ETV Bharat / state

संगीताचा संघर्ष; पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने उभा केला व्यवसाय

author img

By

Published : Jan 29, 2020, 11:01 AM IST

संगीताचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील वडाळा आहे (हल्ली मुक्काम बीड). लग्नाअगोदर संगीताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे हुंडा द्यायला पैसे नव्हते. लग्नानंतर दोन वर्षांनी पती गेल्याने ती खचून गेली.

after-death-of-husband-he-started-business-in-beed
after-death-of-husband-he-started-business-in-beed

बीड- वयाच्या एकोणविसाव्या वर्षीच पूर्वीची एक बायको असलेल्या 40 वर्षाच्या व्यक्तीशी संगीता जाधवचे लग्न झाले. लग्नानंतर 2 वर्षातच नशिबी वैधव्य आले. दरम्यान, एक मुलगी झाली. पतीच्या निधनानंतर जगायचे कसे? मुलीचा सांभाळ करायचा कसा?, खायचे काय? असे अनेक प्रश्न समोर होते. मात्र, त्या परिस्थितीचा सामना करुन स्वत:च्या हिमतीवर संगीता उभी राहिली आहे.

संगीताचा संघर्ष

हेही वाचा- रजनीकांत यांनी फेटाळले 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'वेळी अपघात झाल्याचे वृत्त

संगीताचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील वडाळा आहे (हल्ली मुक्काम बीड). लग्नाअगोदर संगीताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे हुंडा द्यायला पैसे नव्हते. लग्नानंतर दोन वर्षांनी पती गेल्याने ती खचून गेली. दरम्यान, तिची एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे यांच्याशी भेट झाली. संगीताने घर बसल्या उद्योग करण्याचे निश्चित केले. बचत गटाकडून कर्ज घेऊन शिवन क्लास, ब्युटी पार्लर व छोटे कपड्याचे दुकान राहत्या घरीच त्यांनी सुरू केले.

पतीच्या निधनानंतर सुरुवातीच्या काळात शेतात काबाडकष्ट करून संगीताने मुलीचे पालन पोषण केले. पुढे, बचत गटाच्या अर्थसाह्यामुळे संगीताला नवी दिशा मिळाली. आज घडीला संगीताने चांगले भांडवल उभे केले असून स्वाभिमानाने जगण्याचा आनंद मला मिळत असल्याचे ती सांगते. स्वतःच्या पायावर उभा राहण्याची किमया संगीताने करुन दाखवली आहे. या सगळ्या संघर्षात शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ झाला नाही, अशी खंत संगीताने व्यक्त केली.

बीड- वयाच्या एकोणविसाव्या वर्षीच पूर्वीची एक बायको असलेल्या 40 वर्षाच्या व्यक्तीशी संगीता जाधवचे लग्न झाले. लग्नानंतर 2 वर्षातच नशिबी वैधव्य आले. दरम्यान, एक मुलगी झाली. पतीच्या निधनानंतर जगायचे कसे? मुलीचा सांभाळ करायचा कसा?, खायचे काय? असे अनेक प्रश्न समोर होते. मात्र, त्या परिस्थितीचा सामना करुन स्वत:च्या हिमतीवर संगीता उभी राहिली आहे.

संगीताचा संघर्ष

हेही वाचा- रजनीकांत यांनी फेटाळले 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'वेळी अपघात झाल्याचे वृत्त

संगीताचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील वडाळा आहे (हल्ली मुक्काम बीड). लग्नाअगोदर संगीताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे हुंडा द्यायला पैसे नव्हते. लग्नानंतर दोन वर्षांनी पती गेल्याने ती खचून गेली. दरम्यान, तिची एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे यांच्याशी भेट झाली. संगीताने घर बसल्या उद्योग करण्याचे निश्चित केले. बचत गटाकडून कर्ज घेऊन शिवन क्लास, ब्युटी पार्लर व छोटे कपड्याचे दुकान राहत्या घरीच त्यांनी सुरू केले.

पतीच्या निधनानंतर सुरुवातीच्या काळात शेतात काबाडकष्ट करून संगीताने मुलीचे पालन पोषण केले. पुढे, बचत गटाच्या अर्थसाह्यामुळे संगीताला नवी दिशा मिळाली. आज घडीला संगीताने चांगले भांडवल उभे केले असून स्वाभिमानाने जगण्याचा आनंद मला मिळत असल्याचे ती सांगते. स्वतःच्या पायावर उभा राहण्याची किमया संगीताने करुन दाखवली आहे. या सगळ्या संघर्षात शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ झाला नाही, अशी खंत संगीताने व्यक्त केली.

Intro:'ती' चा संघर्ष; नवऱ्याच्या निधनानंतर तिने मोठ्या हिंमतीने उभा केला व्यवसाय बीड- घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे आई-वडिलांनी माझ्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच पूर्वीची एक बायको असलेल्या 40 वर्षाच्या व्यक्तीशी घरच्यांनी लग्न लावून दिलं. हुंडा द्यायला पैसे नसल्यामुळे आई-वडिलांनी हे स्थळ पसंत केले. लग्नानंतर 2 वर्षातच नशिबी वैधव्य आले. आजारपणामुळे पतीचे निधन झाले. दरम्यान एक मुलगी झाली. पतीच्या निधनानंतर जगायचं कसं मुलीचा सांभाळ करायचा कसा व खायचं काय असे अनेक प्रश्न माझ्यासमोर होते पण मी परिस्थितीशी लढले, झगडले अन जिंकले ही, असे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या बीडच्या संगीता प्रकाश जाधव यांची ही यशोगाथा....


Body:संगीता प्रकाश जाधव यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील वडाळा हे आहे. (हल्ली मुक्काम बीड) त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे हुंडा द्यायला पैसे नव्हते याचाच परिणाम म्हणून पहिली बायको असलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीशी संगीता यांच्या आई-वडिलांनी संगीताचे लग्न लावून दिले लग्नानंतर दोन वर्षाने संगीता यांच्या नशिबी वैधव्य आले या वैधव्यामुळे सुरुवातीला संगीता जाधव या पूर्ण का खचून गेल्या होत्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरलं होतं आता करायचं काय असा प्रश्न संगीता यांच्या समोर होता. एक वर्षाची मुलगी तिचे पालन-पोषण करायचं कसं असे अनेक प्रश्न संगीता यांच्यासमोर होते. याच दरम्यान त्यांची एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे यांची भेट झाली. एकल महिला संघटनेच्या बैठकांना संगीता जाऊ लागल्या. आपल्यासारखं दुःख अनेक महिलांच्या नशिबी आलेले असते याची जाणीव त्यांना तिथे झाली. या जाणिवेतूनच त्यांनी बचत गटाची मदत घेतली घर बसल्या उद्योग करण्याचे निश्चित केले. बचत गटाकडून कर्ज घेऊन शिवन क्लास, ब्युटी पार्लर व छोटे कपड्याचे दुकान राहत्या घरीच सुरू केले.


Conclusion:पतीच्या निधनानंतर चा नंतरच्या काळात सुरुवातीलाच शेतात काबाडकष्ट करून त्यांनी मुलीचे पालन पोषण केले मात्र बचत गटाच्या अर्थसाह्य यामुळे संगीता जाधव यांना नवी दिशा सापडली. त्यांनी तीस-चाळीस हजार रुपयांच्या भांडवलात गृह उद्योग सुरू केले. आज घडीला चांगले भांडवल उभे केले असून स्वाभिमानाने जगण्याचा आनंद मला मिळत असल्याचे संगीता जाधव मोठ्या अभिमानाने सांगतात. पतीच्या निधनानंतर मात्र पती कडच्या इतर नातेवाईकांनी संगीता जाधव यांना वाऱ्यावर सोडून दिले होते. कोणीच मदत केली नाही. तरीदेखील स्वतःच्या पायावर उभा राहण्याची किमया संगीता जाधव यांनी करून दाखवली या सगळ्या संघर्षात मात्र शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ झाला नाही. अशी खंत संगीता जाधव यांनी यावेळी बोलून दाखवली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.