ETV Bharat / state

भंडाऱ्यात नालेसफाईची झाली पोलखोल, घरात शिरले पाणी

मागील चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील नाल्याच्या शेजारी आणि सखल भागात पाणी शिरले. शहरातील मोठ्या नाल्याशेजारी असलेल्या बैरागी वाड्यातही पाणी शिरले, यापैकी २० घरात पाणी शिरल्याने लोकांची चांगलीच तारांबर उडाली.

author img

By

Published : Jul 2, 2019, 4:44 PM IST

Updated : Jul 2, 2019, 8:29 PM IST

भंडाऱ्यात घरात शिरले पाणी

भंडारा - भंडारा नगरपालिकेचे नालेसफाईचे पितळ मुसळधार पावसात उघडे पडले आहे. रात्री झालेल्या पावसामुळे शहराच्या बऱ्याच भागात पाणी साचले आहे. बैरागी वार्डात २० लोकांच्या घरात पाणी शिरल्याने या लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून रात्र जागून काढावी लागली आहे. भंडारा नगरपालिकेने यावर्षी शहरातील नालेसफाई पूर्ण केली नसल्याने त्याचा फटका आता नागरिकांना सहन करावा लागत आहे.

भंडाऱ्यात घरात शिरले पाणी

मागील चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील नाल्याच्या शेजारी आणि सखल भागात पाणी शिरले. शहरातील मोठ्या नाल्याशेजारी असलेल्या बैरागी वाड्यातही पाणी शिरले, यापैकी २० घरात पाणी शिरल्याने लोकांची चांगलीच तारांबर उडाली. घराच्या आत जवळपास २ फुटापर्यंत पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य भिजले. साठवून ठेवलेले कांदे सर्वत्र पसरले. पाण्यामुळे फ्रीज खराब झाला तसेच इतरही बऱ्याच गोष्टींचे नुकसान झाले असून घराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

घरात पाणी शिरल्याने नागरिकांना वीजपुरवठा बंद करून पाणी काढत रात्र जागून काढावी लागली. घरात पाणी शिरल्याचे माहीत होताच काही सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक मदतीसाठी पोहोचले. तर घरात पाणी शिरल्याने लोकांचे जे आर्थिक नुकसान झाले, त्याची नुकसान भरपाई भंडारा नगरपालिकेने द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

यावर्षी भंडारा नगरपालिकेने जूनमध्ये नाले सफाईच्या कामाला सुरुवात केली होती. खरेतर ही नालेसफाई मेमध्ये होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे झाले नाही. जूनमध्ये सुरू झालेली नालेसफाई अर्ध्यावरच आली असताना पाऊस सुरू झाला आणि नालेसफाई अर्ध्यावरच थांबली. त्यामुळे ज्या ठिकाणी नालेसफाई पूर्ण झाली नाही त्या भागात मुसळधार पावसानंतर नाल्याचे पाणी रस्त्यावर आणि लोकांच्या घरात शिरत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठे त्रास सहन करावे लागत आहे. चुकी नगरपालिकेची आणि शिक्षा नागरिक भोगत असल्याचे चित्र सध्या भंडारा शहरात पाहायला मिळत आहे.

भंडारा - भंडारा नगरपालिकेचे नालेसफाईचे पितळ मुसळधार पावसात उघडे पडले आहे. रात्री झालेल्या पावसामुळे शहराच्या बऱ्याच भागात पाणी साचले आहे. बैरागी वार्डात २० लोकांच्या घरात पाणी शिरल्याने या लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून रात्र जागून काढावी लागली आहे. भंडारा नगरपालिकेने यावर्षी शहरातील नालेसफाई पूर्ण केली नसल्याने त्याचा फटका आता नागरिकांना सहन करावा लागत आहे.

भंडाऱ्यात घरात शिरले पाणी

मागील चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील नाल्याच्या शेजारी आणि सखल भागात पाणी शिरले. शहरातील मोठ्या नाल्याशेजारी असलेल्या बैरागी वाड्यातही पाणी शिरले, यापैकी २० घरात पाणी शिरल्याने लोकांची चांगलीच तारांबर उडाली. घराच्या आत जवळपास २ फुटापर्यंत पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य भिजले. साठवून ठेवलेले कांदे सर्वत्र पसरले. पाण्यामुळे फ्रीज खराब झाला तसेच इतरही बऱ्याच गोष्टींचे नुकसान झाले असून घराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

घरात पाणी शिरल्याने नागरिकांना वीजपुरवठा बंद करून पाणी काढत रात्र जागून काढावी लागली. घरात पाणी शिरल्याचे माहीत होताच काही सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक मदतीसाठी पोहोचले. तर घरात पाणी शिरल्याने लोकांचे जे आर्थिक नुकसान झाले, त्याची नुकसान भरपाई भंडारा नगरपालिकेने द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

यावर्षी भंडारा नगरपालिकेने जूनमध्ये नाले सफाईच्या कामाला सुरुवात केली होती. खरेतर ही नालेसफाई मेमध्ये होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे झाले नाही. जूनमध्ये सुरू झालेली नालेसफाई अर्ध्यावरच आली असताना पाऊस सुरू झाला आणि नालेसफाई अर्ध्यावरच थांबली. त्यामुळे ज्या ठिकाणी नालेसफाई पूर्ण झाली नाही त्या भागात मुसळधार पावसानंतर नाल्याचे पाणी रस्त्यावर आणि लोकांच्या घरात शिरत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठे त्रास सहन करावे लागत आहे. चुकी नगरपालिकेची आणि शिक्षा नागरिक भोगत असल्याचे चित्र सध्या भंडारा शहरात पाहायला मिळत आहे.

Intro:ANC : भंडारा नगर पालिकेचे नाले सफाई चे पितळ मुसळधार पावसात उघडे पडले आहे, रात्री झालेल्या पावसामुळे शहराच्या बऱ्याच भागात पाणी साचले आहे, बैरागी वार्डात 20 लोकांच्या घरात पाणी शिरल्याने या लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून रात्र जागून काढावी लागली आहे, भंडारा नगर पालिकेने या वर्षी शहरातील नाले सफाई पूर्ण केली नसल्याने त्याचा फटका आता नागरिकांना सहन करावा लागत आहे.


Body:मागील चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस पडत आहे, काल रात्री मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील नाल्याच्या शेजारी आणि सखल भागात पाणी शिरले. शहरातील मोठ्या नाल्याशेजारी असलेल्या बैरागी वाड्यातही पाणी शिरले या पैकी 20 घरात पाणी शिरल्याने लोकांची चांगलीच तारांबर उडाली, घराच्या आता जवळ्पास 2 फूट पर्यंत पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य भिजले, साठवून ठेवलेलं कांदे सर्वत्र पसरले, पाण्यामुळे फ्रीज खराब, झाल्या तसेच इतरही बऱ्याच गोष्टीचा नुकसान झाले आहे. घराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
घरात पाणी शिरल्याने वीज पुरवठा बंद करून रात्र भर पाणी काढत रात्र जागून काढली. पाणी शिरल्याने माहीत होताच काही सामाजिक कार्यकर्ते आणि नगर सेवक हे मदतीसाठी पोहचले. घरात पाणी शिरल्याने लोकांचे जे आर्थिक नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई भंडारा नगर पालिकेने द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
या वर्षी भंडारा भंडारा नगर पालिकेने जून मध्ये नाले सफाई च्या कामाला सुरुवात केली होती, खरतरं ही नाले सफाई मे मध्ये होणे अपेक्षित आहे मात्र तसं झाले नाही जून मध्ये सुरू झालेली नाले सफाई अर्ध्यावरच आली असतांना पाऊस सुरू झाला आणि नाले सफाई अर्ध्यावरच थांबली, त्यामुळे ज्या ठिकाणी नाले सफाई पूर्ण झाली नाही त्या भागात मुसळधार पावसानंतर नाल्याचे पाणी रस्त्यावर आणि लोकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांना मोठे त्रास सहन करावे लागत आहे. चुकी नगर पालिकेची आणि शिक्षा नागरिक भोगत असल्याचे चित्र सध्या भंडारा शहरात पाहायला मिळत आहे.
बाईट: खली खान, पीडित


Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.