ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात सर्वाधिक सायबर गुन्हे बीड जिल्ह्यात; आतापर्यंत राज्यात 480 गुन्हे दाखल - beed latest news

राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात 480 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 258 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 49 सायबर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

बीड
बीड
author img

By

Published : Jun 17, 2020, 9:47 AM IST

बीड - राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून सोशल माध्यमांवर काही असामाजिक तत्त्व परिस्थितीचा गैरफायदा घेत समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा व अफवा पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा समाज कंटकांच्या विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात 480 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 258 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

लॉकडाऊन काळात राज्यभरात विवादास्पद फेसबुक पोस्ट प्रकरणी 196 गुन्हे दाखल झाले आहेत. तर वादग्रस्त टिक टॉक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी 25 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ट्विटरद्वारे चुकीचा मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्या प्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच युट्युब सारख्या माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी 51 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हावार सायबर गुन्ह्यांची नोंद -

राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 49 सायबर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीण विभागात 41 , जळगाव 34, मुंबई 28, नाशिक ग्रामीण 18 , कोल्हापूर 17 , सांगली 15 , बुलढाणा 15 , ठाणे शहर 15 , सातारा 14 , जालना 13 , नांदेड 13 , नवी मुंबई 13 , नाशिक शहर 12 , अहमदनगर 12 , ठाणे ग्रामिण 11 , पालघर 11 , लातूर 10 नागपूर शहर 10 , परभणी 9 , सिंधुदुर्ग 8 , हिंगोली 8 , अमरावती 7 , चँद्रपूर 6 , गोंदिया 5 , सोलापूर ग्रामीण 5 , पुणे शहर 5 , रत्नागिरी 4, सोलापूर शहर 4 , नागपूर ग्रामीण 4 ,भंडारा 4 , पिंपरी- चिंचवड 4 , अमरावती ग्रामीण 4 , धुळे 4 , वर्धा 3 , रायगड 2 , वाशिम 2 , नंदुरबार 2 , उस्मानाबाद 2 , औरंगाबाद 2 , यवतमाळ 1 , अकोला 1 , औरंगाबाद ग्रामीण 1 एवढे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.

बीड - राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून सोशल माध्यमांवर काही असामाजिक तत्त्व परिस्थितीचा गैरफायदा घेत समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा व अफवा पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा समाज कंटकांच्या विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात 480 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 258 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

लॉकडाऊन काळात राज्यभरात विवादास्पद फेसबुक पोस्ट प्रकरणी 196 गुन्हे दाखल झाले आहेत. तर वादग्रस्त टिक टॉक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी 25 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ट्विटरद्वारे चुकीचा मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्या प्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच युट्युब सारख्या माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी 51 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हावार सायबर गुन्ह्यांची नोंद -

राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 49 सायबर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीण विभागात 41 , जळगाव 34, मुंबई 28, नाशिक ग्रामीण 18 , कोल्हापूर 17 , सांगली 15 , बुलढाणा 15 , ठाणे शहर 15 , सातारा 14 , जालना 13 , नांदेड 13 , नवी मुंबई 13 , नाशिक शहर 12 , अहमदनगर 12 , ठाणे ग्रामिण 11 , पालघर 11 , लातूर 10 नागपूर शहर 10 , परभणी 9 , सिंधुदुर्ग 8 , हिंगोली 8 , अमरावती 7 , चँद्रपूर 6 , गोंदिया 5 , सोलापूर ग्रामीण 5 , पुणे शहर 5 , रत्नागिरी 4, सोलापूर शहर 4 , नागपूर ग्रामीण 4 ,भंडारा 4 , पिंपरी- चिंचवड 4 , अमरावती ग्रामीण 4 , धुळे 4 , वर्धा 3 , रायगड 2 , वाशिम 2 , नंदुरबार 2 , उस्मानाबाद 2 , औरंगाबाद 2 , यवतमाळ 1 , अकोला 1 , औरंगाबाद ग्रामीण 1 एवढे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.