ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये पंधरा वर्षीय मुलाचा दोरीने गळा आवळून खून

गुदमातांडा येथील रहिवासी नारायण फत्तू राठोड यांनी याची तक्रार दिली होती. ७ नोव्हेंबर रोजी कौतिक नारायण राठोड (वय १५)  घरी आलाच नाही. त्याची शोधाशोध केली असता चिंचखेडा शिवरातील गायरान तळ्याजवळ कौतिकचा मृतदेह आढळला.

author img

By

Published : Nov 8, 2019, 5:21 PM IST

पोलीस ठाणे

औरंगाबाद - येथील कन्नड तालुक्यातील गुदमातांडा येथील एका पंधरा वर्षीय तरुणाचा दोरीने गळा आवळून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कौतिक नारायण राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- 'आम्ही नवरदेव असून ज्या नवरीशी लग्न कर म्हणेल त्याच नवरीशी करणार'

गुदमातांडा येथील रहिवासी नारायण फत्तू राठोड यांनी याची तक्रार दिली होती. ७ नोव्हेंबर रोजी कौतिक नारायण राठोड (वय १५) घरी आलाच नाही. त्याची शोधाशोध केली असता चिंचखेडा शिवरातील गायरान तळ्याजवळ कौतिकचा मृतदेह आढळला. नातेवाईक व गावच्या पोलीस पाटील यांनी याची पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, बीट जमादार मनोज घोडके यांनी रात्री साडे दहा वाजता घटनास्थळी येवून पंचनामा केला.

मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सुबाराम जाधव व मोतीराम सुबाराम जाधव यांच्याशी कौतिकची चांगली मैत्री होती. ते सोबत बकऱ्या चारण्यासाठी जंगलात जात होते. घटनेच्या दिवशी पण हे सोबत होते. घटना उघड झाल्यावर घाईगडबीत कौतिकचे मित्र मोटारसायकल वरून जात असल्याचे राठोड यांच्या एका नातेवाइकांने बघितले. त्यांना विचारले असता सासुरवाडीला चाललो, असे त्यांनी सांगितले. या संशयामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

औरंगाबाद - येथील कन्नड तालुक्यातील गुदमातांडा येथील एका पंधरा वर्षीय तरुणाचा दोरीने गळा आवळून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कौतिक नारायण राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- 'आम्ही नवरदेव असून ज्या नवरीशी लग्न कर म्हणेल त्याच नवरीशी करणार'

गुदमातांडा येथील रहिवासी नारायण फत्तू राठोड यांनी याची तक्रार दिली होती. ७ नोव्हेंबर रोजी कौतिक नारायण राठोड (वय १५) घरी आलाच नाही. त्याची शोधाशोध केली असता चिंचखेडा शिवरातील गायरान तळ्याजवळ कौतिकचा मृतदेह आढळला. नातेवाईक व गावच्या पोलीस पाटील यांनी याची पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, बीट जमादार मनोज घोडके यांनी रात्री साडे दहा वाजता घटनास्थळी येवून पंचनामा केला.

मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सुबाराम जाधव व मोतीराम सुबाराम जाधव यांच्याशी कौतिकची चांगली मैत्री होती. ते सोबत बकऱ्या चारण्यासाठी जंगलात जात होते. घटनेच्या दिवशी पण हे सोबत होते. घटना उघड झाल्यावर घाईगडबीत कौतिकचे मित्र मोटारसायकल वरून जात असल्याचे राठोड यांच्या एका नातेवाइकांने बघितले. त्यांना विचारले असता सासुरवाडीला चाललो, असे त्यांनी सांगितले. या संशयामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील गुदमातांडा येथील एका पंधरा वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३०२,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Body:तालुक्यातील गुदमातांडा येथील राहिवशी नारायण फत्तू राठोड यांनी दिलेल्या फिर्याद नुसार दी ७ नोव्हेबर रोजी संध्याकाळी शेतातून घरी आल्यावर बघीतले असता मुलगा कौतिक नारायण राठोड वय १५ वर्ष घरी आलेला दिसला नाही. म्हणून शोधाशोध केली असता चिंचखेडा शिवरातील गायरान तळयाजवळ मुलगा पडलेला दिसला जवळ जावून बघीतल्यावर त्याची जीभ बाहेर आलेली नाकातोंडातून रक्त उजव्या डोळयास जखम झालेली दिसली. यावेळी नातेवाईक व गावचे पोलीस पाटिल यांना मुलाचा घातपात झाल्याची खात्री पटल्याने पोलीस पाटिल यांनी तात्काळ ही खबर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, बीट जमादार मनोज घोडके यांनी रात्री साडे दहा वाजता घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. Conclusion:मयत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहिती नुसार राहुल सुबाराम जाधव वय २५ व मोतीराम सुबाराम जाधव वय १२ वर्ष शिरपुर जिल्ह्य धुळे आदिवासी (पावरा) समाजाचे सध्या गुदमातांडा येथील गायरान मध्ये झोपड़ी करून राहतात त्यांच्यात व मयत कौतिक राठोड यांच्यात चांगली मैत्री होती. ते सोबत बकऱ्या चारन्यासाठी जंगलात जात असत घटनेच्या दिवशी ही हे सोबत होते. मयत च्या एका नातेवाइकांने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हे तिघे मोबाईल वर काहीतरी बघत आसल्याची माहिती दिली. तर संध्याकाळी कौतिक राठोड घरी आला नाही म्हणून जाधव यांना फोन केला असता आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले. तर घटना उघड़ झाल्याने घाईगडबीत दोघे मोटारसायकल वर जात आसल्याचे राठोड च्या एका नातेवाइकांने बघीतले व विचारले तर शिवुर येथे सासुरवाडीला चाललो असे राहुल जाधव यांनी संगीतल्याने आपल्या मुलाचा खून यांनीच केल्याचा संशय आला. यामुळे पोलिसांनी दोन्ही अरोपिना ताब्यात घेतले असून कलम ३०२,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणत्या करणाने खून करण्यात आला हे निष्पन्न झाले नसल्याची माहिती पोलीस सुत्रानी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे बीट जमादार मनोज घोड़के करत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.