ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. सत्तर ते ऐंशी रुपये लिटर असणाऱ्या पेट्रोलने शंभरी गाठली आहे. परिणामी प्रवास महागला आहे. वाहतूक महागल्याने सामानाची वाहतूक महागली, त्यामुळे सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याने केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.

author img

By

Published : Jun 7, 2021, 10:39 PM IST

इंधन दरवाढ आंदोलन
इंधन दरवाढ आंदोलन

औरंगाबाद - इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाने सेवनहील परिसरातील राज पेट्रोल पंप येथे आंदोलन केले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्व सामान्यांना महागाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली.


'पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढली'

गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. सत्तर ते ऐंशी रुपये लिटर असणाऱ्या पेट्रोलने शंभरी गाठली आहे. परिणामी प्रवास महागला आहे. वाहतूक महागल्याने सामानाची वाहतूक महागली, त्यामुळे सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याने केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.

'तेलाचे दर वाढल्याने नागरिक त्रस्त'

काही महिन्यांमध्ये तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. 180 रुपये लिटर इतके दर वाढल्याने सर्व सामान्यांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक कोंडी झालेल्या सर्व सामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. सरकार यावर नियंत्रण आणू शकते, मात्र तस होत नसल्याने आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी केला. महागाईबाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा जनता उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा डॉ. कल्याण काळे यांनी दिला आहे.


हेही वाचा -मुंबईत दाखल होणार जगातील सर्वाधिक स्वस्त एसी थ्री-टायर इकोनॉमी क्लास कोच

औरंगाबाद - इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाने सेवनहील परिसरातील राज पेट्रोल पंप येथे आंदोलन केले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्व सामान्यांना महागाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली.


'पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढली'

गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. सत्तर ते ऐंशी रुपये लिटर असणाऱ्या पेट्रोलने शंभरी गाठली आहे. परिणामी प्रवास महागला आहे. वाहतूक महागल्याने सामानाची वाहतूक महागली, त्यामुळे सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याने केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.

'तेलाचे दर वाढल्याने नागरिक त्रस्त'

काही महिन्यांमध्ये तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. 180 रुपये लिटर इतके दर वाढल्याने सर्व सामान्यांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक कोंडी झालेल्या सर्व सामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. सरकार यावर नियंत्रण आणू शकते, मात्र तस होत नसल्याने आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी केला. महागाईबाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा जनता उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा डॉ. कल्याण काळे यांनी दिला आहे.


हेही वाचा -मुंबईत दाखल होणार जगातील सर्वाधिक स्वस्त एसी थ्री-टायर इकोनॉमी क्लास कोच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.