ETV Bharat / state

'बीडच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा'

author img

By

Published : Oct 11, 2019, 8:07 AM IST

येणाऱ्या काळात बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आम्ही सर्व युती म्हणून एका दिशेने जाणार आहोत.बीडच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे अवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

जयदत्त क्षीरसागर आणि पालकमंत्री पंकजा मुंडे

बीड - बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी बीडच्या जनतेने भक्कमपणे उभे राहावे, असे अवाहन बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या क्षीरसागर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

munde
जयदत्त क्षीरसागर प्रचार सभा

मुंडे पुढे म्हणाल्या की, येणाऱ्या काळात बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आम्ही सर्व युती म्हणून एका दिशेने जाणार आहोत. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आमच्या पंखाला बळ देताना विजयाची जोड लावा, असे आवाहनही मुंडे यांनी केले. यावेळी आमदार सुरेश धस, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे उपस्थित होते.

बिघडलेले पुतणे पवारांनी घरात घेतले - आ.सुरेश धस

क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ रायमोहा येथे आयोजित सभेमध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी आणि पवारांवर हल्लाबोल केला. ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले, जयदत्त आण्णा क्षीरसागरांनी राष्ट्रवादीमध्ये मोठा वाईट काळ सोसला याचा मी साक्षीदीर आहे. आमच्या घरात काही चाललेले नाही, हे सांगण्याची वेळ पवारांवर येत आहे. सगळे बिघडलेले पुतणे पवारांनी आपल्या घरात घेतले आणि तिच सवय त्यांच्या घराला लागली. आम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना सांगत होतो क्षीरसागरांच्या घरामध्ये वाद होतील असे चुकीचे वागू नका. घर फुटले मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यांना क्षीरसागरांचे घर फोडायचेच होते. मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा क्षीरसागर बंधू माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले. प्रीतम मुंडे जेव्हा अडचणीत होत्या तेव्हा त्यांच्या पाठीशी जयदत्त क्षीरसागर खंबीरपणे उभे राहिले. आज आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

हेही वाचा - माजलगाव मध्ये पतीच्या विजयासाठी पत्नी 'डोअर टू डोअर'

विरोधक रडतील पडतील त्यांना थरा देऊ नका - जयदत्त क्षीरसागर

यावेळी, क्षीरसागर यांनीही विरोधकांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून मी राजकारण आहे, मात्र कधीही दुजाभावाचे राजकारण केले नाही. विरोधकांची ही बेगडी रूपे ती तात्पुरती आहेत. ते रडतील पडतील पण त्यांच्या या रूपाला थारा देऊ नका, अशी साद घालत जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

बीड - बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी बीडच्या जनतेने भक्कमपणे उभे राहावे, असे अवाहन बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या क्षीरसागर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

munde
जयदत्त क्षीरसागर प्रचार सभा

मुंडे पुढे म्हणाल्या की, येणाऱ्या काळात बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आम्ही सर्व युती म्हणून एका दिशेने जाणार आहोत. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आमच्या पंखाला बळ देताना विजयाची जोड लावा, असे आवाहनही मुंडे यांनी केले. यावेळी आमदार सुरेश धस, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे उपस्थित होते.

बिघडलेले पुतणे पवारांनी घरात घेतले - आ.सुरेश धस

क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ रायमोहा येथे आयोजित सभेमध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी आणि पवारांवर हल्लाबोल केला. ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले, जयदत्त आण्णा क्षीरसागरांनी राष्ट्रवादीमध्ये मोठा वाईट काळ सोसला याचा मी साक्षीदीर आहे. आमच्या घरात काही चाललेले नाही, हे सांगण्याची वेळ पवारांवर येत आहे. सगळे बिघडलेले पुतणे पवारांनी आपल्या घरात घेतले आणि तिच सवय त्यांच्या घराला लागली. आम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना सांगत होतो क्षीरसागरांच्या घरामध्ये वाद होतील असे चुकीचे वागू नका. घर फुटले मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यांना क्षीरसागरांचे घर फोडायचेच होते. मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा क्षीरसागर बंधू माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले. प्रीतम मुंडे जेव्हा अडचणीत होत्या तेव्हा त्यांच्या पाठीशी जयदत्त क्षीरसागर खंबीरपणे उभे राहिले. आज आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

हेही वाचा - माजलगाव मध्ये पतीच्या विजयासाठी पत्नी 'डोअर टू डोअर'

विरोधक रडतील पडतील त्यांना थरा देऊ नका - जयदत्त क्षीरसागर

यावेळी, क्षीरसागर यांनीही विरोधकांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून मी राजकारण आहे, मात्र कधीही दुजाभावाचे राजकारण केले नाही. विरोधकांची ही बेगडी रूपे ती तात्पुरती आहेत. ते रडतील पडतील पण त्यांच्या या रूपाला थारा देऊ नका, अशी साद घालत जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Intro:बीड च्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा- पंकजा मुंडे
बीड- बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी बीडच्या जनतेने भक्कमपणे उभे राहावे असे अवाहन बीड च्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. बीड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारानिमित्त आयोजीत जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी आ.सुरेश धस, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून कारभार केलेला नाही, तर संसार केला. मी माझ्या खुर्चीवर विराजमान आहेच, तुमच्या मनावरही मी विराजमान असल्याचे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, बीड विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. येणाऱ्या काळात बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, आम्ही सर्व युती म्हणून एका दिशेने जाणार आहोत. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आमच्या पंखाला बळ देताना विजयाची जोड लावा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

बिघडलेले पुतणे पवारांनी घरात घेतले-

शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ रायमोहा येथे आयोजित सभेमध्ये बोलताना आ.सुरेश धस यांनी राष्ट्रवादी आणि पवारांवर हल्लाबोल केला. ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले, मी साक्षीदार आहे. जयदत्त आण्णा क्षीरसागरांनी राष्ट्रवादीमध्ये मोठा वाईट काळ सोसला. त्यांना खूप काही सहन करावे लागले. जयदत्त आण्णांना दिलेला त्रास नियती परतपेâड करत आहे. आता टि.व्ही.वर बातम्या पाहात आहोत. पवारांच्या घरात काय चाललंय. पवार म्हणत आहेत आमच्या घरात काही नाही चाललं, आमच्या घरात काही चाललेलं नाही सांगायची पाळी त्यांच्यावर येत आहे. सगळे बिघडलेले पुतणे पवारांनी आपल्या घरात घेतले आणि तीच सवय त्यांच्या घराला लागली. आम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना सांगत होतो क्षीरसागरांच्या घरामध्ये वाद होतील असे चुकीचे करू नका, घर फुटले मात्र त्यांनी ऐकलं नाही. त्यांना क्षीरसागरांचे घर फोडायचेच होते. आण्णा जे झाले ते जाऊ द्या, चिंता करू नका, होणा-या गोष्टी नाकारू शकत नाहीत, असे मी जयदत्त क्षीरसागरांना नेहमी म्हणत आलो. अखेर त्यांनी निर्णय घेतला आणि शिवबंधन बांधले. त्यांचा निर्णय योग्य ठरला. मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा क्षीरसागर बंधू माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले. प्रीतम मुंडे जेव्हा अडचणीत होत्या तेव्हा त्यांच्या पाठीशी जयदत्त क्षीरसागर खंबीरपणे उभे राहिले. आज आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, ते उद्याचे मंत्री आहेत, त्यांना संधी द्या, सुंस्कृत माणसाच्या पाठीशी ताकद उभी करा, असे म्हणत त्यांनी धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन केले.

धनुष्य बाण हाच रामबाण उपाय-जयदत्त क्षीरसागर

गेल्या ३० वर्षापासून मी राजकारण करत असताना कोणताही दुजाभाव करत राजकारण केलं नाही. दोन समाजात तेढ होईल असं केलं नाही. सर्वांना समान धरत राजकारण केलं. विरोधकांची ही बेगडी रूपं असून ती तात्पुरती आहेत. ते रडतील पडतील पण त्यांच्या या रूपाला थारा देऊ नका. आता धनुष्यबाण हा रामबाण उपाय असून येणाNया २१ तारखेला धनुष्यबाण दाबा अन् साथ द्या अशी साद घालत जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.