मुंबई - विधानपरिषदेच्या औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसच्या वतीने बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.
विधानपरिषद निवडणुकीसाठी, औरंगाबादमध्ये काँग्रेसकडून भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी
बाबुराव कुलकर्णी यांच्या उमेदवारीची घोषणा करताना थोरात म्हणाले, की कुलकर्णी हे ज्येष्ठ नेते आहेत. औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने या निवडणुकीत ते निश्चित विजयी होतील. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे आणि प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी कुलकर्णी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.