ETV Bharat / state

1 ऑगस्टनंतर राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग - बबनराव लोणीकर

author img

By

Published : Jul 26, 2019, 9:00 PM IST

पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. जर समाधानकारक पाऊस पडला नाही तर, एक ऑगस्टनंतर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोगाला सुरुवात होईल असे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी औरंगाबाद येथे सांगितले.

1 ऑगस्ट नंतर राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग - बबनराव लोणीकर

औरंगाबाद - पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. जर समाधानकारक पाऊस पडला नाही तर, एक ऑगस्टनंतर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोगाला सुरुवात होईल, असे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी औरंगाबाद येथे सांगितले. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्यासाठी 31 कोटींचे अर्थसहाय्य देखील उपलब्ध झाल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

राज्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस पडणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पिकांना जीवदान देण्याच्या दृष्टीने कृत्रिम पाऊस पाडणे आवश्यक आहे. हा केवळ एक प्रयोग असून तो किती यशस्वी होईल हे सांगता येणार नाही. मात्र, राज्यात पावसाचे प्रमाण पाहता हा प्रयोग करावा लागणार असल्याचेही लोणीकर म्हणाले.

1 ऑगस्ट नंतर राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग - बबनराव लोणीकर

लोणीकर यांनी एका शिष्टमंडळासह नुकत्याच केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियाने वॉटर ग्रीड वापरून पुढील 30 वर्षांसाठी केलेल्या पाण्याचे नियोजन पद्धतीचा अभ्यास केला. त्याच पद्धतीचे नियोजन आपल्यालाही करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लवकरच राज्यात काम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इस्त्रायलसोबत झालेल्या करारानंतर वॉटर ग्रीड संकल्पना राज्यात आता अंमलात आणायला सुरुवात झालेली आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात सुरू असलेले पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले असून यानंतर परभणी व बीड जिल्ह्यांमध्ये काम सुरू होणार असल्याची माहितीदेखील लोणीकर यांनी दिली.

औरंगाबाद - पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. जर समाधानकारक पाऊस पडला नाही तर, एक ऑगस्टनंतर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोगाला सुरुवात होईल, असे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी औरंगाबाद येथे सांगितले. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्यासाठी 31 कोटींचे अर्थसहाय्य देखील उपलब्ध झाल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

राज्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस पडणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पिकांना जीवदान देण्याच्या दृष्टीने कृत्रिम पाऊस पाडणे आवश्यक आहे. हा केवळ एक प्रयोग असून तो किती यशस्वी होईल हे सांगता येणार नाही. मात्र, राज्यात पावसाचे प्रमाण पाहता हा प्रयोग करावा लागणार असल्याचेही लोणीकर म्हणाले.

1 ऑगस्ट नंतर राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग - बबनराव लोणीकर

लोणीकर यांनी एका शिष्टमंडळासह नुकत्याच केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियाने वॉटर ग्रीड वापरून पुढील 30 वर्षांसाठी केलेल्या पाण्याचे नियोजन पद्धतीचा अभ्यास केला. त्याच पद्धतीचे नियोजन आपल्यालाही करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लवकरच राज्यात काम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इस्त्रायलसोबत झालेल्या करारानंतर वॉटर ग्रीड संकल्पना राज्यात आता अंमलात आणायला सुरुवात झालेली आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात सुरू असलेले पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले असून यानंतर परभणी व बीड जिल्ह्यांमध्ये काम सुरू होणार असल्याची माहितीदेखील लोणीकर यांनी दिली.

Intro:पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र जर समाधानकारक पाऊस पडला नाही तर एक ऑगस्ट नंतर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोगाला सुरुवात होईल असं पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी औरंगाबाद सांगितलं.Body:कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्यासाठी 31 कोटींचे अर्थसहाय्य देखील उपलब्ध झालय. राज्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस पडणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी यांनी पिण्याच्या पाण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग आवश्यक आहे. शेवटी हा प्रयोग आहे आणि हा प्रयोग किती यशस्वी होईल किंवा किती अयशस्वी हे माहीत नाही. मात्र हा प्रयोग करावा लागणार आहे कारण राज्यात पाऊस हा गरजेच आहे. अस देखील लोणीकर यांनी सांगितलं.Conclusion:बबनराव लोणीकर यांनी नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा केलेला आहे. ऑस्ट्रेलिया दौरा मध्ये वॉटर ग्रीड कशा पद्धतीने केलं आणि त्याचा उपयोग ऑस्ट्रेलियाला कशा पद्धतीने होतोय त्याचा अभ्यास दौरा बबनराव लोणीकर यांच्या शिष्टमंडळाने केला. ऑस्ट्रेलियाने पुढील 30 वर्षासाठी पाण्याचे नियोजन केले आहे. पाऊस कमी पडतो किंवा जास्त मात्र तीस वर्षाचे नियोजन ऑस्ट्रेलियाने केलेल आहे. तिथल्या मोठ्या धरणांवर योग्य त्या प्रमाणात ग्रीड वापरण्यात आली आहे त्यामुळे तीस वर्षांचे नियोजन त्यांचा झाले, त्याच पद्धतीचे नियोजन आपल्यालाही करायला हवं त्यामुळे आपण त्याचा अभ्यास दौरा केला असून त्या पद्धतीनेच राज्यात काम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. इज्राईल सोबत झालेल्या करारानंतर वाटरग्रीड संकल्पना राज्यात आता अमलात आणायला सुरुवात झालेली आहे इतकेच नाही, तर पहिल्या टप्प्यातला काम जवळपास झाला असून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचं काम हे जवळपास झालेल आहे. आता परभणी आणि बीड जिल्ह्याचे काम हे सुरू होणाऱ्या त्यामुळे राज्यात लवकरच वाटर ग्रीड यशस्वीपणे राबवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असे देखील त्यांनी औरंगाबाद सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.