ETV Bharat / state

भंडाऱ्यात शेतकऱ्यांकडून एकाच मालाची २ वेगवेगळ्या ठिकाणी वसुली; शेतकऱ्यांमध्ये संताप

शहरात दुचाकीवर आणि ऑटोवर शेतातील भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्याच्या मधोमध थांबून त्यांच्याकडून प्रतिपोते दहा रुपये प्रमाणे जबरदस्तीने वसुली केली जात आहे.

author img

By

Published : Jul 20, 2019, 8:57 PM IST

Updated : Jul 20, 2019, 11:54 PM IST

बाजार फी वसुली थांबा

भंडारा - बाहेर गावावरून शहरात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकाच मालाचे २ वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहे. त्यामुळे शनिवारी शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकत काही काळ रस्ता रोको केला. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना याबाबतचे निवेदन दिले.

भाजी मंडईतील कारवाईविषयी माहिती देताना शेतकरी आणि इतर

बीटीबी खासगी भाजी मंडईमध्ये ५ जुलैपासून दुचाकीवर आणि ऑटोवर शेतातील भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्याच्या मधोमध थांबून त्यांच्याकडून प्रतिपोते दहा रुपये प्रमाणे जबरदस्तीने वसुली केली जात आहे. रस्त्यावर अचानक थांबून पैसे मागण्याच्या या प्रकाराने शेतकरी संतप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना भाजी मंडईच्या आत ही पैसे द्यावे लागत आहेत. तसेच आता रस्त्यावर ही त्यांना पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि वसुलीसाठी असलेल्या तरुणांचे वाद होत आहेत.

भंडारा शहरामधील बीटीबी खासगी भाजी मंडईमध्ये दररोज शेकडो शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात. काही शेतकरी हे सरळ व्यापाऱ्यांना माल विकतात तर काही तिथेच बसून किरकोळ मालाची विक्री करतात. या शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करू देण्यासाठी बीटीबी मंडईतर्फे पैसे घेतले जात होते. भंडारा नगरपरिषदतर्फे यावर्षी बाजार शुल्क वसूल करण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले त्याला बीटीबीच्या खासगी मंडईच्या मालकाने मारहाण करुन त्यांना तेथून पळवून लावले. यामुळे कंत्राटदाराने याची तक्रार पोलिसात केली. मात्र, २६ लाखात हे कंत्राट घेतल्यामुळे यातून काही तरी मार्ग काढावा, यासाठी कंत्राटदाराने मुख्याधिकारांना विनंती केली. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला रस्त्यावर शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिल्याचे कंत्राटदाराने सांगितले. त्यामुळे त्यांच्या आदेशावरुनच ३ वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास १५ ते २० तरुण वसुलीसाठी ठेवून शेतकऱ्यांकडून ही वसुली केली जात होती, अशी माहिती कंत्राटदाराने दिली.

बीटीबीच्या मंडईमध्ये पैसे घेत असल्याचे शेतकरी सांगत असले तरी बीटीबीच्या मालकांनी या आरोपाचे खंडन केले आहे. आम्ही पैसे घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी आज त्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकत काही काळ रस्ता रोको केला आणि जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. यानंतर नगर परिषद मुख्याधिकारी बीटीबी भाजी मंडईचे प्रतिनिधी आणि कंत्राटदार यांच्या चर्चेनंतर जबरदस्ती वसुलीचे प्रकार आम्ही करणार नाही, अशी कंत्राटदाराने तर मंडईच्या आत किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांकडूनही पैसे घेणे बंद करू, असे बी बीटीबी च्या प्रतिनिधी लिहून दिले. मात्र, या लेखी आश्वासनाची पूर्ती होते का आणि शेतकऱ्यांची पिळवून थांबते का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भंडारा - बाहेर गावावरून शहरात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकाच मालाचे २ वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहे. त्यामुळे शनिवारी शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकत काही काळ रस्ता रोको केला. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना याबाबतचे निवेदन दिले.

भाजी मंडईतील कारवाईविषयी माहिती देताना शेतकरी आणि इतर

बीटीबी खासगी भाजी मंडईमध्ये ५ जुलैपासून दुचाकीवर आणि ऑटोवर शेतातील भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्याच्या मधोमध थांबून त्यांच्याकडून प्रतिपोते दहा रुपये प्रमाणे जबरदस्तीने वसुली केली जात आहे. रस्त्यावर अचानक थांबून पैसे मागण्याच्या या प्रकाराने शेतकरी संतप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना भाजी मंडईच्या आत ही पैसे द्यावे लागत आहेत. तसेच आता रस्त्यावर ही त्यांना पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि वसुलीसाठी असलेल्या तरुणांचे वाद होत आहेत.

भंडारा शहरामधील बीटीबी खासगी भाजी मंडईमध्ये दररोज शेकडो शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात. काही शेतकरी हे सरळ व्यापाऱ्यांना माल विकतात तर काही तिथेच बसून किरकोळ मालाची विक्री करतात. या शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करू देण्यासाठी बीटीबी मंडईतर्फे पैसे घेतले जात होते. भंडारा नगरपरिषदतर्फे यावर्षी बाजार शुल्क वसूल करण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले त्याला बीटीबीच्या खासगी मंडईच्या मालकाने मारहाण करुन त्यांना तेथून पळवून लावले. यामुळे कंत्राटदाराने याची तक्रार पोलिसात केली. मात्र, २६ लाखात हे कंत्राट घेतल्यामुळे यातून काही तरी मार्ग काढावा, यासाठी कंत्राटदाराने मुख्याधिकारांना विनंती केली. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला रस्त्यावर शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिल्याचे कंत्राटदाराने सांगितले. त्यामुळे त्यांच्या आदेशावरुनच ३ वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास १५ ते २० तरुण वसुलीसाठी ठेवून शेतकऱ्यांकडून ही वसुली केली जात होती, अशी माहिती कंत्राटदाराने दिली.

बीटीबीच्या मंडईमध्ये पैसे घेत असल्याचे शेतकरी सांगत असले तरी बीटीबीच्या मालकांनी या आरोपाचे खंडन केले आहे. आम्ही पैसे घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी आज त्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकत काही काळ रस्ता रोको केला आणि जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. यानंतर नगर परिषद मुख्याधिकारी बीटीबी भाजी मंडईचे प्रतिनिधी आणि कंत्राटदार यांच्या चर्चेनंतर जबरदस्ती वसुलीचे प्रकार आम्ही करणार नाही, अशी कंत्राटदाराने तर मंडईच्या आत किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांकडूनही पैसे घेणे बंद करू, असे बी बीटीबी च्या प्रतिनिधी लिहून दिले. मात्र, या लेखी आश्वासनाची पूर्ती होते का आणि शेतकऱ्यांची पिळवून थांबते का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Intro:Anc : भंडारा शहरामध्ये शेतकऱ्यांकडून जबरन वसुलीचे प्रकार सुरू आहेत. बाहेर गावावरून भाजीपाला विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याकडून एकाच मालाचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी पैसे घेतले जातात. यापैकी एका ठिकाणी तर चक्क रस्त्यावर आडवे होऊन मुख्यधिकारी यांच्या आदेशावरून या शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्याचा प्रकार सुरू आहे. याविरुद्ध आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन चर्चा केली आणि त्यानंतर वसुली चे प्रकार बंद करण्यात येईल असे दोन्ही पैसे घेणाऱ्यांनी लिहून दिले.


Body:पाच जुलै पासून दुचाकीवर किंवा ऑटो वर शेतातील भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्या च्या मधोमध थांबून त्यांच्याकडून प्रति पोता दहा रुपये प्रमाणे जबरन वसूली चे प्रकार भंडारा शहरात सुरू आहे. रस्त्यावर अचानक थांबून पैसे मागण्याच्या या प्रकाराने शेतकरी संतप्त आहेत, कारण या शेतकऱ्यांना या भाजी मंडी च्या आत ही पैसे द्यावे लागत आहेत आणि आता रस्त्यावर ही त्यांना पैसे द्यावे लागत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि वसुलीसाठी असलेल्या तरुणांचे वाद होत आहेत.
बाईट : शेतकरी

भंडारा शहरामध्ये बीटीबी नावाने असलेल्या खाजगी सब्जी मंडी मध्ये दररोज शेकडो शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात काही शेतकरी हे सरळ व्यापाऱ्यांना माल विकायचे व इतर शेतकरी तिथेच बसुन चिल्लर विक्री करायचे या शेतकऱ्यांकडून बीटीबी तर्फे पैसे घेतले जात होते.
नगरपरिषद भंडारा तर्फे यावर्षी बाजार फी वसूल करण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला मिळाली यांनी या शेतकऱ्यांकडून फी वसूल करण्यासाठी गेले असता खाजगी सब्जी मंडी च्या मालकांनी त्यांच्याशी मारहाण करून त्यांना पळवून लावले याची तक्रारही पोलिसात करण्यात आली. 26 लाखात हे कंत्राट घेतले गेले आहे आणि जर फी वसुली झाली नाही तर तोटा होईल म्हणून काही पर्याय सुचविण्याची विनंती कंत्राट दराने मुख्याधिकारांना केली त्यावर ममुख्याधिकारी यांनी कंत्राटदाराला रस्त्यावर शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिल्याचे कंत्राटदारांनी सांगितले आणि त्यांच्या आदेशावरूनच तीन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस तरुण वसुलीसाठी ठेवून शेतकऱ्यांकडून ही बसली केली जात होती
बाईट : गुलाब आंबोने, कंत्राटदार
बीटीबी या खाजगी सब्जी मंडी मध्ये पैसे घेत असल्याचे शेतकरी सांगत असले तरी बीटीबी च्या मालकांनी या आरोपाचे खंडन केले असून आम्ही पैसे घेत नसल्याचे सांगितले शेवटी
संतप्त शेतकऱ्यांनी आज त्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकतात काही काळ रस्ता रोको केला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले.
यानंतर नगर परिषद मुख्याधिकारी बीटीबी सब्जी मंडीचे प्रतिनिधी कंत्राटदार यांच्या चर्चेनंतर जबरन वसुली चे प्रकार आम्ही करणार नाही अशी कंत्राटदाराने तर बीटीबी सब्जी मंडी च्या आत चिल्लर विक्रीवरही बंद करू असे बी बीटीबी च्या प्रतिनिधी लिहून दिले आहे, मात्र हे लेखी आश्वासनाची पूर्ती होते का आणि शेतकऱ्यांची पिळवून थांबते का या कडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
बाईट : मुख्यधिकारी, ज्ञानेश्वर ढेरे, भंडारा नगर परिषद
बंडू बारापत्रे, बीटीबी सब्जी मंडी मालक.



Conclusion:
Last Updated : Jul 20, 2019, 11:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.