ETV Bharat / state

Aurangzeb Controversy : औरंगजेबावरुन का होतोय राज्यात वाद?; वाचा सविस्तर

author img

By

Published : Jun 18, 2023, 7:50 PM IST

औरंगजेब वादामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगजेबाबाबत राज्यात विविध ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावरील पोस्ट किंवा स्टेटसमुळे महाराष्ट्रात बंद किंवा हिंसाचार होऊ शकतो. ज्या राज्यात जातीयवाद कधीच पाहिला नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अशी प्रतिक्रिया माजी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली आहे.

Aurangzeb Controversy
Aurangzeb Controversy

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबावरुन राजकारण तापले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुघल सम्राट औरंगजेबाची प्रशंसा करणारे मेसेज, व्हॉट्सॲप स्टेटसवरून हिंसाचार झाला होता. औरंगजेबामुळे गेल्या महिनाभरात कोल्हापूर, अहमदनगर, धुळे आणि नाशिकमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी समाधी स्थळी भेट दिल्याने चर्चेला तोंड फुटले आहे.

सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न : भाजप-शिवसेना सरकारच्या देखरेखीखाली 'लव्ह जिहाद', 'लँड जिहाद' विरोधात आंदोलने जोरात सुरू आहेत. परिणामी हिंदू जन आक्रोश मोर्चाने काढलेल्या मोर्चांच्या निमित्ताने अशा घटना समोर येत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक, विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जातीय तेढ पेरली जात असल्याचे सरकारच्या टीकाकारांचे म्हणणे आहे. परंतु दुसरीकडे तणाव निर्माण करून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सरकारने केला आहे.

सोशल मीडियावरील पोस्ट हिंसाचाराचे कारण : शांतता, सामुदायिक संबंधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्यात हिंसा चिंताजनक आहे. देशाच्या इतर भागात भीषण जातीय घटना घडत असतानाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शांतता होती. यावरून हे स्पष्ट होते की कोणीतरी जाणीवपूर्वक समुदायांना भडकावून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे.

'सोशल मीडियावरील पोस्ट किंवा स्टेटसमुळे महाराष्ट्रात बंद किंवा हिंसाचार होऊ शकतो. ज्या राज्यात जातीयवाद कधीच पाहिला नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. - माजी पोलीस महासंचालक सतीश माथूर

औरंगाबादचे नाव बदल्याने हिंसा? : औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले, जे हिंसाचाराची ठिणगी असल्याचे मानले जाते. विशेषत: जेव्हा नेते महाराष्ट्रातील औरंगजेबाचे सर्व उल्लेख पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सरकारची चूक असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. नाव बदलण्याची योजना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकारने देखील आखली होती. मात्र, ते सत्तेवरुन हटल्यानंतर भाजप-शिवसेना सरकारने फेब्रुवारीमध्ये औरंगाबादचे नाव बदलण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर मे महिन्यात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

संभाजी महाराजांची हत्या : १६८० च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने दख्खनला वश करण्यासाठी मोहीम सुरू केली होती. हे औरंगजेबाचे जुने स्वप्न होते. औरंगजेबाने आपल्या सेनापतींच्या सल्ल्याविरुद्ध आपले दरबार औरंगाबादला हलवले होते. या काळात विजापूर, गोलकोंडा या राज्यांनी औरंगजेबापुढे शरणागती पत्करली होती. त्यानंतर 1689 मध्ये मुघल-मराठा संघर्षाचा सर्वात रक्तरंजित इतिहास घडला होता. शिवाजी माहाराजांचा मुलगा आणि उत्तराधिकारी छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी क्रूरपणे ठार मारले होते. त्यामुळे मराठा भाषिकांमध्ये असंतोष पसरला होता. तेव्हापासून हा वाद कायम सुरु आहे.

औरंगजेबाचा मृत्यू : औरंगजेब मृत्यू नंतर त्याची औरंगाबादजवळील खुलदाबाद येथे कबर बांधण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या नावावरुनच या शहराचे नाव औरंगाबाद ठेवण्यात आले होते. औरंगजेबाच्या दख्खन जिंकण्याच्या मोहिमेमुळे मुघल साम्राज्य कमकुवत झाले असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी म्हणतात की औरंगजेब हा या भागातील मुस्लिमांसाठी कधीही सांस्कृतिक किंवा धार्मिक व्यक्ती बनला नाही. मुस्लिमांच्या किंवा कधीही त्यांचा उदोउदो केलेला नाही. एखाद्याच्या फायद्यासाठी समाजाला भडकवण्याचा हा केवळ डाव आहे. औरंगजेबाशी संबंधित संदेशांवर इतक्या तीव्र प्रतिक्रिया येत असतील, तर नथुराम गोडसेच्या गौरवाबाबतही अशाच प्रतिक्रिया का येत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

औरंगजेबाच्या वादाचा घटनाक्रम :

6 जून 2023 : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या पोस्टर्सविरोधात बंदनंतर दगडफेक

७ जून : औरंगजेब आणि म्हैसूरचा शासक टिपू सुलतान यांचे कौतुक करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टविरोधात कोल्हापूर बंदला हिंसक वळण.

9 जून : औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या 14 वर्षीय मुलाच्या सोशल मीडिया संदेशाविरोधात बीडच्या आष्टी शहरात बंद.

10 जून : छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची सूचना केल्याप्रकरणी सोशल मीडिया वापरकर्त्यावर गुन्हा दाखल

11 जून : औरंगजेबाची प्रतिमा प्रोफाईल पिक्चर म्हणून वापरल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 29 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला.

12 जून : टिपू सुलतानवरील सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ कोल्हापुरातील कागल शहरात बंद पुकारण्यात आला.

12 जून : अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात एका 22 वर्षीय मुलाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला.

12 जून : विजापूरचा जनरल अफजलखानचा फोटो डीपीवर लावल्याप्रकरणी सांगलीतील एका अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 जून : औरंगजेबांच्या समाधीला प्रकाश आंबेडकरांची भेट

औरंगजेबाच्या समाधीला प्रकाश आंबेडकरांची भेट : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद तालुक्यात औरंगजेबांच्या समाधीवर पुष्प वाहिले. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या समाधीला प्रकाश आंबेडकरांच्या भेटीमुळे राज्यातील राजकारण तापणार चांगलेच आहे. जनतेच्या विश्वासामुळेच आपण इथे आलो, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतही वक्तव्य केले असून त्याचा परिणाम उद्धव ठाकरे गटाशी असलेल्या युतीवर होण्याची शक्यता आहे.

अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका : औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने शिवसेनेसोबतच्या जवळीकीवर परिणाम होईल का, असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली. राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडवण्याचे प्रयत्न झाले, त्या कोणी घडवल्या याचे उत्तर सर्वांनाच माहीत आहे. औरंगजेबाच्या दरबारात आम्ही कधी नोकरीलाही नव्हतो, तिथे जयचंद कोण होता? हे सर्वांना माहीत आहे. इंग्रजांच्या काळातही या जयचंदमुळे आम्हाला 200 वर्षे पारतंत्र्यात राहावे लागले, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेतल्याने वाद : शिवसेना आणि युतीवरही त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारखेच आहे. बाळासाहेबांना सत्तेसाठी जे काही करावे लागले ते केले, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. खुलताबाद तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेतले. खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरालाही त्यांनी भेट दिली. प्रकाश आंबेडकर हे शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील वंचित बहुजन आघाडीच्या सभेला हजेरी लावली. औरंगजेबाचा वाद काही दिवसांपासून सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनी समाधीचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही कबरेला भेट नाही. हा जनतेच्या श्रद्धेचा प्रश्न असून, सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा आपण आदर केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

हेही वाचा - Congress Criticizes Modi : मणिपूर हिंसाचारावर मौन बाळगल्याबद्दल काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबावरुन राजकारण तापले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुघल सम्राट औरंगजेबाची प्रशंसा करणारे मेसेज, व्हॉट्सॲप स्टेटसवरून हिंसाचार झाला होता. औरंगजेबामुळे गेल्या महिनाभरात कोल्हापूर, अहमदनगर, धुळे आणि नाशिकमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी समाधी स्थळी भेट दिल्याने चर्चेला तोंड फुटले आहे.

सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न : भाजप-शिवसेना सरकारच्या देखरेखीखाली 'लव्ह जिहाद', 'लँड जिहाद' विरोधात आंदोलने जोरात सुरू आहेत. परिणामी हिंदू जन आक्रोश मोर्चाने काढलेल्या मोर्चांच्या निमित्ताने अशा घटना समोर येत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक, विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जातीय तेढ पेरली जात असल्याचे सरकारच्या टीकाकारांचे म्हणणे आहे. परंतु दुसरीकडे तणाव निर्माण करून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सरकारने केला आहे.

सोशल मीडियावरील पोस्ट हिंसाचाराचे कारण : शांतता, सामुदायिक संबंधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्यात हिंसा चिंताजनक आहे. देशाच्या इतर भागात भीषण जातीय घटना घडत असतानाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शांतता होती. यावरून हे स्पष्ट होते की कोणीतरी जाणीवपूर्वक समुदायांना भडकावून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे.

'सोशल मीडियावरील पोस्ट किंवा स्टेटसमुळे महाराष्ट्रात बंद किंवा हिंसाचार होऊ शकतो. ज्या राज्यात जातीयवाद कधीच पाहिला नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. - माजी पोलीस महासंचालक सतीश माथूर

औरंगाबादचे नाव बदल्याने हिंसा? : औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले, जे हिंसाचाराची ठिणगी असल्याचे मानले जाते. विशेषत: जेव्हा नेते महाराष्ट्रातील औरंगजेबाचे सर्व उल्लेख पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सरकारची चूक असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. नाव बदलण्याची योजना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकारने देखील आखली होती. मात्र, ते सत्तेवरुन हटल्यानंतर भाजप-शिवसेना सरकारने फेब्रुवारीमध्ये औरंगाबादचे नाव बदलण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर मे महिन्यात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

संभाजी महाराजांची हत्या : १६८० च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने दख्खनला वश करण्यासाठी मोहीम सुरू केली होती. हे औरंगजेबाचे जुने स्वप्न होते. औरंगजेबाने आपल्या सेनापतींच्या सल्ल्याविरुद्ध आपले दरबार औरंगाबादला हलवले होते. या काळात विजापूर, गोलकोंडा या राज्यांनी औरंगजेबापुढे शरणागती पत्करली होती. त्यानंतर 1689 मध्ये मुघल-मराठा संघर्षाचा सर्वात रक्तरंजित इतिहास घडला होता. शिवाजी माहाराजांचा मुलगा आणि उत्तराधिकारी छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी क्रूरपणे ठार मारले होते. त्यामुळे मराठा भाषिकांमध्ये असंतोष पसरला होता. तेव्हापासून हा वाद कायम सुरु आहे.

औरंगजेबाचा मृत्यू : औरंगजेब मृत्यू नंतर त्याची औरंगाबादजवळील खुलदाबाद येथे कबर बांधण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या नावावरुनच या शहराचे नाव औरंगाबाद ठेवण्यात आले होते. औरंगजेबाच्या दख्खन जिंकण्याच्या मोहिमेमुळे मुघल साम्राज्य कमकुवत झाले असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी म्हणतात की औरंगजेब हा या भागातील मुस्लिमांसाठी कधीही सांस्कृतिक किंवा धार्मिक व्यक्ती बनला नाही. मुस्लिमांच्या किंवा कधीही त्यांचा उदोउदो केलेला नाही. एखाद्याच्या फायद्यासाठी समाजाला भडकवण्याचा हा केवळ डाव आहे. औरंगजेबाशी संबंधित संदेशांवर इतक्या तीव्र प्रतिक्रिया येत असतील, तर नथुराम गोडसेच्या गौरवाबाबतही अशाच प्रतिक्रिया का येत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

औरंगजेबाच्या वादाचा घटनाक्रम :

6 जून 2023 : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या पोस्टर्सविरोधात बंदनंतर दगडफेक

७ जून : औरंगजेब आणि म्हैसूरचा शासक टिपू सुलतान यांचे कौतुक करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टविरोधात कोल्हापूर बंदला हिंसक वळण.

9 जून : औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या 14 वर्षीय मुलाच्या सोशल मीडिया संदेशाविरोधात बीडच्या आष्टी शहरात बंद.

10 जून : छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची सूचना केल्याप्रकरणी सोशल मीडिया वापरकर्त्यावर गुन्हा दाखल

11 जून : औरंगजेबाची प्रतिमा प्रोफाईल पिक्चर म्हणून वापरल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 29 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला.

12 जून : टिपू सुलतानवरील सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ कोल्हापुरातील कागल शहरात बंद पुकारण्यात आला.

12 जून : अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात एका 22 वर्षीय मुलाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला.

12 जून : विजापूरचा जनरल अफजलखानचा फोटो डीपीवर लावल्याप्रकरणी सांगलीतील एका अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 जून : औरंगजेबांच्या समाधीला प्रकाश आंबेडकरांची भेट

औरंगजेबाच्या समाधीला प्रकाश आंबेडकरांची भेट : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद तालुक्यात औरंगजेबांच्या समाधीवर पुष्प वाहिले. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या समाधीला प्रकाश आंबेडकरांच्या भेटीमुळे राज्यातील राजकारण तापणार चांगलेच आहे. जनतेच्या विश्वासामुळेच आपण इथे आलो, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतही वक्तव्य केले असून त्याचा परिणाम उद्धव ठाकरे गटाशी असलेल्या युतीवर होण्याची शक्यता आहे.

अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका : औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने शिवसेनेसोबतच्या जवळीकीवर परिणाम होईल का, असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली. राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडवण्याचे प्रयत्न झाले, त्या कोणी घडवल्या याचे उत्तर सर्वांनाच माहीत आहे. औरंगजेबाच्या दरबारात आम्ही कधी नोकरीलाही नव्हतो, तिथे जयचंद कोण होता? हे सर्वांना माहीत आहे. इंग्रजांच्या काळातही या जयचंदमुळे आम्हाला 200 वर्षे पारतंत्र्यात राहावे लागले, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेतल्याने वाद : शिवसेना आणि युतीवरही त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारखेच आहे. बाळासाहेबांना सत्तेसाठी जे काही करावे लागले ते केले, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. खुलताबाद तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेतले. खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरालाही त्यांनी भेट दिली. प्रकाश आंबेडकर हे शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील वंचित बहुजन आघाडीच्या सभेला हजेरी लावली. औरंगजेबाचा वाद काही दिवसांपासून सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनी समाधीचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही कबरेला भेट नाही. हा जनतेच्या श्रद्धेचा प्रश्न असून, सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा आपण आदर केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

हेही वाचा - Congress Criticizes Modi : मणिपूर हिंसाचारावर मौन बाळगल्याबद्दल काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.