ETV Bharat / state

पाणीटंचाई : नातेवाईकांनी गावात येणे केले बंद; धरण उशाला, कोरड घश्याला अशी अवस्था

पाण्याच्या समस्येमुळे गावात पाहुणे, नातेवाईक यायला तयार नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

author img

By

Published : May 11, 2019, 7:41 PM IST

पाणीटंचाई : नातेवाईकांनी गावात येणे केले बंद; धरण उशाला, कोरड घश्याला अशी अवस्था

भंडारा - जिल्ह्यातील 1200 लोकसंख्येची वस्ती असलेल्या येदूरबूची गावात सद्या पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. महत्वाचे म्हणजे या गावालगतच बावनथडी धरण असून प्रशासनाचे नियोजन नसल्याने 'धरण उशाला, कोरड घश्याला' अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे. पाण्याच्या समस्येमुळे गावात पाहुणे, नातेवाईक यायला तयार नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे पाणीटंचाईवर तोडगा काढावी, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. मात्र प्रशासनाने गावात भीषण पाणी टंचाई नसल्याचे सांगितले आहे.

पाणीटंचाई : नातेवाईकांनी गावात येणे केले बंद; धरण उशाला, कोरड घश्याला अशी अवस्था


तुमसर तालुक्यातील येदूरबूची गावात सध्या पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थ पहाटे 3 वाजल्यापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहरीतून पायपीट करत पाणी भरतात. येदरबुची हे गाव संपूर्णपणे आदिवासी गाव असून येथील नागरिक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. तर गावात 4 ठिकाणी सार्वजनिक हात पंप ( बोरवेल पंप ) असून या हातपंपांना पाणी सद्या येत नाही. विशेष म्हणजे गावालगतच बावनथडी धरण असून प्रशासनाचे नियोजन नसल्याने गावकऱ्यांना 'धरण माझ्या उशाला आणि कोरड माझ्या घश्याला' म्हणायची वेळ आली आहे.


जिल्हा प्रशासनच्यावतीने राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत 30 हजार लिटरचे जलकुंभ तयार करण्यात आले आहे. मात्र आठवड्यात फक्त एकदा 15 हजार लिटरचा जलकुंभ भरला जातो. गावकऱ्यांसाठी तयार करण्यात येणारी राष्ट्रीय पेयजल योजना 'पांढरा हत्ती' बनला आहे. गावापासून 1 किलो मीटर अंतरावरील एका शेतात असलेल्या विहिरीला थोड्या प्रमाणात पाणी असून 1200 लोकसंख्येचे गाव पहाटे 3 वाजल्यापासून विहिरीवर पाणी भरण्यासाठी रांगा लावतात.


सर्व गावकरी एकत्र पाणी भरत असल्यामुळे या विहिरीचे पाणी गढुळ होते. तेच पाणी गावातील नागरिक पिण्याकरता नाईलाजास्तव वापरतात. या पाणी समस्येचा परिणाम नातेसंबंधावर पडला आहे. या गावातील लोकांचे नातेवाईक मागील 3 वर्षापासून या गावात यायला तयार नाही. अशी खंत गावकऱ्यांनी सांगितली.

भंडारा - जिल्ह्यातील 1200 लोकसंख्येची वस्ती असलेल्या येदूरबूची गावात सद्या पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. महत्वाचे म्हणजे या गावालगतच बावनथडी धरण असून प्रशासनाचे नियोजन नसल्याने 'धरण उशाला, कोरड घश्याला' अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे. पाण्याच्या समस्येमुळे गावात पाहुणे, नातेवाईक यायला तयार नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे पाणीटंचाईवर तोडगा काढावी, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. मात्र प्रशासनाने गावात भीषण पाणी टंचाई नसल्याचे सांगितले आहे.

पाणीटंचाई : नातेवाईकांनी गावात येणे केले बंद; धरण उशाला, कोरड घश्याला अशी अवस्था


तुमसर तालुक्यातील येदूरबूची गावात सध्या पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थ पहाटे 3 वाजल्यापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहरीतून पायपीट करत पाणी भरतात. येदरबुची हे गाव संपूर्णपणे आदिवासी गाव असून येथील नागरिक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. तर गावात 4 ठिकाणी सार्वजनिक हात पंप ( बोरवेल पंप ) असून या हातपंपांना पाणी सद्या येत नाही. विशेष म्हणजे गावालगतच बावनथडी धरण असून प्रशासनाचे नियोजन नसल्याने गावकऱ्यांना 'धरण माझ्या उशाला आणि कोरड माझ्या घश्याला' म्हणायची वेळ आली आहे.


जिल्हा प्रशासनच्यावतीने राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत 30 हजार लिटरचे जलकुंभ तयार करण्यात आले आहे. मात्र आठवड्यात फक्त एकदा 15 हजार लिटरचा जलकुंभ भरला जातो. गावकऱ्यांसाठी तयार करण्यात येणारी राष्ट्रीय पेयजल योजना 'पांढरा हत्ती' बनला आहे. गावापासून 1 किलो मीटर अंतरावरील एका शेतात असलेल्या विहिरीला थोड्या प्रमाणात पाणी असून 1200 लोकसंख्येचे गाव पहाटे 3 वाजल्यापासून विहिरीवर पाणी भरण्यासाठी रांगा लावतात.


सर्व गावकरी एकत्र पाणी भरत असल्यामुळे या विहिरीचे पाणी गढुळ होते. तेच पाणी गावातील नागरिक पिण्याकरता नाईलाजास्तव वापरतात. या पाणी समस्येचा परिणाम नातेसंबंधावर पडला आहे. या गावातील लोकांचे नातेवाईक मागील 3 वर्षापासून या गावात यायला तयार नाही. अशी खंत गावकऱ्यांनी सांगितली.

Intro:Anc : उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला जाण्याची लगबग सुरू होते, मात्र जिल्ह्यातील एक गाव असा आहे जिथे मागील 3 वर्ष्यापासून मुले मामाच्या गावातच आलेच नाही. गावातील 1 किमी अंतरावर असलेली एक विहीर संपूर्ण गावाची तहान भागवत आहे, गावकरी रोज मध्य रात्रीपासून पाणी भरतात या भीषण पाणी टंचाईवर तोडगा काढावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. तर तहसीलदार सर्व काही सुरळीत असून पाणी टंचाई जरी असली तरी भीषण पाणी टंचाई नसल्याचे सांगत आहेत.Body:तुमसर तालुक्यातील येदूरबूची गावात सध्या पाणी टंचाई ने भीषण रूप धारण केल असुन येथील ग्रामस्थ पहाटे 3 वाजता पासून एक किलो मीटर दूर असलेल्या एका विहरीतून पायपिट करत पाणी आणतात विशेष म्हणजे गावा लगत बावनथडी धरण असून प्रशासनाचा नियोजन नसल्याने गावकऱ्यांना धरण माझ्या उशाला आणि कोरड माझ्या घश्याला म्हण्याची वेळ आली आहे. येदरबुची हे गाव संपूर्णपणे आदीवासी गाव असून येथील नागरिक पाण्याकरिता भटकंती करत आहेत. गावातील विहिरींनी देखील तळ गाठले तर गावात ४ ठिकाणी सार्वजनिक हात पंप ( बोरवेल पंप ) असून हात पंपांना पाणी येत नाही. जिल्हा प्रशासनच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत 30 हजार लिटर चे जलकुंभ तयार करण्यात आले आहे, मात्र आठवड्यात फक्त एकदा 15 हजार लिटरचा जलकुंभ भरला जातो. गावकऱ्यांना करिता तयार करण्यात येणारी राष्ट्रीय पेयजल योजना पांढरा हत्ती बनला आहे. तर गावा पासून एक किलो मीटर अंतरावरील एका शेतात असलेल्या विहिरीला थोड्या प्रमाणात पाणी असून 1200 लोकसंख्येचे गाव पहाटे 3 वाजता पासून विहिरीवर पाणी भरण्या करिता रांगा लावतात त्यामुळे सर्व गावकरी एकत्र पाणि भरत असल्यामुळे या विहिरीचा पाणि पण गढुळ होत असून गावातील लोक तोच पाणि पिण्याकरिता मजबूर झाले आहेत. काही लोकांना पाणि मिळत नसून नागरिक स्वयंपाक करायला सुद्धा पाणि मिळत नाही असे गावकरी सांगत आहेत, या सर्व समस्याचा परिणाम सरळ नातेसंबंधावर पडला आहे या गावतिल लोकांचे नातेवाइक मागील 3 वर्षापासून या गावात यायला तयार नाही त्यामुळे मुलांना त्यांच्या मामाच्या गावाला यायला मिळत नसल्याची खंत गावकरी बोलून दाखवीत आहेत.

1)राजलीला टेकाम बाइट (गावकरी),,

2)भीमाबाई कुंभारे बाइट (गावकरी)

3)अनिल टेकाम बाइट (गावकरी),,,

या पाणी टंचाईचा फटका केवळ मनुष्यना होत नाही तर जनावरांनाही होत आहे, गावालगत असलेल्या तलावातील गढूळ पाणी पाजून येथील ग्रामस्थ मुक्या जनावरांची तहान भागवितात, गावात पाणी नसल्याने गावात घरकुल योजने अंतर्गत तयार करण्यात येणारी अनेक घरांचे काम पाण्यामुळे थांबले आहेत, याबाबत तहसीलदार यांना या परिस्थिति विषयी विचारले असता प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे गावात पाणी समस्या आहे मात्र अतिशय गंभीर स्वरूपाची नाही असे त्यांनी सांगितले

5)नीलेश गौंड बाइट (तहसीलदार तुमसर),,,

एकंदरीतच कागदावर असलेली उपाय योजना प्रत्यक्षात उतरून येदुरबुची गावात पाणी पोहचेल का व नातेवाईक बंदी असलेला श्रापातुन येदुरबुची गावाची सुटका होइल का हा खरा प्रश्न आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.