औरंगाबाद - मराठवाड्यात किमान व कमाल तापमानात घसरण झाली असून, गारठा वाढत चालल्याचा थंडगार अनुभव लोकांना मिळत आहे. औरंगाबादमध्ये किमान तापमान 15.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
हेही वाचा - राज्यभर हुडहुडी! निफाड @ 2.4 अंशावर, नंदुरबारमध्येही पारा घसरला
औरंगाबाद बरोबर परभणी 15.5 अंश सेल्सिअस तर नांदेडमध्ये 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडी वाढत असल्याने भर दिवसादेखील गरम कपड्यांचा वापर लोकांना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी जशी वाढत आहे तसे औरंगाबादेत सकाळी सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे.
थंडीत शरीर कमवण्यासाठी युवकांचे पाय व्यायाम शाळेकडे वळू लागले आहेत. पुढील काही दिवसात पारा अजून घसरण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.