ETV Bharat / state

कोरोना स्थितीला राज्य सरकार जबाबदार, रावसाहेब दानवेंचा आरोप - रावसाहेब दानवेंची राज्य सरकारवर टीका

विदर्भ आणि मराठवाडा येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका करत कोरोनाच्या परिस्थितीला त्यांना जबाबदार ठरवले आहे. तसेच शेतकऱ्यांना खत आणि बियाणे मिळणे याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दानवे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

raosaheb danve criticize state govt
रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारवर निशाणा
author img

By

Published : Jun 24, 2020, 12:52 PM IST

Updated : Jun 24, 2020, 1:20 PM IST

औरंगाबाद - देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोनाच्या या स्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या उमेदीच्या काळात त्यांना खतं-बियाणे आणि कर्ज मिळेल याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला देखील दानवे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

रावसाहेब दानवेंची राज्य सरकारवर टीका
विदर्भ आणि मराठवाडा येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, सुरजितसिंह ठाकूर यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका करत कोरोनाच्या परिस्थितीला त्यांना जबाबदार ठरवले आहे.

सुरुवातीला कोरोनाचा रुग्ण आढळला तर त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांची आणि संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी केली जायची. मात्र, आता रुग्ण आढळला तर त्याला रुग्णालयात दाखल किंवा क्वारंटाइन केले जात आहे. सरकारने काजळी न घेतल्यानेच राज्यात स्थिती गंभीर असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला. मुळात शेतकऱ्यांचे कर्ज वाटप असो किंवा खतं वाटप सरकारचे नियंत्रण असायला हवे. शेतकऱ्यांसाठी कुशल काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देणे, खत आणि बियाणे मिळणे याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

औरंगाबाद - देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोनाच्या या स्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या उमेदीच्या काळात त्यांना खतं-बियाणे आणि कर्ज मिळेल याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला देखील दानवे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

रावसाहेब दानवेंची राज्य सरकारवर टीका
विदर्भ आणि मराठवाडा येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, सुरजितसिंह ठाकूर यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका करत कोरोनाच्या परिस्थितीला त्यांना जबाबदार ठरवले आहे.

सुरुवातीला कोरोनाचा रुग्ण आढळला तर त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांची आणि संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी केली जायची. मात्र, आता रुग्ण आढळला तर त्याला रुग्णालयात दाखल किंवा क्वारंटाइन केले जात आहे. सरकारने काजळी न घेतल्यानेच राज्यात स्थिती गंभीर असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला. मुळात शेतकऱ्यांचे कर्ज वाटप असो किंवा खतं वाटप सरकारचे नियंत्रण असायला हवे. शेतकऱ्यांसाठी कुशल काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देणे, खत आणि बियाणे मिळणे याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Last Updated : Jun 24, 2020, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.