ETV Bharat / state

पवनीच्या नगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल - city prsident pauni

पवनी नगर परिषदेत डिसेंबर २०१६ ला झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच स्थापन झालेल्या नगर विकास आघाडीच्या पूनम काटेखाये नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. यानंतर, गेल्या ३ वर्षात नगराध्यक्षाचे पती आणि नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य विलास काटेखाये यांनी कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता एकहाती सत्ता चालवली. त्यामुळे, नगर विकास आघाडीच्या ५ नगरसेवकांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीतील नगरसेवकांना सोबत घेऊन नगराध्यक्षांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला.

पवनीच्या नगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल
पवनीच्या नगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल
author img

By

Published : Jan 19, 2020, 10:16 PM IST

भंडारा - महाराष्ट्रात झालेल्या सत्ता बदलाचा प्रभाव पवनी नगर परिषदेमध्येही पाहायला मिळत आहे. डिसेंबर २०१६ ला झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच स्थापन झालेल्या नगर विकास आघाडीच्या पूनम काटेखाये या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, सोबतच त्यांच्या पक्षाचे ६ नगरसेवकही निवडून आले. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी आणि शिवसेनेने समर्थन दिल्याने सत्ताही स्थापन झाली. मागील ३ वर्षात नगर विकास आघाडीचे संस्थापक आणि नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य विलास काटेखाये यांनी एकहाती सत्ता चालवली. मात्र, नगर विकास आघाडीच्या ५ नगरसेवकांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीतील नगरसेवकांना सोबत घेऊन नगराध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला.

पवनीच्या नगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल

पवनी नगरपरिषदेत नगर विकास आघाडीचे ५, काँग्रेसचे ५, भाजपचे २, राष्ट्रवादीचे ३ तर, सेनेचा १ असे मिळून १७ नगरसेवक निवडून आलेत. तरी संपूर्ण सत्ता ही विलास काटेखायेंजवळ केंद्रित होती. ३ वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्षांनी अनेक विकासकामे हातात घेतली. मात्र, यात आघाडीच्या नव्हे तर अन्य नगरसेवकांना विश्वासात न घेतल्यामुळे असंतोष आघाडीचे ५ नगरसेवक फुटून काँग्रेसचे ५, राष्ट्रवादीचे २ तर सेनेच्या एका नगरसेवकाला सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यामुळे नगर विकास आघाडीत बिघाडी आल्याची चर्चा गावात रंगत आहे.

नगराध्यक्षा म्हणून पूनम काटेखाये या निवडून आल्यापासून त्यांचे पती आणि परिषदेचे स्वीकृत सदस्य विलास काटेखाये हेच नगर परिषदेचे काम पाहत असल्याचा आरोप या अविश्वास प्रस्तावात दाखल केला आहे. कोणत्याही नगरसेवकांना विश्वासात न घेता नगराध्यक्षाचे पती आर्थिक हित जोपासत आहे. ते जास्त रकमेची कामे अन्य ठेकेदाराच्या नावाने घेऊन स्वत:च्या मर्जीतील लोकांकडून कामे करवून घेत असल्याचा ठपका जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आला आहे. दिलेल्या मागणी पत्रात १६ कामांचा उल्लेख करण्यात आला असून या कामाची एकूण किमत २० कोटींच्या वर आहे. याबाबत चौकशी करून महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक नागरी अधिनियमनानुसार कार्यवाही करून नगराध्यक्ष पूनम काटेखाये यांना पायउतार करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

भाईतलाव वार्डातील पोलीस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या बावनकर गोडाउन ते लेपसे दावाखान्यापर्यंत रस्ता व नालीचे बांधकाम हे दोन योजनेत बसवून एकच काम दोनदा केल्याचे भासवून सरकारच्या निधीची अफरातफर केल्याचा संशय व्यक्त केला आहे. आर्थिक हित जोपासता यावे याकरता नियमित दैनिक वृत्तपत्रात जाहिरात न करता जिल्हा बाहेरील साप्ताहिकात जाहिरात देऊन नगर परिषद कायद्याचे उलंघन करत नगराध्यक्ष पदाचा दुरुपयोग केला आहे. विलास काटेखाये यांनी नगर विकास आघाडीची स्थापना करून नगरपालिकेत सत्ता आणली. सर्व पक्षातील नगरसेवकांना एकत्रित आणून मागील ३ वर्षात एकहाती सत्ता चालवली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजपला समर्थन दिले. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता बदल होताच त्यांनी राजकीय खेळी खेळल्या गेल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - फटाके फोडताच वाघोबाने जंगलाच्या दिशेने ठोकली धूम

अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याऱ्यांमध्ये पवनी विकास आघाचीचे नगरसेवक विजय रतिराम बावनकर, विजय महादेव उरकुडकर, नरेश सोमाजी तलमले, प्रियका श्रीकांत जुमळे, सुधीर वसुदेव खोब्रागडे, काँग्रेसचे पं उपाध्यक्ष कमलाकर महादेव रायपूरकर, गोपाल दशरथ नंदरधने, नंदाताई ज्ञानेश्वर सलामे, वंदना जयपाल नंदागवळी, ताराचंद महादेव तुळसकर, राष्ट्रवादीच्या शोभनाताई राजेश्वर गौरशेट्टीवार, माया विसर्जन चौसरे, सेनेच्या रोशनी महेश्वर बावनकर यांचा समावेश आहे. त्यांनी नगराध्यक्ष पूनम काटेखाये यांच्यावर अविश्वास ठराव पारित करून नगराध्यक्षांनी केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. आता हा अविश्वास प्रस्ताव पारित होतो, की बर्गडतो याकडे पवनीकरांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - पित्याने दोन मुलींसह घेतली विहरीत उडी; धाडसी तरुणाने वाचवले एकीचे प्राण

भंडारा - महाराष्ट्रात झालेल्या सत्ता बदलाचा प्रभाव पवनी नगर परिषदेमध्येही पाहायला मिळत आहे. डिसेंबर २०१६ ला झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच स्थापन झालेल्या नगर विकास आघाडीच्या पूनम काटेखाये या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, सोबतच त्यांच्या पक्षाचे ६ नगरसेवकही निवडून आले. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी आणि शिवसेनेने समर्थन दिल्याने सत्ताही स्थापन झाली. मागील ३ वर्षात नगर विकास आघाडीचे संस्थापक आणि नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य विलास काटेखाये यांनी एकहाती सत्ता चालवली. मात्र, नगर विकास आघाडीच्या ५ नगरसेवकांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीतील नगरसेवकांना सोबत घेऊन नगराध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला.

पवनीच्या नगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल

पवनी नगरपरिषदेत नगर विकास आघाडीचे ५, काँग्रेसचे ५, भाजपचे २, राष्ट्रवादीचे ३ तर, सेनेचा १ असे मिळून १७ नगरसेवक निवडून आलेत. तरी संपूर्ण सत्ता ही विलास काटेखायेंजवळ केंद्रित होती. ३ वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्षांनी अनेक विकासकामे हातात घेतली. मात्र, यात आघाडीच्या नव्हे तर अन्य नगरसेवकांना विश्वासात न घेतल्यामुळे असंतोष आघाडीचे ५ नगरसेवक फुटून काँग्रेसचे ५, राष्ट्रवादीचे २ तर सेनेच्या एका नगरसेवकाला सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यामुळे नगर विकास आघाडीत बिघाडी आल्याची चर्चा गावात रंगत आहे.

नगराध्यक्षा म्हणून पूनम काटेखाये या निवडून आल्यापासून त्यांचे पती आणि परिषदेचे स्वीकृत सदस्य विलास काटेखाये हेच नगर परिषदेचे काम पाहत असल्याचा आरोप या अविश्वास प्रस्तावात दाखल केला आहे. कोणत्याही नगरसेवकांना विश्वासात न घेता नगराध्यक्षाचे पती आर्थिक हित जोपासत आहे. ते जास्त रकमेची कामे अन्य ठेकेदाराच्या नावाने घेऊन स्वत:च्या मर्जीतील लोकांकडून कामे करवून घेत असल्याचा ठपका जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आला आहे. दिलेल्या मागणी पत्रात १६ कामांचा उल्लेख करण्यात आला असून या कामाची एकूण किमत २० कोटींच्या वर आहे. याबाबत चौकशी करून महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक नागरी अधिनियमनानुसार कार्यवाही करून नगराध्यक्ष पूनम काटेखाये यांना पायउतार करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

भाईतलाव वार्डातील पोलीस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या बावनकर गोडाउन ते लेपसे दावाखान्यापर्यंत रस्ता व नालीचे बांधकाम हे दोन योजनेत बसवून एकच काम दोनदा केल्याचे भासवून सरकारच्या निधीची अफरातफर केल्याचा संशय व्यक्त केला आहे. आर्थिक हित जोपासता यावे याकरता नियमित दैनिक वृत्तपत्रात जाहिरात न करता जिल्हा बाहेरील साप्ताहिकात जाहिरात देऊन नगर परिषद कायद्याचे उलंघन करत नगराध्यक्ष पदाचा दुरुपयोग केला आहे. विलास काटेखाये यांनी नगर विकास आघाडीची स्थापना करून नगरपालिकेत सत्ता आणली. सर्व पक्षातील नगरसेवकांना एकत्रित आणून मागील ३ वर्षात एकहाती सत्ता चालवली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजपला समर्थन दिले. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता बदल होताच त्यांनी राजकीय खेळी खेळल्या गेल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - फटाके फोडताच वाघोबाने जंगलाच्या दिशेने ठोकली धूम

अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याऱ्यांमध्ये पवनी विकास आघाचीचे नगरसेवक विजय रतिराम बावनकर, विजय महादेव उरकुडकर, नरेश सोमाजी तलमले, प्रियका श्रीकांत जुमळे, सुधीर वसुदेव खोब्रागडे, काँग्रेसचे पं उपाध्यक्ष कमलाकर महादेव रायपूरकर, गोपाल दशरथ नंदरधने, नंदाताई ज्ञानेश्वर सलामे, वंदना जयपाल नंदागवळी, ताराचंद महादेव तुळसकर, राष्ट्रवादीच्या शोभनाताई राजेश्वर गौरशेट्टीवार, माया विसर्जन चौसरे, सेनेच्या रोशनी महेश्वर बावनकर यांचा समावेश आहे. त्यांनी नगराध्यक्ष पूनम काटेखाये यांच्यावर अविश्वास ठराव पारित करून नगराध्यक्षांनी केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. आता हा अविश्वास प्रस्ताव पारित होतो, की बर्गडतो याकडे पवनीकरांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - पित्याने दोन मुलींसह घेतली विहरीत उडी; धाडसी तरुणाने वाचवले एकीचे प्राण

Intro:ANC :- महाराष्ट्रात झालेल्या सत्ता बदलाचा प्रभाव पवनी नगर परिषदेमध्ये सुद्धा पहायला मिळत आहे. डिसेंबर २०१६ ला झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच स्थापन झालेल्या नगर विकास आघाडीच्या पूनम काटेखाये या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या तर त्यांच्या पार्टीचे सहा नगरसेवक निवडून आले त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी आणि शिवसेनेने समर्थन दिल्याने सत्ताही स्थापन झाल. मागील तीन वर्षात नगर विकास आघाडीचे संस्थापक आणि नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य विलास काटेखाये यांनी एक हाती सत्ता चालवली. मात्र नगर विकास आघाडीच्या पाच नगरसेवकांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीतील नगरसेवकांना सोबत घेऊन नगराध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.Body:पवनी नगरपालिकेमध्ये 17 पैकी नगर विकास आघाडीचे 5, कांग्रेसचे 5, बीजेपीचे 2, राष्ट्रवादीचे 3 तर सेनेचा एक असे मिळून सतरा नगरसेवक निवडून आलेत. तरी संपूर्ण सत्ता ही विलास काटेखाये या जवळ केंद्रित होती. तीन वर्ष्याच्या कार्यकाळात नगराध्यक्षांनी अनेक विकासाची कामे हातात घेतली मात्र यात आघाडीच्या नव्हे तर अन्य नगरसेवकांना विश्वासात न घेतल्यामुळे असंतोष आघाडीचे 5 नगरसेवक फुटून कॉंग्रेसच्या पाच व राष्ट्रवादीच्या दोन तर सेनेच्या ,एका नगरसेवकाला सोबत घेऊन जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने नगर विकास आघाडीत बिघाडी आल्याची चर्चा गावात रंगत आहे.
         नगराध्यक्षा म्हणून पूनम काटेखाये ह्या निवडून आल्यापासून त्यांचे पती स्वीकृत सदस्य विलास काटेखाये हेच नगर परिषदेचे काम पाहत असल्याचे आरोप अविश्वास दाखल करणाऱ्या अर्जात केला असून नगराध्यक्षा ह्या कोणत्याही नगरसेवकांना विश्वासात न घेता नगराध्यक्षा यांचे पती आर्थिक हित जोपासित जास्त रकमेची कामे अन्य दुसऱ्या ठेकेदाराच्या नावानी घेऊन स्वताचे मर्जीतील लोकांकडून कामे करवून घेत असल्याचा ठपका जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. दिलेल्या मागणी पत्रात सोळा कामाचा उल्लेख केला असून या कामाची एकूण किमत 20 कोटीच्या वर असून याची चौकशी करून महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती, व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ५५ (१) नुसार कारवाही करून नगराध्यक्षा पूनम काटेखाये यांना पायउतार करावे अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
         भाईतलाव वार्डातील पोलीस स्टेशन चे मागील बाजूस असलेल्या बावनकर गोडाऊन ते लेपसे दावाखान्या पर्यंत रस्ता व नालीचे बांधकाम हे दोन योजनात बसवून एकच काम दोनदा केल्याचे भासवून शासनाच्या निधीची अफरातफर केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
         आर्थिक हित जोपासता यावे या करिता नियमित दैनिक वृत्तपत्रात जाहिरात न करता जिल्हा बाहेरील साप्ताहीक मध्ये जाहिरात देऊन नगर परिषद कायद्याचे उलंघन करीत नगराध्यक्ष पदाचा दुरुपयोग केला.
         अविश्वास दाखल करण्यामध्ये पवनी विकास आघाचीचे नगरसेवक विजय रतिराम बावनकर, विजय महादेव उरकुडकर, नरेश सोमाजी तलमले, प्रियका श्रीकांत जुमळे, सुधीर वसुदेव खोब्रागडे, कॉंग्रेसचे न पं उपाध्यक्ष कमलाकर महादेव रायपूरकर, गोपाल दशरथ नंदरधने, नंदाताई ज्ञानेश्वर सलामे, वंदना जयपाल नंदागवळी, ताराचंद महादेव तुळसकर, राष्ट्रवादीचे शोभनाताई राजेश्वर गौरशेट्टीवार, माया विसर्जन चौसरे, सेनेच्या रोशनी महेश्वर बावनकर यांचा समावेश असून नगराध्यक्षा पूनम काटेखाये यांचेवर अविश्वास ठराव पारित करून नगराध्यक्षा यांनी केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.

खरंतर विलास काटेखाये यांनी नगर विकास आघाडी ची स्थापना करून नगरपालिकेत सत्ता आणली आणि सर्व पक्षातील नगरसेवकांना एकत्रित आणून मागील तीन वर्षात एक हाती सत्ता चालवली मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजपाला समर्थन दिला त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता बदल होतात ही राजकीय खेळी खेळल्या गेल्याची चर्चा आहे आता हा अविश्वास प्रस्ताव पारित होतो की बर्गड तो याकडे पवनीकरांचे लक्ष लागून आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.