ETV Bharat / state

खरीप हंगामासाठी भंडारा जिल्हा प्रशासन सज्ज, मागणीनुसार बियाणे-खते उपलब्ध

खरिपाला सुरूवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना खते आणि बियाणे याची कमतरता भासणार नाही, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी साहेबराव चौहान यांनी दिली.

author img

By

Published : Jun 21, 2019, 6:39 AM IST

जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, भंडारा

भंडारा - धानाचे कोठार अशी ओळख असणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरिपासाठी प्रशासन तयार झाले आहे. यावर्षी हंगामासाठी १ लाख ९२ हजार हेक्टर खरिपाचे नियोजन केले गेले आहे. त्यासाठी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी केली, त्यापैकी आतापर्यंत ४२ हजार ५७५ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. तसेच खतांची मागणीप्रमाणे उपलब्धता असल्याने खताची टंचाई होणार नसल्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा कृषी अधिकारी साहेबराव चौहान जिल्ह्यातील खरीप हंगामाविषयी माहिती देताना

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील ३ वर्षापासून पावसाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्यामुळे दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यातच या वर्षीही जून महिना संपत आला तरी पावसाने अजूनही हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने १ लाख ९२ हजार ६५० हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. यात भात १ लाख ८० हजार हेक्टर तर तूर १२ हजार १०० हेक्टर आणि सोयाबीन ५५० हेक्‍टर आहे. जिल्ह्यात ९५ टक्के भात शेती होत असून यावर्षी ४३ हजार ७३९ क्विंटल बियाणांची मागणी होती त्यानुसार आतापर्यंत ४२ हजार ९२ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. यापैकी महाबीजचे ७५५२ आणि खासगी ३४ हजार ५३९ बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. पाऊस न पडल्याने या बियाण्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत केवळ सात हजार ४४९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. यात महाबीजची मागणी जास्त असून ५७०५. ८७ क्विंटल तर खाजगी १६४३ बियाण्यांची विक्री झाली आहे. तसेच अजून ३४ हजार ६४२ क्विंटल बियाणे शिल्लक आहे.

भातानंतर जिल्ह्यामध्ये १२ हजार शंभर हेक्टर आणि ५५० हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. तुरीची मागणी ८६५ क्विंटल असून आतापर्यंत केवळ २२६ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामुळे ६३९ क्विंटल तुरी बियांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सोयाबीन ३५०क्विंटल मागणी असून पुरवठा २५७ क्विंटल झाला आहे. मात्र, अजून पर्यंत सोयाबीनची विक्री शून्य आहे.

खरिपासाठी खतांचे नियोजन झाले आहे. यात युरिया १० हजार मेट्रिक टन एसएसपी १२ हजार मेट्रिक टन आणि संयुक्त खते १३ हजार मेट्रिक टन बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे खरिपाला सुरूवात झाल्यास खते आणि बियाणे याची कमतरता भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधिकारी साहेबराव चौहान यांनी सांगितले. तसेच पावसाला सुरूवात झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असेही ते म्हणाले.

भंडारा - धानाचे कोठार अशी ओळख असणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरिपासाठी प्रशासन तयार झाले आहे. यावर्षी हंगामासाठी १ लाख ९२ हजार हेक्टर खरिपाचे नियोजन केले गेले आहे. त्यासाठी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी केली, त्यापैकी आतापर्यंत ४२ हजार ५७५ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. तसेच खतांची मागणीप्रमाणे उपलब्धता असल्याने खताची टंचाई होणार नसल्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा कृषी अधिकारी साहेबराव चौहान जिल्ह्यातील खरीप हंगामाविषयी माहिती देताना

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील ३ वर्षापासून पावसाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्यामुळे दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यातच या वर्षीही जून महिना संपत आला तरी पावसाने अजूनही हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने १ लाख ९२ हजार ६५० हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. यात भात १ लाख ८० हजार हेक्टर तर तूर १२ हजार १०० हेक्टर आणि सोयाबीन ५५० हेक्‍टर आहे. जिल्ह्यात ९५ टक्के भात शेती होत असून यावर्षी ४३ हजार ७३९ क्विंटल बियाणांची मागणी होती त्यानुसार आतापर्यंत ४२ हजार ९२ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. यापैकी महाबीजचे ७५५२ आणि खासगी ३४ हजार ५३९ बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. पाऊस न पडल्याने या बियाण्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत केवळ सात हजार ४४९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. यात महाबीजची मागणी जास्त असून ५७०५. ८७ क्विंटल तर खाजगी १६४३ बियाण्यांची विक्री झाली आहे. तसेच अजून ३४ हजार ६४२ क्विंटल बियाणे शिल्लक आहे.

भातानंतर जिल्ह्यामध्ये १२ हजार शंभर हेक्टर आणि ५५० हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. तुरीची मागणी ८६५ क्विंटल असून आतापर्यंत केवळ २२६ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामुळे ६३९ क्विंटल तुरी बियांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सोयाबीन ३५०क्विंटल मागणी असून पुरवठा २५७ क्विंटल झाला आहे. मात्र, अजून पर्यंत सोयाबीनची विक्री शून्य आहे.

खरिपासाठी खतांचे नियोजन झाले आहे. यात युरिया १० हजार मेट्रिक टन एसएसपी १२ हजार मेट्रिक टन आणि संयुक्त खते १३ हजार मेट्रिक टन बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे खरिपाला सुरूवात झाल्यास खते आणि बियाणे याची कमतरता भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधिकारी साहेबराव चौहान यांनी सांगितले. तसेच पावसाला सुरूवात झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असेही ते म्हणाले.

Intro:Anc : धानाच्या जिल्ह्या म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्याच्या खरीपासाठी प्रशासन तयार झाले असून यावर्षी हंगामासाठी एक लाख 92 हजार हेक्टर खरिपाचे नियोजन केले गेले आहे त्यासाठी 44 हजार 954 क्विंटल बियाण्यांची मागणी केली त्यापैकी आतापर्यंत 42 हजार 575 क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहेत तसेच खतांची मागणीनुसार उपलब्धता असल्याने खताची टंचाई होणार नसल्याचे जिल्हा कृषी अधिकार्‍यांनी सांगितले आहे.



Body:शासनाची आणि शेतकऱ्याची खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असली तरी वरून वरुणराजाने दांडी मारली असल्याने शेतकऱ्यांनी परे लावण्यासाठी तयारी केली नाही. पावसाला योग्य सुरुवात झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी परी लावण्यास सुरुवात करावी असे कृषी अधिकार्‍यांनी सांगितले आहे.
भंडारा जिल्हा दुष्काळाच्या छायेत असतानाही प्रशासनाने दुष्काळातून बात केल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांना सतत पावसाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्यामुळे दुष्काळाची चटके सहन करावे लागत आहेत त्यातच या वर्षीही जून संपत आला असला तरी पावसाने अजूनही हजेरी लावली नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतीत आहे.

यावर्षी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने 1 लाख 92 हजार 650 हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे यात भात एक लाख 80 हजार हेक्टर तर तुर बारा हजार शंभर हेक्टर व सोयाबिन 550 हेक्‍टर आहे. जिल्ह्यात 95 टक्के भात शेती होत असून यावर्षी 43 हजार 739 क्विंटल बियाणांची मागणी होती त्यानुसार आतापर्यंत 42 हजार 92 क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध आहेत यापैकी महाबीजचे 7552 आणी खाजगी 34 हजार 539 बियाण्यांचा पुरवठा झाला आहे पाऊस न पडल्याने याचा विक्रीवरही परिणाम झाला असून आतापर्यंत केवळ सात हजार 449 क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे यात महाबीज ची मागणी जास्त असून 5705. 87 क्विंटल तर खाजगी 1643 बियाण्यांची विक्री झाली आहे अजूनही 34 हजार 642 क्विंटल शिल्लक आहे.

भातानंतर जिल्ह्यामध्ये बारा हजार शंभर हेक्टर व 550 हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड केली जाते तुरीची मागणी 865 क्विंटल असून आतापर्यंत केवळ 226 क्विंटल एवढी बिजाई उपलब्ध झाली आहे यामुळे 639 क्विंटल तुरी बियांचा तुटवडा निर्माण झाला आहे तर सोयाबीन 350 क्विंटल मागणी असून पुरवठा 257 क्विंटल झाला आहे आहे मात्र अजून पर्यंत सोयाबीनची विक्री शून्य आहे.

खरिपासाठी खतांचे नियोजन झाले असून र आहे यात युरिया 10 ,000 मेट्रिक टन एसएसपी 12 हजार मेट्रिक टन आणि संयुक्त खते 13 हजार मेट्रिक टन बाजारामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे खरिपाला सुरुवात झाल्यास खते आणि बियाणे याची कमतरता भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आता वाट आहे ती पावसाची पाऊस आला तर या नियोजनाचा काही फायदा आहे नाही तर बिचाऱ्या शेतकऱ्याला या वर्षीही दुष्काळाची झळ सोसावी लागेल.
बाईट :साहेबराव चौहान, जिल्हा कृषी अधिकारी


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.