औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र टाळेबंदी सुरू आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात दारुविक्रीची दुकाने बंद असल्याने अनेक ठिकाणी गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू आहे. असे अड्डे शोधून पोलीस दारू नष्ट करण्याचे काम करत आहेत. अशीच एक कारवाई म्हैसमाळ येथे वनविभागाने केली आहे.
या कारवाईत अंदाजे ड्रम साठवलेले बाराशे लिटर रसायन आणि अंदाजे 50 ते 60 लिटर गावठी दारू भारतीय वन अधिनियम 1927चे कलम 26 नुसार नष्ट करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईत वनपाल कैलास जाधव, नंदू तगरे, वनरक्षक दीपक वाघ, प्रशांत निकाळजे, सोमीनाथ बरडे, व्ही. एल. कुंठे यांनी कर्तव्य बजावले तर वनपरीक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कैलास जाधव हे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - औरंगाबादहून 3 हजार मजूर रेल्वेने मध्यप्रदेशकडे रवाना