ETV Bharat / state

भाजप सरकारच्या काळात बेरोजगारीचा दर सर्वोच्च स्थानी - नाना पटोले - unemployment rate is highest says Nana Patole

राज्यात वाढलेली बेरोजगारी आणि पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गातील तरूणांना वगळल्याच्या विरोधात सोमवारी पटोले यांच्या नेतृत्वात एनएसयुआयच्या तरुण-तरुणींनी बेरोजगार मोर्चा काढला होता. या सर्व गोष्टींना जबाबदार असलेल्या भाजप शासनाला येत्या निवडणुकीत मतदार नक्कीच उत्तर देतील असेही पटोले यांनी म्हटले.

सोमवारी पटोले यांच्या नेतृत्वात एनएसयुआयच्या तरुण-तरुणींनी बेरोजगार मोर्चा काढला होता.
author img

By

Published : Sep 17, 2019, 10:06 AM IST

भंडारा - भाजप सरकारच्या राजवटीत बेरोजगारीचा दर सर्वोच्च स्थानी पोहचला आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकार देशातील लाखो युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी येथे केला. राज्यात वाढलेली बेरोजगारी आणि पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गातील तरूणांना वगळल्याच्या विरोधात सोमवारी पटोले यांच्या नेतृत्वात एनएसयुआयच्या तरुण-तरुणींनी बेरोजगार मोर्चा काढला होता. या सर्व गोष्टींना जबाबदार असलेल्या भाजप शासनाला येत्या निवडणुकीत मतदार नक्कीच उत्तर देतील असेही पटोले यांनी म्हटले.

भाजप सरकारच्या काळात बेरोजगारीचा दर सर्वोच्च स्थानी - नाना पटोले

हेही वाचा - माणूस आरक्षणाने नाही, तर कर्तृत्वाने मोठा होतो - नितीन गडकरी

एकीकडे २०२० मध्ये भारत महासत्ता होण्याची स्वप्ने दाखविली जात असताना दुसरीकडे देशात सध्या लोकशाहीविरोधी वातावरण तयार झाले आहे. देशाची परिस्थिती पुन्हा पारतंत्र्याच्या दिशेने सुरु आहे. भारत हा युवकांचा देश आहे. मात्र, तरी देशातील कोट्यावधी युवक फक्त नोकरी नसल्यामुळे बेरोजगार म्हणून जीवन जगत असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा दिल्लीवर परिणाम नाही'

राज्यात 45 लाख तरुण बेरोजगार आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन एनएसयूआय व युवक काँग्रेसने युवकांची चळवळ उभी करून बेरोजगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याकरिता शास्त्री चौक येथून त्रिमूर्ती चौकपर्यंत बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी चौकात आल्यानंतर मोर्चा नंतर इथे सभाही झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीच्या जाहिरातीमध्ये ओबीसीसाठी अजिबात जागा नसल्याने जिल्ह्यातील लोकांवर हा अन्याय आहे. यासाठी आम्ही लढा देऊ आणि वेळ पडल्यास ही भरती रद्द करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भंडारा - भाजप सरकारच्या राजवटीत बेरोजगारीचा दर सर्वोच्च स्थानी पोहचला आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकार देशातील लाखो युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी येथे केला. राज्यात वाढलेली बेरोजगारी आणि पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गातील तरूणांना वगळल्याच्या विरोधात सोमवारी पटोले यांच्या नेतृत्वात एनएसयुआयच्या तरुण-तरुणींनी बेरोजगार मोर्चा काढला होता. या सर्व गोष्टींना जबाबदार असलेल्या भाजप शासनाला येत्या निवडणुकीत मतदार नक्कीच उत्तर देतील असेही पटोले यांनी म्हटले.

भाजप सरकारच्या काळात बेरोजगारीचा दर सर्वोच्च स्थानी - नाना पटोले

हेही वाचा - माणूस आरक्षणाने नाही, तर कर्तृत्वाने मोठा होतो - नितीन गडकरी

एकीकडे २०२० मध्ये भारत महासत्ता होण्याची स्वप्ने दाखविली जात असताना दुसरीकडे देशात सध्या लोकशाहीविरोधी वातावरण तयार झाले आहे. देशाची परिस्थिती पुन्हा पारतंत्र्याच्या दिशेने सुरु आहे. भारत हा युवकांचा देश आहे. मात्र, तरी देशातील कोट्यावधी युवक फक्त नोकरी नसल्यामुळे बेरोजगार म्हणून जीवन जगत असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा दिल्लीवर परिणाम नाही'

राज्यात 45 लाख तरुण बेरोजगार आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन एनएसयूआय व युवक काँग्रेसने युवकांची चळवळ उभी करून बेरोजगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याकरिता शास्त्री चौक येथून त्रिमूर्ती चौकपर्यंत बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी चौकात आल्यानंतर मोर्चा नंतर इथे सभाही झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीच्या जाहिरातीमध्ये ओबीसीसाठी अजिबात जागा नसल्याने जिल्ह्यातील लोकांवर हा अन्याय आहे. यासाठी आम्ही लढा देऊ आणि वेळ पडल्यास ही भरती रद्द करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Anc : महाराष्ट्रामध्ये वाढलेली बेरोजगारी आणि पोलीस भरती मध्ये ओबीसी ना वगळल्या च्या विरोधात सोमवारी नाना पटोले यांच्या नेतृत्वात एन यु सी आय च्या तरुण तरुणीनी बेरोजगार मोर्चा काढला होता. या सर्व गोष्टी ना जवाबदार असलेल्या भाजपा शासनाला येत्या निवडणुकीत मतदार नक्कीच उत्तर देतील असे नाना पटोले यांनी सांगितले.Body:एकीकडे २०२० मध्ये भारत महासत्ता होण्याची स्वप्ने दाखविली जात असताना दुसरीकडे देशात सध्या लोकशाहीविरोधी वातावरण तयार झाले आहे. भारताची परिस्थिती पुन्हा पारतंत्र्याच्या दिशेने सुरु आहे , भारत हा युवकांचा देश आहे, ही वस्तुस्थिती असली तरी देशातील कोट्यवधी युवक मात्र फक्त नोकरी नसल्यामुळे बेरोजगार म्हणून जीवन जगत असल्याचे वास्तवही नाकारून चालणार नाही. भाजपा सरकारच्या राजवटीत बेरोजगारीचा दर सर्वोच्च स्थानी पोहचला आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकार देशातील लाखो युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रही 45 लाख तरुण बेरीजगर आहेत, ही परिस्थिती लक्षात घेऊन एनएसयूआय व युवक काँग्रेसने युवकांची चळवळ उभी करून बेरोजगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याकरिता आज शास्त्री चौक येथून त्रिमूर्ती चौक भंडारा पर्यंत बेरोजगार तरुणा घेऊन मोर्चा काढण्यात आला आहे,
जिल्धिकारी चौकात आल्यानंतर मोर्च्यांचे रूपांतर सभेत झाले इथे मुख्यमंत्री विरुद्ध घोषणा देण्यात आल्या आणि नंतर जिल्धिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या जाहिरातीमध्ये ओबीसी साठी अजिबात जागा नसल्याने भंडारा जिल्यातील लोकणावर हा अन्याय आहे या साठी आम्ही लढा देऊ आणि वेळ पडल्यास ही भरती रद्द करण्यासाठी आंदोलन करू, ज्या पद्धतीने तरुणावर अन्यान होत या साठी दोषी नरेंद्र आणि देवेंद्र यांना निवडणुकीत हे तरूण नक्कीच धडा शिकवितील असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

BYTE - नाना पटोले , राष्ट्रीय किशान आघाडी अध्यक्ष
BYTE - अमीर शेख, अध्यक्ष NSUI महाराष्ट्र प्रदेश .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.