ETV Bharat / state

गोसेखुर्द धरणात मासेमारीसाठी गेलेला मच्छिमार तीन दिवसांपासून बेपत्ताच, शोधकार्य संथ गतीने होत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

गोसेखूर्द धरणात मासेमारी करीत असतांना अचानक आलेल्या वादाळाने नाव उलटली. त्यामुळे दोघा बाप लेकांनी पाण्यात उड्या टाकल्या. मुलगा किनाऱयाला पोहोचला परंतू वडिल तीन दिवसापासून बेपत्ता आहे.

author img

By

Published : Jun 12, 2019, 3:52 PM IST

मृत पांडुरंग कांबळी

भंडारा - गोसेखूर्द धरणात मासेमारी करीत असतांना अचानक आलेल्या वादाळाने नाव उलटली. त्यात मुलगा पोहत किनाऱयालगत पोहोचला, पण वडिल बेपत्ता झाले. मागील तीन दिवसांपासून गावातील ढीवर समाजील लोक त्यांचा शोध घेत आहे. परंतू प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप गावकरी आणि कुटुंबातील नातेवाईक करीत आहेत.

बेपत्ता पांडुरंगचा गावकरी शोध घेत आहे
गोसे धरणाच्या विशाल पात्रात दररोज मोठ्या प्रमाणात ढीवर बांधव मासेमारी करण्यासाठी येतात. 9 जूनलाही नेहमीप्रमाणे पांडुरंग वकटू कांबळी (वय 55) व त्याचा मुलगा मच्छिंद्र हे दोघे पाथरी लगत असलेल्या नदीपात्रात सायंकाळी 4 वाजता मासेमारीसाठी गेले. मासेमारी करीत असतांना अचानक पावसाला सुरुवात झाली. म्हणून दोघेही किनाऱ्यावर जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळीवाऱ्यामुळे त्यांची नाव उलटली. दोघेही पाण्यात पडल्याने त्यांनी पोहायला सुरवात केली. मच्छिंद्र पोहत किनाऱ्यावर पोहचला. मात्र त्याचे वडील पांडुरंग किनाऱ्यावर पोहचू शकले नाही. मच्छिंद्र हा काठावर पोहचल्यावर त्याच्या हे लक्षात आले की त्याचे वडील किनाऱयावर पोहचले नाही. त्यांनी लगेच शोधाशोध सुरू केली मात्र त्याच्या पदरात निराशाच पडली.सदर प्रकरणाची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला दिली. मात्र याकडे तीन दिवस होऊनही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. घटनास्थळी तहसीलदारांनी अजूनही भेट दिलेली नाही. काल सायंकाळी 4-5 वाजताच्या सुमारास बोट येऊन 20 मिनिटांची शोधाशोध करण्यात आली. यानंतर ही बोट लगेच परत गेली. ठाणेदार, मंडळ अधिकारी घटनास्थळी येतात व क्षणभर थांबून परत जातात, असे पीडित कुटुंबीयांनी सांगितले. प्रशासकीय व्यवस्थेने विशेष यंत्रणा राबवून पाण्यात बुडालेल्या पांडुरंग यांचा शोध घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

भंडारा - गोसेखूर्द धरणात मासेमारी करीत असतांना अचानक आलेल्या वादाळाने नाव उलटली. त्यात मुलगा पोहत किनाऱयालगत पोहोचला, पण वडिल बेपत्ता झाले. मागील तीन दिवसांपासून गावातील ढीवर समाजील लोक त्यांचा शोध घेत आहे. परंतू प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप गावकरी आणि कुटुंबातील नातेवाईक करीत आहेत.

बेपत्ता पांडुरंगचा गावकरी शोध घेत आहे
गोसे धरणाच्या विशाल पात्रात दररोज मोठ्या प्रमाणात ढीवर बांधव मासेमारी करण्यासाठी येतात. 9 जूनलाही नेहमीप्रमाणे पांडुरंग वकटू कांबळी (वय 55) व त्याचा मुलगा मच्छिंद्र हे दोघे पाथरी लगत असलेल्या नदीपात्रात सायंकाळी 4 वाजता मासेमारीसाठी गेले. मासेमारी करीत असतांना अचानक पावसाला सुरुवात झाली. म्हणून दोघेही किनाऱ्यावर जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळीवाऱ्यामुळे त्यांची नाव उलटली. दोघेही पाण्यात पडल्याने त्यांनी पोहायला सुरवात केली. मच्छिंद्र पोहत किनाऱ्यावर पोहचला. मात्र त्याचे वडील पांडुरंग किनाऱ्यावर पोहचू शकले नाही. मच्छिंद्र हा काठावर पोहचल्यावर त्याच्या हे लक्षात आले की त्याचे वडील किनाऱयावर पोहचले नाही. त्यांनी लगेच शोधाशोध सुरू केली मात्र त्याच्या पदरात निराशाच पडली.सदर प्रकरणाची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला दिली. मात्र याकडे तीन दिवस होऊनही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. घटनास्थळी तहसीलदारांनी अजूनही भेट दिलेली नाही. काल सायंकाळी 4-5 वाजताच्या सुमारास बोट येऊन 20 मिनिटांची शोधाशोध करण्यात आली. यानंतर ही बोट लगेच परत गेली. ठाणेदार, मंडळ अधिकारी घटनास्थळी येतात व क्षणभर थांबून परत जातात, असे पीडित कुटुंबीयांनी सांगितले. प्रशासकीय व्यवस्थेने विशेष यंत्रणा राबवून पाण्यात बुडालेल्या पांडुरंग यांचा शोध घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.
Intro:ANC : गोसे धरणात मासेमारी करीत असतांना नाव उलटल्याने मासेमार वडील बेपत्ता झाले आहेत, तर मुलगा पोहून बाहेर आल्याने त्याचे प्राण वाचले, मागील तीन दिवसापासून त्यांचा शोध लागत नसून प्रशासनाकडून अजिबात मदत मिळत नसल्याचा आरोप गावकरी आणि कुटुंब करीत आहेत, ढीवर समाज स्वतःच आपल्या परीने शोध घेत आहे.Body:गोसे धरणाच्या विशाल पात्रात दररोज मोठ्या प्रमाणात ढीवर बांधव मासेमारी करण्यासाठी येतात. 9/6/2019 लाही नेहमीप्रमाणे पांडुरंग वकटू कांबळी वय 55 हा त्याचा मुलगा मच्छिंद्र याच्यासह पाथरी लगत असलेल्या नदीपात्रात सायंकाळी 4 वाजता गेले. मासेमारीचे करीत असतांना अचानक पावसाला सुरुवात झाली म्हणून दोघेही किनाऱ्यावर जाण्यासाठी निघाले तेवढ्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळीवाऱ्यामुळे त्यांची नाव उलटली, दोघेही पाण्यात पडल्याने त्यांनी पोहायला सुरवात केली मच्छिंद्र या पोहत किनाऱ्यावर पोहचला मात्र त्याचे वडील पांडुरंग हे मात्र किनाऱ्यावर पोहचू शकले नाही. मुलगा काठावर पोहचल्यावर त्याच्या हे लक्षात आले त्यांनी लगेच शोधाशोध सुरू केली मात्र त्याच्या पदरात निराशाच पडली.
सदर प्रकरणाची माहिती स्थानिक जनतेनी प्रशासनाला दिली मात्र याकडे तीन दिवस होऊनही पुर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. घटनास्थळी तहसीलदार यांनी अजूनही भेट दिली नाही. काल सायंकाळी 4-5 च्या सुमारास बोट येऊन 20 मिनिटांच्या शोधाशोधा नंतर परत गेली. ठाणेदार, मंडळ अधिकारी घटनास्थळी येतात क्षणभर थांबून परत जातात.असे पीडित कुटुंबीयांनी सांगितले. प्रशासकीय व्यवस्थेने विशेष यंत्रणा राबवून पाण्यात बुडालेल्या पांडुरंगचा शोध लावण्याची मागणी जनतेनी केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.