ETV Bharat / state

गंगापूर बाजार समितीच्या वजन काट्यात तफावत; शेतकरी संतप्त.

author img

By

Published : Feb 24, 2021, 5:25 PM IST

Updated : Feb 24, 2021, 5:39 PM IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्यात तफावत असल्याने बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताची की व्यापाऱ्यांच्या? असा प्रश्न शेतकरी करत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गंगापूर बाजार समिती
गंगापूर बाजार समिती

गंगापूर(औरंगाबाद)- गंगापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्लेट काट्याच्या वजनात मोठी तफावत असल्याची बाब समोर आली आहे. शेतकऱ्याने एक केळीच्या गाडीचे बाजार समितीत वजन केले असता खासगी काटा व बाजार समितीच्या काट्यात तब्बल ७ क्विंटल ५५ किलो वजनाची तफावत निदर्शनास आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गंगापूर बाजार समितीच्या वजन काट्यात तफावत
केळी पिकाचे वजन केल्याने प्रकार उघडकीसजाकमाथा येथील शेतकरी ऊमेश अंजाबापू भवार यांनी आपली केळी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर वजन करण्यासाठी आणली होती. या केळ्यांचे ३३ क्विंटल ९० किलो वजन भरले. परंतू शेतकरी उमेश भवार यांना या वजकाट्याबद्दल शंका आल्याने त्यांनी थोरात पंपाजवळ असलेल्या मातोश्री काट्यावर पुन्हा केळ्यांचे वजन केले. त्यावेळी केळ्यांचे वजन एकूण ४१ क्विंटल ४५ किलो भरले. म्हणजे साडेसात क्विंटल वजनाची तफावत दिसून आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर कमी वजन दाखविले असे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या सचीव मनीष गजभीये यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला. तसेच समितीच्या वजन काट्यात किती दिवसांपासून तफावत आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणीकृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्यात तफावत असल्याने बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताची की व्यापाऱ्यांच्या? असा प्रश्न शेतकरी करत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीवर कारवाई करून न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गंगापूर(औरंगाबाद)- गंगापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्लेट काट्याच्या वजनात मोठी तफावत असल्याची बाब समोर आली आहे. शेतकऱ्याने एक केळीच्या गाडीचे बाजार समितीत वजन केले असता खासगी काटा व बाजार समितीच्या काट्यात तब्बल ७ क्विंटल ५५ किलो वजनाची तफावत निदर्शनास आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गंगापूर बाजार समितीच्या वजन काट्यात तफावत
केळी पिकाचे वजन केल्याने प्रकार उघडकीसजाकमाथा येथील शेतकरी ऊमेश अंजाबापू भवार यांनी आपली केळी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर वजन करण्यासाठी आणली होती. या केळ्यांचे ३३ क्विंटल ९० किलो वजन भरले. परंतू शेतकरी उमेश भवार यांना या वजकाट्याबद्दल शंका आल्याने त्यांनी थोरात पंपाजवळ असलेल्या मातोश्री काट्यावर पुन्हा केळ्यांचे वजन केले. त्यावेळी केळ्यांचे वजन एकूण ४१ क्विंटल ४५ किलो भरले. म्हणजे साडेसात क्विंटल वजनाची तफावत दिसून आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर कमी वजन दाखविले असे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या सचीव मनीष गजभीये यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला. तसेच समितीच्या वजन काट्यात किती दिवसांपासून तफावत आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणीकृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्यात तफावत असल्याने बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताची की व्यापाऱ्यांच्या? असा प्रश्न शेतकरी करत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीवर कारवाई करून न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Last Updated : Feb 24, 2021, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.