ETV Bharat / state

भाजपला शिवसेनेसोबत जाण्याचे शहाणपण अगोदर का नाही सुचले?

author img

By

Published : Jan 30, 2020, 1:58 PM IST

भारतीय जनता पक्ष अजूनही शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास तयार आहे, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली.

नवाब मलिक
नवाब मलिक

औरंगाबाद - भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. शिवसेनेसोबत जाण्याचे शहाणपण अगोदर का नाही सुचले, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. औरंगाबाद येथे सुरू असलेल्या हज हाऊसच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मलिक आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजपला शिवसेनेसोबत जाण्याचे शहाणपण अगोदर का नाही सुचले?


भारतीय जनता पक्ष अजूनही शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास तयार आहे, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. याबाबत मलिक यांना प्रश्न विचारला असता, सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेना सोबत जाण्याची इच्छा आहे, पण शिवसेनेचीही त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे का? हे शिवसेनेला विचारले पाहिजे. शिवसेनेने कमळाबाईला सोडलेलं आहे. त्यामुळे पुन्हा कमळाबाईला सोबत घ्यायचे का हे शिवसेना ठरवेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा - मुनगंटीवार स्वप्न पाहतायेत... पाहू द्या!

जितेंद्र आव्हाड इंदिरा गांधींविषयी काय बोलले मला माहीत नाही. ते काही बोलले असतील तर ते त्यावर खुलासा करतील, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याविषयी दिली.

औरंगाबाद - भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. शिवसेनेसोबत जाण्याचे शहाणपण अगोदर का नाही सुचले, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. औरंगाबाद येथे सुरू असलेल्या हज हाऊसच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मलिक आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजपला शिवसेनेसोबत जाण्याचे शहाणपण अगोदर का नाही सुचले?


भारतीय जनता पक्ष अजूनही शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास तयार आहे, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. याबाबत मलिक यांना प्रश्न विचारला असता, सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेना सोबत जाण्याची इच्छा आहे, पण शिवसेनेचीही त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे का? हे शिवसेनेला विचारले पाहिजे. शिवसेनेने कमळाबाईला सोडलेलं आहे. त्यामुळे पुन्हा कमळाबाईला सोबत घ्यायचे का हे शिवसेना ठरवेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा - मुनगंटीवार स्वप्न पाहतायेत... पाहू द्या!

जितेंद्र आव्हाड इंदिरा गांधींविषयी काय बोलले मला माहीत नाही. ते काही बोलले असतील तर ते त्यावर खुलासा करतील, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याविषयी दिली.

Intro:भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही म्हणून कसेही विधान करत आहेत. आधीच शिवसेनेचा अवमान का केला असा प्रश्न राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी औरंगाबादेत उपस्थित केला. Body:सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेना सोबत जाण्याची इच्छा आहे पण शिवसेना त्यांच्या सोबत जाईल की नाही हे शिवसेनेला विचारले पाहिजे. शिवसेनेने कमळाबाईला सोडलं आहे. आता पुन्हा कमळाबाईला सोबत घायच का हे शिवसेना ठरवेल अस वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी औरंगाबादेत केलंय.Conclusion:सुधीर मुनगंटीवार यांनी जे वक्तव्य केलं. त्यानुसार त्यांना सत्तेशिवाय राहवलं जात नाहीये. शिवसेनेसोबत जाण्याचं शहाणपण आता सुचतय ते आधी का सुचले नाही. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होते नवाब मलिक यांनी सुधीर मुनगंटीवार याना टोला लगावला. पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी भाजपवर टीका करत कमलाबाईला शिवसेनेने सोडलं आहे अस सांगत आता शिवसेनेच्या हातात आहे त्यांना सोबत घ्यायचं की नाही. शिवसेना निर्णय घेतील भाजपाची इच्छा आहे मी येतो येतो आता शिवसेनेच्या हातात निर्णय आहे अस वक्तव्य राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी विषयी काय बोलले माहीत नाही ते काही बोलले असतील तर ते त्यावर खुलासा करतील अस नवाब मलिक यांनी आव्हाड यांच्या विषयी प्रतिक्रीया दिलीय. औरंगाबाद येथे सुरू असलेल्या हज हाऊसच्या कामाचा आढावा नवाब मलिक यांनी घेतला.

Byte - नवाब मलिक - राष्ट्रवादी नेते तथा अल्पसंख्याक मंत्री
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.