ETV Bharat / state

Ambadas Danve Critics : दानवेंचे गुढीपाडव्यानिमित्त मोठे वक्तव्य; म्हणाले, ' येणाऱ्या वर्षात गद्दारांचे नाही..

छत्रपती संभाजीनगर येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुढीपाडवा साजरा केला. यानिमित्त त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. येणाऱ्या वर्षात गद्दारांचे नाही तर निष्ठावंताचे सरकार येऊ दे, अशी मनोकामना त्यांनी दानवेंनी व्यक्त केली आहे. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे देखील उपस्थित होते.

author img

By

Published : Mar 22, 2023, 3:44 PM IST

Ambadas Danve Critics
अंबादास दानवे
अंबादास दानवे माध्यमांसोबत संवाद साधताना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र नवीन वर्षाचे मोठा उत्साहात केले जात आहे. गुलमंडी भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाकरे गटाकडून सकाळी गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते यांनी येणाऱ्या वर्षात गद्दार मुक्त सरकार येऊ दे, अशी मनोकामना व्यक्त केली. तर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे, अशी इच्छा व्यक्त करत सरकारवर टीका केली.

निष्ठावंतांचे सरकार येऊ दे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाकरे गटाकडून जुन्या शहरात गुढी उभारत नवीन वर्षाची सुरुवात नागरिकांच्या साक्षीने करण्यात आली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली. नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने व्यक्त करत असून नागरिकांना चांगले सरकार मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तितकच नाही तर, राज्यातील इडा पिडा निघून जावो आणि बळीच राज्य येवो. हे सरकार व्यक्तिगत विकासामध्ये गुंतलेले आहे. यांना जनतेशी काही पडलेले नाही, हे वर्ष गद्दारी पासून मुक्त होऊन राज्यात निष्ठावंतांचे सरकार यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्ती केली.

संपूर्ण शिधा गद्दारांना : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढे म्हणाले की, अद्याप गरिबांसाठी जाहीर झालेली शिधा नागरिकांपर्यंत पोहचली नाही. हा सरकारच्या शिधा जनतेपर्यंत न पोहोचणे म्हणजे हा संपूर्ण शिधा 40 गद्दारांना जातो, त्यामुळे जनतेला मिळत नाही.

न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने : नवीन वर्षानिमित्त ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी नागरिकांना शुभेच्छा देत, न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागू दे, अशी मनोकामना व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. हिंदू नववर्षाला आता सुरुवात झाली, असून ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गुढी उभारत असून यावर्षी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संकल्प पूर्ण करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

खैरेंची सरकारवर टीका : चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले की, मंगळवारी मराठवाडा दौऱ्यावर असताना, आई तुळजाभवानीला प्रार्थना केली. न्यायालयात प्रार्थना करू शकत नाही म्हणून, देवाच्या चरणी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे, असे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सर्व स्तरातील लोक अडचणीत आहेत. शेतकरी व्यापारी अडचणींचा सामना करत आहे. मात्र, सरकारला त्याची काही घेणे देणे नाही. राज्यात कोरोनाची विषाणूच्या प्रसाराला पुन्हा सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात हा आजार पूर्णतः संपला होता. मात्र, आता लोकांचे आरोग्य देखील अडचणीत सापडल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त केली.

हेही वाचा : Mission Thackeray Failed: शिंदेंच्या आडून भाजपचे 'मिशन ठाकरे' फेल.. भाजपने पाठवले केंद्रीय नेतृत्वाला पत्र

अंबादास दानवे माध्यमांसोबत संवाद साधताना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र नवीन वर्षाचे मोठा उत्साहात केले जात आहे. गुलमंडी भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाकरे गटाकडून सकाळी गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते यांनी येणाऱ्या वर्षात गद्दार मुक्त सरकार येऊ दे, अशी मनोकामना व्यक्त केली. तर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे, अशी इच्छा व्यक्त करत सरकारवर टीका केली.

निष्ठावंतांचे सरकार येऊ दे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाकरे गटाकडून जुन्या शहरात गुढी उभारत नवीन वर्षाची सुरुवात नागरिकांच्या साक्षीने करण्यात आली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली. नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने व्यक्त करत असून नागरिकांना चांगले सरकार मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तितकच नाही तर, राज्यातील इडा पिडा निघून जावो आणि बळीच राज्य येवो. हे सरकार व्यक्तिगत विकासामध्ये गुंतलेले आहे. यांना जनतेशी काही पडलेले नाही, हे वर्ष गद्दारी पासून मुक्त होऊन राज्यात निष्ठावंतांचे सरकार यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्ती केली.

संपूर्ण शिधा गद्दारांना : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढे म्हणाले की, अद्याप गरिबांसाठी जाहीर झालेली शिधा नागरिकांपर्यंत पोहचली नाही. हा सरकारच्या शिधा जनतेपर्यंत न पोहोचणे म्हणजे हा संपूर्ण शिधा 40 गद्दारांना जातो, त्यामुळे जनतेला मिळत नाही.

न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने : नवीन वर्षानिमित्त ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी नागरिकांना शुभेच्छा देत, न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागू दे, अशी मनोकामना व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. हिंदू नववर्षाला आता सुरुवात झाली, असून ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गुढी उभारत असून यावर्षी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संकल्प पूर्ण करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

खैरेंची सरकारवर टीका : चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले की, मंगळवारी मराठवाडा दौऱ्यावर असताना, आई तुळजाभवानीला प्रार्थना केली. न्यायालयात प्रार्थना करू शकत नाही म्हणून, देवाच्या चरणी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे, असे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सर्व स्तरातील लोक अडचणीत आहेत. शेतकरी व्यापारी अडचणींचा सामना करत आहे. मात्र, सरकारला त्याची काही घेणे देणे नाही. राज्यात कोरोनाची विषाणूच्या प्रसाराला पुन्हा सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात हा आजार पूर्णतः संपला होता. मात्र, आता लोकांचे आरोग्य देखील अडचणीत सापडल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त केली.

हेही वाचा : Mission Thackeray Failed: शिंदेंच्या आडून भाजपचे 'मिशन ठाकरे' फेल.. भाजपने पाठवले केंद्रीय नेतृत्वाला पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.