ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये गेले हातचे काम.. आत्मनिर्भर बनत महिलेने केली परिस्थितीवर मात

author img

By

Published : Jun 7, 2020, 8:45 PM IST

कोरोनामुळे अनेकांचे हातचे काम गेले. काही लोकांनी शासनाच्या तर काहींनी सामाजिक संस्थेमार्फत फुकटचे धान्य मिळाल्यावर कोरोनामुळे काम बंद झाले असे म्हणत घरीच राहणे पसंद केले. पण या संकटाच्या काळात हातावर हात ठेवून मदतीची अपेक्षा न करता जगण्याचा नवीन मार्ग शोधून कुटुंबाचा गाडा चालविण्याचे कार्य एक महिलेने केले आहे.

business_in_corona
आत्मनिर्भर बनत महिलेने अशी केली परिस्थितीवर मात.

भंडारा - कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. काही लोकांनी शासनाच्या तर काहींनी सामाजिक संस्थेमार्फत फुकटचे धान्य मिळाल्यावर कोरोनामुळे काम बंद झाले असे म्हणत घरीच राहणे पसंद केले. पण या संकटाच्या काळात हातावर हात ठेवून मदतीची अपेक्षा न करता जगण्याचा नवीन मार्ग शोधून कुटुंबाचा गाडा चालविण्याचे कार्य एक महिलेने केले आहे. त्यांनी मदतीसाठी रांगा न लावता स्वतः समोर ग्राहकाच्या रांगा लावून समाजासमोर नवीन आदर्श ठेवला आहे.

आत्मनिर्भर बनत महिलेने केली परिस्थितीवर मात.

माजी पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे या लॉकडाऊनच्या पूर्वी खानावळ चालवीत होते. या खानावळीपासून त्यांना 25 ते 30 हजार रुपयांचा नफा महिन्याकाठी होत असे. मात्र, लॉकडाउनमुळे अडीच महिन्यापासून खानावळ बंद आहे. खानावळ बंद असल्याने आवक बंद झाली. आर्थिक संकट आले. अंगावर बँकेचे कर्ज, दुकानाचा खर्च अशा अनेक समस्या उभ्या ठाकल्या. पण त्या हरल्या नाहीत. संकटावर मात करण्यासाठी त्यांची धडपड नेहमीची. याही संकटात त्यांनी आपला जगण्याचा मार्ग शोधला. खानावळ बंद झाल्यावर त्यांनी भाजीपाला विक्रीचा पर्याय निवडला.

business_in_corona
आत्मनिर्भर बनत महिलेने केली परिस्थितीवर मात.

दोन महिन्यापासून भर उन्हात त्या भाजीपाला विकून प्रपंच चालवत आहेत. यात त्यांचा मुलगा रोशन मदतीला आहे. पुष्पा भुरे या 30 वर्षापूर्वी भाजीपाला विकण्याचे व्यवसाय करीत होत्या. मात्र, कालांतराने त्यांनी खानावळ सुरू केली आणि त्यात त्यांना चांगला नफा मिळू लागला. मात्र, लॉकडाऊनमुळे ही खानावळ बंद झाली. त्यामुळे पुन्हा रस्त्यावर बसून आणि दर दिवशी वेगळ्या गावात जाऊन भाजी विक्रीचा काम त्यांनी सुरू केले. माजी पंचायत समितीची सदस्य असल्याने समाजात त्यांचा एक आदर होता तसेच खानावळ सुरू केल्यापासून आर्थिक परिस्थिती सुधारली होती. मात्र, या सर्व गोष्टी दूर ठेवत स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी त्यांनी रस्त्यावर बसून भाजी विक्रीचे काम सुरू केले. या व्यवसायातून त्यांना खानावळ चालविण्याइतके पैसे मिळत नसले तरी स्वाभिमानाने जगण्याइतके पैसे तर नक्कीच मिळत आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी आत्मनिर्भर बनून मदतीसाठी रांगा न लावता स्वतःच्या कर्तृत्वावर लोकांच्या रांगा आपल्या दुकानासमोर उभ्या केल्या. सध्या ते भाजीपाला व फळे विक्रीसह फळ व भाजीपाला वाहतूक करून स्वतःच्या कुटुंबाचा गाडा रेटत आहेत.

भंडारा - कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. काही लोकांनी शासनाच्या तर काहींनी सामाजिक संस्थेमार्फत फुकटचे धान्य मिळाल्यावर कोरोनामुळे काम बंद झाले असे म्हणत घरीच राहणे पसंद केले. पण या संकटाच्या काळात हातावर हात ठेवून मदतीची अपेक्षा न करता जगण्याचा नवीन मार्ग शोधून कुटुंबाचा गाडा चालविण्याचे कार्य एक महिलेने केले आहे. त्यांनी मदतीसाठी रांगा न लावता स्वतः समोर ग्राहकाच्या रांगा लावून समाजासमोर नवीन आदर्श ठेवला आहे.

आत्मनिर्भर बनत महिलेने केली परिस्थितीवर मात.

माजी पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे या लॉकडाऊनच्या पूर्वी खानावळ चालवीत होते. या खानावळीपासून त्यांना 25 ते 30 हजार रुपयांचा नफा महिन्याकाठी होत असे. मात्र, लॉकडाउनमुळे अडीच महिन्यापासून खानावळ बंद आहे. खानावळ बंद असल्याने आवक बंद झाली. आर्थिक संकट आले. अंगावर बँकेचे कर्ज, दुकानाचा खर्च अशा अनेक समस्या उभ्या ठाकल्या. पण त्या हरल्या नाहीत. संकटावर मात करण्यासाठी त्यांची धडपड नेहमीची. याही संकटात त्यांनी आपला जगण्याचा मार्ग शोधला. खानावळ बंद झाल्यावर त्यांनी भाजीपाला विक्रीचा पर्याय निवडला.

business_in_corona
आत्मनिर्भर बनत महिलेने केली परिस्थितीवर मात.

दोन महिन्यापासून भर उन्हात त्या भाजीपाला विकून प्रपंच चालवत आहेत. यात त्यांचा मुलगा रोशन मदतीला आहे. पुष्पा भुरे या 30 वर्षापूर्वी भाजीपाला विकण्याचे व्यवसाय करीत होत्या. मात्र, कालांतराने त्यांनी खानावळ सुरू केली आणि त्यात त्यांना चांगला नफा मिळू लागला. मात्र, लॉकडाऊनमुळे ही खानावळ बंद झाली. त्यामुळे पुन्हा रस्त्यावर बसून आणि दर दिवशी वेगळ्या गावात जाऊन भाजी विक्रीचा काम त्यांनी सुरू केले. माजी पंचायत समितीची सदस्य असल्याने समाजात त्यांचा एक आदर होता तसेच खानावळ सुरू केल्यापासून आर्थिक परिस्थिती सुधारली होती. मात्र, या सर्व गोष्टी दूर ठेवत स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी त्यांनी रस्त्यावर बसून भाजी विक्रीचे काम सुरू केले. या व्यवसायातून त्यांना खानावळ चालविण्याइतके पैसे मिळत नसले तरी स्वाभिमानाने जगण्याइतके पैसे तर नक्कीच मिळत आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी आत्मनिर्भर बनून मदतीसाठी रांगा न लावता स्वतःच्या कर्तृत्वावर लोकांच्या रांगा आपल्या दुकानासमोर उभ्या केल्या. सध्या ते भाजीपाला व फळे विक्रीसह फळ व भाजीपाला वाहतूक करून स्वतःच्या कुटुंबाचा गाडा रेटत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.