळ पाहता उपयुक्त असलेला वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा पहिल्या पाणी परिषदेत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.

पाणी परिषद
मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे राज्यातील पहिली पाणी परिषद मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार प्रताप जाधव, जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीचे विकास डाळीमकर, प्रविण खंडेलवाल, श्याम पठाडे, भास्कर कदम, ज्ञानेश्वर डहाके, डॉ. सुकेश झंवर माजी पाटबंधारे मंत्री भारत बोंद्रे, नदीजोड तज्ज्ञ डॉ. स्वामी, जलदूत डॉ. सतीश चव्हाण, वल्लभ देशमुख, जलसल्लागार माधव कोटस्थाने, नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके आदी उपस्थित होते.


वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार झालेला आहे. मात्र घाटावरील भागाला याचा लाभ होणार नाही. पैनगंगा प्रकल्पापर्यंत हे पाणी असल्यास घाटावरील भागासह अगदी यवतमाळ आणि मराठवाड्यालाही याचा लाभ होऊ शकतो. त्यादृष्टीने नदीजोड प्रकल्पाबाबत जागृती होऊन जिल्ह्यात ही लोकचवळ म्हणून उभी रहावी, यासाठी ही पाणी परिषद आयोजित करण्यात आल्याचे यावेळी खासदार प्रताप जाधव यांनी सांगितले. तर महाबीजचे संचालक वल्लभ देशमुख म्हणाले, की तापी आणि गोदावरी हे दोन्ही नदीखोरे जोडल्या जाऊन पाण्याची उपलब्धता या भागात निर्माण होईल, शेतकऱ्यांकडे सुबत्ता येईल. हा प्रकल्प मार्गी लागल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मिटण्यास मदत होईल. यासोबतच गोसेखुर्द ते नळगंगा या 400 किमी अंतरामधील बरेच बारकावे त्यांनी स्पष्ट केले.


नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके म्हणाले, की गोसेखुर्दमधून वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यापैकी 100 टीएमसी पाणी मिळाल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांच्या पाण्याची समस्या सुटेल. बुलडाणा जिल्ह्यालाही यातून जवळपास 25 टिएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल. वैनगंगेचे हे पाणी पेनटाकळी प्रकल्पात आणण्यासाठी अवघड 47 किमी लांबीच्या पट्ट्याचे सर्व्हेक्षण अपेक्षीत आहे. पाणी प्रश्नावर सजग असलेल्या खासदार प्रताप जाधव यांनी त्यासाठी विकास निधीतून पाच लाख रुपये देऊन या 47 किमीच्या डीपीआरसाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. त्यामुळे आता प्रत्येकाने कामाला लागून ही लोकचवळ उभी करावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

undefined


यावेळी जल सल्लागार माधव कोटस्थाने, जलदूत सतीश चव्हाण यांनीही उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. सोबतच नदी जोड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना काय फायदे मिळतील, तथा हा प्रकल्प आवश्यक का आहे? शेतीसाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान नदी जोड प्रकल्प एक लोकचळवळ होऊन पीपीपीच्या माध्यमातून हा प्रकल्प विकसीत करण्यासाठी बुलडाण्यात होत असलेल्या प्रयत्नाबद्दल या परिषदेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. टंचाईवर मात करण्यासाठी तथा कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी हा प्रकल्प गरजेचे असल्याचे गडकरी यांनी पत्रात नमूद केल्याची माहिती खासदार प्रताप जाधव यांनी यावेळी दिली.

Intro:स्टोरी:-नदी जोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी , राज्यातील पैहली पाणी परिषदेत मान्यवरांचा सुर..

बुलडाणा : सातत्याने पडणारा दुष्काळ पाहता उपयुक्त असलेला वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा मंगळवारी 26 फेब्रुवारीला मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या नदी जोड प्रकल्पाच्या राज्यातील पैहली पाणी परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केली.Body:खा. प्रतापराव जाधव, जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीचे विकास डाळीमकर, प्रविण खंडेलवाल, श्याम पठाडे, भास्कर कदम, ज्ञानेश्वर डहाके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या पाणी परिषदेच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर होते. प्रमुख पाहूणे म्हणून माजी पाटबंधारे मंत्री भारत बोंद्रे, नदीजोड तज्ज्ञ डॉ. स्वामी, नागपूर येथील जलदूत डॉ. सतीश चव्हाण, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, पूर्ती ग्रुपचे जलसल्लागार माधवराव कोटस्थाने, नजीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके यांची उपस्थित होती.
वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार झालेला आहे. मात्र घाटावरील भागाला याचा लाभ होणार नाही. पैनगंगा प्रकल्पापर्यन्त हे पाणी असल्यास घाटावरील भागासह अगदी यवतमाळ आणि मराठवाड्यालाही याचा लाभ होऊ शकतो. त्यादृष्टीने नदीजोड प्रकल्पाबाबत जागृती होऊन जिल्ह्यात ही एक लोकचवळ म्हणून उभी रहावी यासाठी ही पाणी परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे यावेळी खा. प्रतापराव जाधव यांनी सांगितले. तर महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख म्हणाले की तापी आणि गोदावरी हे दोन्ही नदी खोरे जोडल्या जावून पाण्याची उपलब्धता या भागात निर्माण होईल शेतकऱ्यांकडे सुबत्ता येईल. हा प्रकल्प मार्गी लागल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मिटण्यास मदत होईल. यासोबतच गोसेखुर्द ते नळगंगा या ४०० किमी अंतरामधील बरेच बारकावे त्यांनी स्पष्ट केले.नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके म्हणाले की, गोसेखुर्दमधून वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यापैकी १०० टीएमसी पाणी मिळाल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांची पाण्याची समस्या सुटेल. बुलडाणा जिल्ह्यालाही यातून जवळपास २५ टिएमसी पाणी उपलब्ध होऊ शकले. वैनगंगेचे हे पाणी पेनटाकळी प्रकल्पात आणण्यासाठी अवघड ४७ किमी लांबीच्या पट्ट्याचे सर्व्हेक्षण अपेक्षीत आहे. पाणी प्रश्नावर सजग असलेल्या खा. प्रतापराव जाधव यांनी त्यासाठी स्वत:च्या विकास निधीतून पाच लाख रुपये देऊन या ४७ किमीच्या डीपीआरसाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले. त्यामुळे आता प्रत्येकाने कामाला लागून ही लोकचवळ उभी करावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जल सल्लागार माधवराव कोटस्थाने, जलदूत सतीश चव्हाण यांनीही उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. सोबतच नदी जोड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना काय फायदे मिळतील तथा हा प्रकल्प आवश्यक का आहे? शेतीसाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली.दरम्यान नदी जोड प्रकल्प एक लोकचळवळ होऊन पीपीपीच्या माध्यमातून हा प्रकल्प विकसीत करण्यासाठी बुलडाण्यात होत असलेल्या प्रयत्नाबद्दल या परिषदेस शुभेच्छा दिल्या होत्या. टंचाईवर मात करण्यासाठी तथा कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी हा प्रकल्प गरजेचे असल्याचे गडकरी यांनी पत्रात नमूद केले असल्याची माहिती खा. प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणातून हे पत्र वाचून दाखविले.

बाईट:- खा.प्रतापराव जाधव,खासदार बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.