ETV Bharat / state

बिबट्याचे कातडे आढळले चक्क वन विभागाच्या कपाटात

तुमसर तालुक्यात तीन वाघांच्या शिकारीचे प्रकरण ताजे असताना मोहाडी तालुक्यातील कांद्री वनपरिक्षेत्राच्या कार्यालयातील कपाटामध्येच बिबट्याचे कातडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कातड्याची नोंद नसल्याने हे कोणी आणि कधी आणले याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

author img

By

Published : Jul 9, 2019, 10:02 AM IST

वन विभागाच्या कपाटात बिबट्याचे कातडे आढळले आहे

भंडारा - तुमसर तालुक्यात तीन वाघांच्या शिकारीचे प्रकरण ताजे असताना मोहाडी तालुक्यातील कांद्री वनपरिक्षेत्राच्या कार्यालयातील कपाटामध्येच बिबट्याचे कातडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कातड्याची नोंद नसल्याने हे कोणी आणि कधी आणले याचा तपास करण्यासाठी नागपूर विभागाच्या चमूने सोमवारी दिवसभर तपासणी केली.

वन विभागाच्या कपाटात बिबट्याचे कातडे आढळले आहे
कांद्रीच्या वन परिक्षेत्र कार्यालयात कुठलीही नोंद नसलेल्या एका बिबट्याचे कातडे असल्याचे रविवारी उघडकीस आले. तत्त्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी चकोले यांनी त्यांच्या बदलीनंतर नव्याने रुजू झालेले राठोड यांना वनमजूर रवींद्र तूपट यांच्या हस्ते हे कातडे वन परिक्षेत्र अधिकारी राठोड यांना देण्यास सांगितले. राठोड यांनी या कातड्याची नोंदणी तपासली असता तशी कोणतीही नोंद न दिसल्याने त्यांनी याची तक्रार वरिष्ठांकडे दिली.

या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी नागपूरहून पथक भंडारा जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी सोमवारी दिवसभर या प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणासंबंधी विचारले असता अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणात वन विभाग स्वतःचे कातडे वाचविण्याचे प्रयत्न करीत तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २८ जूनला तुमसर तालुक्यातील सीतासांवगी परिसरात वाघाची शिकार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती. आता या बिबट्याच्या कातड्याच्या प्रकरणानंतर वनविभाग स्वतःचे कातडे वाचविण्याचे प्रयत्न करीत आहे.

या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी व्हिजिलन्स विभाग नागपूरचा एक चमू सोमवारी भंडारा जिल्ह्यात आला. मात्र, या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे. स्थानिक आमदार चरण वाघमारे यांना यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली. या प्रकरणानंतर बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. हे कातडे नेमके कपाटात कोणी ठेवले, ते मिळताच त्याची माहिती वरिष्ठांना तेव्हाच का दिली गेली नाही. याची नोंद आहे की नाही याचा तपास का केला गेला नाही. या प्रकरणात भंडारा उपवनसंरक्षक चकोले यांनी स्वतः त्याची शाहनिशा का केली नाही. जर चकोले यांच्या माहितीनुसार हे प्रकरण खूप मोठे नाही तर नागपूर वन वरिष्ठांना येण्याची गरज का पडली आणि चौकशी अधिकारी या विषयी का बोलत नाहीत, असे प्रश्न निर्माण होत आहेत.

भंडारा - तुमसर तालुक्यात तीन वाघांच्या शिकारीचे प्रकरण ताजे असताना मोहाडी तालुक्यातील कांद्री वनपरिक्षेत्राच्या कार्यालयातील कपाटामध्येच बिबट्याचे कातडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कातड्याची नोंद नसल्याने हे कोणी आणि कधी आणले याचा तपास करण्यासाठी नागपूर विभागाच्या चमूने सोमवारी दिवसभर तपासणी केली.

वन विभागाच्या कपाटात बिबट्याचे कातडे आढळले आहे
कांद्रीच्या वन परिक्षेत्र कार्यालयात कुठलीही नोंद नसलेल्या एका बिबट्याचे कातडे असल्याचे रविवारी उघडकीस आले. तत्त्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी चकोले यांनी त्यांच्या बदलीनंतर नव्याने रुजू झालेले राठोड यांना वनमजूर रवींद्र तूपट यांच्या हस्ते हे कातडे वन परिक्षेत्र अधिकारी राठोड यांना देण्यास सांगितले. राठोड यांनी या कातड्याची नोंदणी तपासली असता तशी कोणतीही नोंद न दिसल्याने त्यांनी याची तक्रार वरिष्ठांकडे दिली.

या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी नागपूरहून पथक भंडारा जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी सोमवारी दिवसभर या प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणासंबंधी विचारले असता अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणात वन विभाग स्वतःचे कातडे वाचविण्याचे प्रयत्न करीत तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २८ जूनला तुमसर तालुक्यातील सीतासांवगी परिसरात वाघाची शिकार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती. आता या बिबट्याच्या कातड्याच्या प्रकरणानंतर वनविभाग स्वतःचे कातडे वाचविण्याचे प्रयत्न करीत आहे.

या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी व्हिजिलन्स विभाग नागपूरचा एक चमू सोमवारी भंडारा जिल्ह्यात आला. मात्र, या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे. स्थानिक आमदार चरण वाघमारे यांना यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली. या प्रकरणानंतर बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. हे कातडे नेमके कपाटात कोणी ठेवले, ते मिळताच त्याची माहिती वरिष्ठांना तेव्हाच का दिली गेली नाही. याची नोंद आहे की नाही याचा तपास का केला गेला नाही. या प्रकरणात भंडारा उपवनसंरक्षक चकोले यांनी स्वतः त्याची शाहनिशा का केली नाही. जर चकोले यांच्या माहितीनुसार हे प्रकरण खूप मोठे नाही तर नागपूर वन वरिष्ठांना येण्याची गरज का पडली आणि चौकशी अधिकारी या विषयी का बोलत नाहीत, असे प्रश्न निर्माण होत आहेत.
Intro:Anchor :- भंडारा जिल्याच्या तुमसर तालुक्यात तीन वाघांच्या शिकरीचे प्रकरण तापत असतांना पुन्हा एकदा मोहाडी तालुक्यातील कांद्री वनपरिक्षेत्राच्या कार्ययातील कपाटामध्येच बिबट्याचे कातडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कातड्याची नोंद नसल्याने हे कोणी आणि कधी आणले याचा तपास करण्यासाठी नागपूर विभागाच्या चमूने केली दिवसभर तपासणी.Body: २८ जुन ला तुमसर तालुक्यातील सीतासांवगी परिसरात वाघाची शिकार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे आणि आता या बिबट्याच्या कातड्याच्या प्रकरणानंतर वनविभाग स्वतःचे कातडे वाचविण्याचे प्रयत्न करीत आहे. या प्रकारांची चौकशी करण्यासाठी व्हिजिलन्स विभाग नागपूरचे उपवनसंरक्षक यांची चमू आज भंडारा जिल्यात आली असून त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे.

कांद्रीच्या वन परिक्षेत्र कार्यलयात कुठलीही नोंद नसलेल्या एका बिबट्याचे कातडे असल्याचे रविवारी उघडकीस आले. तत्त्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी चकोले यांनी त्याच्या निवृत्ती नंतर नव्याने रुजू झालेले राठोड यांना वनमजुर रवींद्र तूपट याच्या हस्ते हे कातडे वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांना देण्यास सांगितले. राठोड यांनी या कातड्याची नोंदणी तपासली असता तशी कोणतीही नोंद न दिसल्याने त्यांनी याची तक्रार वरिष्ठांकडे दिली. प्रकरणाचा तपास घेण्यासाठी नागपूर टीम आली दिवसभर चौकशी सुरु होती ,मात्र या विषयी अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे,त्यामुळे हे या प्रकरणात वन विभाग स्वतःचे कातडे वाचविण्याचे प्रयत्न करीत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या विषयी निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी चकोले यान विचारले असता त्यांनी सांगितले कि हे कातडे एखादया कोर्ट केस चा असावा हा मला नवीन ऑफीस मध्ये स्थलांतर करतांना सफाई करीत असतांना दिसल. मी ४ जुलै ला निवृत्त झालो आणि ५ तारखेला वन मुजूराच्या स्वाधीन हे कातडे देत राठोड साहेबांना देण्यास सांगितले,त्यामुळे या कातड्याशी माझा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली
BYTE :- रवींद्र तुपट, वनमजूर जांभ -कांद्री
BYTE :- चाकोले तत्कालीन वनपरिक्षेत्र अधीकारी मोहाडी जांभ कांद्री
VO :- तर भंडारा जिल्यात वाघाच्या वाढत असलेल्या वाघाच्या शिकारी प्रकरणात वन विभाग अपयशी असल्याने स्थानिक आमदार चरण वाघमारे यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात वन मंत्री यांना तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे.
BYTE :-चरण वाघमारे आमदार तुमसर विधानसभा क्षेत्र
VO :- या प्रकरणानंतर बरेच प्रशन निर्माण होत आहेत हे कातडे नेमके आलमारीत कोणी ठेवले, ते मिळताच त्याची माहिती वरिष्ठांना तेव्हाच का दिली गेली नाही, याची नोंद आहे कि नाही याचा तपास का केला गेला नाही. आणि या प्रकरणात भंडारा उपवनसंरक्षक यांनी स्वतः त्याची शहनिशा का केली नाही, जर चकोले यांच्या माहितीनुसार हे प्रकरण खूप मोठे नाही तर नागपूर वर वरिष्ठांना येण्याची गरज का पडली आणि चौकशी अधिकारी या विषयी का बोलत नाहीत.असा प्रश्न निर्माण होत आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.