ETV Bharat / state

औरंगाबाद शहरात डेंग्यूचे 11 बळी; 180हून अधिक संशयित रुग्ण

ऑगस्ट महिन्यापासून शहरात डेंग्यूची साथ सुरु झाली होती. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. बळींची संख्या 11 वर पोहोचली आहे. शहरात 50 रुग्ण आढळले असून 180 संशयित रुग्ण आहेत. भिमनगर, भावसिंगपूरा, हर्सुल-मिसारवाडी, पानदरीबा-ज्योतीनगर या भागात डेंग्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

author img

By

Published : Nov 18, 2019, 9:55 PM IST

औरंगाबाद शहरात डेंग्यूच्या साथीचा कहर

औरंगाबाद - शहरात डेंग्यूच्या कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बळींची संख्या 11 वर पोहोचली आहे. शहरात 50 रुग्ण आढळले असून 180 संशयित रुग्ण आहेत. याप्रकरणी गंभीर दखल घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज(18 नोव्हेंबर) आरोग्य विभागाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरात डेंग्यूवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

औरंगाबाद शहरात डेंग्यूच्या साथीचा कहर

मनपाच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अ‍ॅबेटिंगची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. दररोज राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेची आज महापौर घोडेले यांनी पाहणी केली. दरम्यान, अनेक घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या. खासगी रुग्णालयातील संशयित डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मिळत नसेल तर त्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याचे आणि दररोजचा अहवाल सादर करण्याचे आदेश घोडेले यांनी या बैठकीत दिले आहेत. आरोग्य विभागाने झोननिहाय तपासणी करून भिमनगर, भावसिंगपूरा, हर्सुल-मिसारवाडी, पानदरीबा-ज्योतीनगर हे चार भाग रेड झोन असल्याचे जाहीर केले आहे. या भागात डेंग्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा कहर, पाचशेच्यावर संशयित रुग्ण

ऑगस्ट महिन्यापासून शहरात डेंग्यूची साथ सुरु झाली होती. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. डेंग्यूची साथ अटोक्यात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने झोन कार्यालयासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतू या अधिकाऱ्यांनी सुरवातीचे आठच काम केल्याचे बोलले जात आहे. आयुक्तांनी आदेश देऊनही अधिकारी आणि महापालिकेकडून पाहिजे त्या प्रमाणात डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

औरंगाबाद - शहरात डेंग्यूच्या कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बळींची संख्या 11 वर पोहोचली आहे. शहरात 50 रुग्ण आढळले असून 180 संशयित रुग्ण आहेत. याप्रकरणी गंभीर दखल घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज(18 नोव्हेंबर) आरोग्य विभागाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरात डेंग्यूवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

औरंगाबाद शहरात डेंग्यूच्या साथीचा कहर

मनपाच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अ‍ॅबेटिंगची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. दररोज राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेची आज महापौर घोडेले यांनी पाहणी केली. दरम्यान, अनेक घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या. खासगी रुग्णालयातील संशयित डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मिळत नसेल तर त्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याचे आणि दररोजचा अहवाल सादर करण्याचे आदेश घोडेले यांनी या बैठकीत दिले आहेत. आरोग्य विभागाने झोननिहाय तपासणी करून भिमनगर, भावसिंगपूरा, हर्सुल-मिसारवाडी, पानदरीबा-ज्योतीनगर हे चार भाग रेड झोन असल्याचे जाहीर केले आहे. या भागात डेंग्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा कहर, पाचशेच्यावर संशयित रुग्ण

ऑगस्ट महिन्यापासून शहरात डेंग्यूची साथ सुरु झाली होती. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. डेंग्यूची साथ अटोक्यात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने झोन कार्यालयासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतू या अधिकाऱ्यांनी सुरवातीचे आठच काम केल्याचे बोलले जात आहे. आयुक्तांनी आदेश देऊनही अधिकारी आणि महापालिकेकडून पाहिजे त्या प्रमाणात डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Intro:शहरात डेंग्यूच्या साथीचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून आता डेंग्यूच्या बळींची संख्या 11 वर गेली आहे. डेंग्यूची साथ वाढतच चालली असलीतरी मनपाकडून प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. याबाबत गंभीर दखल घेऊन महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेवून अधिकारी शहरात डेंग्यूच्या उपाययोजने बाबत आदेश दिले.
 
Body:ऑगस्ट महिन्यापासून डेंग्यूची साथ शहरात सुरु झाली असलीतरी सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक झाला. या महिन्यात पाच जणांचा बळी गेला. त्यांनतरही डेंग्यूची साथ अटोक्यात आली नाही. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. या महिन्यात देखील चार जणांचा बळी गेला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 50 वर पोहोचली तर संशयीत 180 रुग्ण आढळून आले आहे. त्यातच मंगळवारी शहरात दोंघाचा मृत्यु झाला. घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात नारेगाव येथील सात वर्षीय बालकास दाखल करण्यात आले होते. डेंग्यू झाल्यामुळे त्यावर उपचार सुरु असतांना मंगळवारी दुपारी त्या बालकाचा मृत्यु झाला. त्याचबरोबर खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या गणेश कॉलनीतील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे डेंग्यूच्या बळीची संख्या ११ वर पोहचली आहे. सरकारी व खासगी रुग्णालयात संशयीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. अडीच महिन्यापासून डेंग्यूची साथ शहरात सूरू आहे. परंतु आरोग्य विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. 
 ----------------
डेंग्यूची साथ अटोक्यात येत नसल्याचे दिसून आल्यामुळे महापालिका प्रशासनाने झोन कार्यालयासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या अधिकाऱ्यांनी आठ दिवस मोहिम राबवण्यास सहकार्य केले. त्यानंतर संपर्क अधिकारी झोन कार्यालयाकडे फिरकले देखील नाही. आयुक्तांनी आदेश देऊनही अधिकाऱ्यांकडून  पाहिजे त्या प्रमाणात डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याकडे लक्ष दिले नाही.
 --------------------------
मनपाच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अ‍ॅबेटिंगची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. दररोज राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेची आज महापौर नंदकुमार घोडिले यांनी पाहणी केली.दरम्यान अनेक घरात डेंग्यूच्या आळी आढळून आल्या
 --------------------------
शहरात डेंग्यूने अजून दोघांचा बळी घेतल्याचे समोर येताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. डेंग्यूची साथ सुरु असतांनाही प्रभावीपणे उपाययोजना राबवल्या जात नाही. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे डेंग्यूची साथीचा प्रकोप वाढतच चालला आहे. मनपाच्या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होत नाही का? असा सवाल महापौरांनी केला. खासगी रुग्णालयातील संशयीत डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मिळत नसले तर त्या रुग्णालयाचा परवाना रद्द करा, डेंग्यूची साथ अटोक्यात आणण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात, त्याचा दररोजचा अहवाल सादर करावा असे आदेश महापौर घोडेले यांनी बैठकीत दिले.
------------
डेंग्यूची साथ नियंत्रणात येत नसल्यामुळे आरोग्य विभागाने झोननिहाय तपासणी सुरु केली आहे. डेंग्यूचा सर्वाधिक धोका असलेल्या भिमनगर, भावसिंगपूरा, हर्सुल-मिसारवाडी, पानदरीबा-ज्योतीनगर हे चार भाग रेड झोनमध्ये असल्याचे जाहिर केले आहे. या भागात वारंवार डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. 

बाईट- डेंग्यू रुगणाचे नातेवाईक

बाईट- नातेवाईक

बाईट - नंदकुमार घोडले, महापौर औरंगाबाद मनपाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.