ETV Bharat / state

'अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नाही'

author img

By

Published : Feb 2, 2020, 11:30 AM IST

Updated : Feb 7, 2020, 7:44 AM IST

सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत उपाययोजना आणि झिरो बजेट शेती चांगली असली तरी शेतकऱ्यांना पूरक नाही. याशिवाय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी निर्यात धोरण ठरवण्यात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया जयाजी सूर्यवंशी यांनी दिली.

Jayaji Suryavanshi
जयाजी सूर्यवंशी, शेतकरी नेते

औरंगाबाद - हमीभाव आणि शेतमालाची आयात बंद केल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होणार नाही, असे मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नाही - जयाजी सूर्यवंशी

हेही वाचा - विश्व हिंदू महासभेच्या उत्तर प्रदेश अध्यक्षांची गोळी घालून हत्या

सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत उपाययोजना आणि झिरो बजेट शेती चांगली असली तरी शेतकऱ्यांना पूरक नाही, असेही सूर्यवंशी म्हणाले. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी निर्यात धोरण ठरवण्यात आलेले नाही. हमीभाव, शेतमालावर प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षणासंदर्भातील योजनांचा यात अभाव असल्याचे मत त्यांनी यावेळी नोंदवले. कांदा, तुरीचे प्रश्न प्रलंबित असल्याने हा अर्थसंकल्प म्हणावा तसा फायदेशीर वाटत नाही, अशी प्रतिक्रियाही सूर्यवंशी यांनी दिली.

हेही वाचा - शाहीन बाग हिंसा : 'भाजपच म्हणणं गोळीबार करणाऱ्या तरुणाने अधोरेखीत केलं'

औरंगाबाद - हमीभाव आणि शेतमालाची आयात बंद केल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होणार नाही, असे मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नाही - जयाजी सूर्यवंशी

हेही वाचा - विश्व हिंदू महासभेच्या उत्तर प्रदेश अध्यक्षांची गोळी घालून हत्या

सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत उपाययोजना आणि झिरो बजेट शेती चांगली असली तरी शेतकऱ्यांना पूरक नाही, असेही सूर्यवंशी म्हणाले. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी निर्यात धोरण ठरवण्यात आलेले नाही. हमीभाव, शेतमालावर प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षणासंदर्भातील योजनांचा यात अभाव असल्याचे मत त्यांनी यावेळी नोंदवले. कांदा, तुरीचे प्रश्न प्रलंबित असल्याने हा अर्थसंकल्प म्हणावा तसा फायदेशीर वाटत नाही, अशी प्रतिक्रियाही सूर्यवंशी यांनी दिली.

हेही वाचा - शाहीन बाग हिंसा : 'भाजपच म्हणणं गोळीबार करणाऱ्या तरुणाने अधोरेखीत केलं'

Intro:देशाच्या अर्थसंकल्पात म्हणावी तशी उपाय योजना नसल्याची खंत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. शेतीला हमीभाव आणि शेतमालाची आयात बंदी केल्याशिवाय शेतकरी वर येणार नाही आणि त्या बाबत या अर्थसंकल्पात म्हणावं तस काही नसल्याचं जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितलं.


Body:सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत उपाय योजना आणि झिरो बजेट शेती या चांगल्या असल्या तरी झिरो बजेट शेती शेतकऱ्यांना पुरणारी नाही. अस मत जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं.


Conclusion:अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी निर्यात धीरन अद्याप ठरवल्याच अद्याप दिसून आलं नाही. शेतीमालाला योग्य हमी भाव देणे, शेती मालाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षण देणे यासाठी प्रयत्न करणे, बाहेरून येणाऱ्या शेतीमालाच्या आयातीवर बंदी घालणे जो पर्यंत करत नाहीत तो पर्यंत शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येणार नाहीत अस मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. यावर्षी कांद्याचं उत्पादन वाढणार आहे त्या कांद्याचं काय करणार, तुरी बाबत काय करणार असे अनेक प्रश्न असल्याने हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना म्हणावा तसा फायदेशीर वाटत नसल्याचं मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं. जयाजी सूर्यवंशी यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
Last Updated : Feb 7, 2020, 7:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.