ETV Bharat / state

कारगिलच्या चौक्या सोडणाऱ्यांवर कारवाई का नाही - प्रकाश आंबेडकर

author img

By

Published : Jul 28, 2019, 8:53 PM IST

देश कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. मात्र, कारगिलच्या चौक्या सोडणाऱ्या विरोधात कारवाई का केली नाही, असा संतप्त प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

अॅड. प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद - देश कारगील विजय दिवस साजरा करत आहे. मात्र, कारगिलच्या चौक्या सोडणाऱ्या विरोधात कारवाई का केली नाही, असा संतप्त प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. कारगिलमध्ये अतिरेक्यांनी कब्जा केला. त्यावेळी तिथे असलेल्या धनगर माणसाने माहिती दिली आणि नंतर कारगिल युद्ध झाले. आपण विजय मिळवला, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

कारगिलच्या चौक्या सोडणाऱ्यांवर कारवाई का नाही

औरंगाबादमध्ये बंजारा समाजाने मेळावा घेऊन आपला पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला जाहीर केला. यावेळी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बंजारा समाज बांधवांना मार्गदर्शन केले. काही मंडळी आग लावणारी आहेत. इतिहासात काय घडले हे त्यांना माहित नसते, पण निवडणुकीच्या काळातच आग लावली जाते. ५ वर्षे आपली सत्ता राखण्याचा प्रयत्न केला जातो, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.

समाज बदलला तर देशाची स्थिती सुधारेल. विधानसभेत चंग बांधला पाहिजे, की उच-नीच मानणार नाही, तरच वंचितांची सत्ता येणार आहे. बंजारा समाजाचा युवक आला तर स्पर्धक तयार होतील म्हणून क्रिमिलियर लावले आहे. आपला उद्धार आपणच करायचे असतो म्हणून बंजारा समाजाने चंग बांधला पाहिजे वंचितचा उमेदवार बंजारा समाज असो की इतर समाजाचा उमेदवार त्याला निवडूण दिले पाहिजे. ७० वर्षात अनेक मोर्चे आंदोलन झाली परभणीच्या विद्यापीठाला वसंतराव नाईकांचे नाव द्यावे, मी पण आंदोलनात होतो. सत्तेवर बसल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. वसंतराव नाईक महामंडळाला ५०० कोटींचा भांडवल द्यायचे असेल तर सत्तेत यावे लागेल. वंचित आघाडीचे तुम्हाला सत्तेत आणू शकते. असे वक्तव्य अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर कार्यक्रमात केले.

औरंगाबाद - देश कारगील विजय दिवस साजरा करत आहे. मात्र, कारगिलच्या चौक्या सोडणाऱ्या विरोधात कारवाई का केली नाही, असा संतप्त प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. कारगिलमध्ये अतिरेक्यांनी कब्जा केला. त्यावेळी तिथे असलेल्या धनगर माणसाने माहिती दिली आणि नंतर कारगिल युद्ध झाले. आपण विजय मिळवला, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

कारगिलच्या चौक्या सोडणाऱ्यांवर कारवाई का नाही

औरंगाबादमध्ये बंजारा समाजाने मेळावा घेऊन आपला पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला जाहीर केला. यावेळी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बंजारा समाज बांधवांना मार्गदर्शन केले. काही मंडळी आग लावणारी आहेत. इतिहासात काय घडले हे त्यांना माहित नसते, पण निवडणुकीच्या काळातच आग लावली जाते. ५ वर्षे आपली सत्ता राखण्याचा प्रयत्न केला जातो, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.

समाज बदलला तर देशाची स्थिती सुधारेल. विधानसभेत चंग बांधला पाहिजे, की उच-नीच मानणार नाही, तरच वंचितांची सत्ता येणार आहे. बंजारा समाजाचा युवक आला तर स्पर्धक तयार होतील म्हणून क्रिमिलियर लावले आहे. आपला उद्धार आपणच करायचे असतो म्हणून बंजारा समाजाने चंग बांधला पाहिजे वंचितचा उमेदवार बंजारा समाज असो की इतर समाजाचा उमेदवार त्याला निवडूण दिले पाहिजे. ७० वर्षात अनेक मोर्चे आंदोलन झाली परभणीच्या विद्यापीठाला वसंतराव नाईकांचे नाव द्यावे, मी पण आंदोलनात होतो. सत्तेवर बसल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. वसंतराव नाईक महामंडळाला ५०० कोटींचा भांडवल द्यायचे असेल तर सत्तेत यावे लागेल. वंचित आघाडीचे तुम्हाला सत्तेत आणू शकते. असे वक्तव्य अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर कार्यक्रमात केले.

Intro:कारगिल विजय दिवस साजरा करताय मात्र कारगिलच्या चौक्या सोडणार्याच्या विरोधात कारवाई का केली नाही. असा संतप्त प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. कारगिलमध्ये अतिरेक्यांनी कब्जा केला त्यावेळी तिथे असलेल्या धनगर माणसाने माहिती दिली. आणि नंतर कारगिल युद्ध झालं आणि आपण विजय मिळवला अस देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. Body:मोदी जिथे जिथे राष्ट्रभक्ती दाखवतात, तो दिखावा आहे. पाकिस्तान कंगाल झालाय, पंतप्रधान म्हणाले होते की पाकिस्तानला संपवू, तर संपवा ना कोणी थांबवलं, गल्लीत झालेल्या भांडणात हुल देतात तशी मोदी हुल देत आहेत. थापेबाजांना थांबवण्याच काम वंचितला करायचं आहे. अस देखील प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबाद येथे झालेल्या बंजारा समाज मेळाव्यात सांगितलं.
Conclusion:ट्रिपल तलाख बाबत कायदा केला जातोय, मात्र इतर समाजातील विधुर स्त्रीयायांबाबत काय, पंतप्रधानांनी लग्न केलं मात्र नानंदवल नाही त्याबद्दल काय. असा प्रश्न देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. औरंगाबाद मध्ये बंजारा समाजाने मेळावा घेऊन आपला पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला जाहीर केला. यावेळी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बंजारा समाज बांधवांना मार्गदर्शन केलं. काही मंडळी आग लावणारी आहेत, इतिहासात काय घडलं माहीत नाही पण निवडणुकीच्या काळातच आग लावली जाते, आणि पाच वर्षे आपली सत्ता राखण्याचा प्रयत्न केला जातो. असा टोला आंबेडकर यांनी लावला. समाज बदलला तर देशाची स्थिती सुधारेल. विधानसभेत चंग बांधला पाहिजे, की उच-नीच मानणार नाही, तरच वंचितांची सत्ता येणार आहे. बंजारा समाजाचा युवक आला तर स्पर्धक तयार होती म्हणून क्रिमिलियर लावलंय. आपला उद्धार आपणच करायचं असतो म्हणून बंजारा समाजाने चंग बांधला पाहिजे वंचितचा उमेदवार बंजारा समाज असो की इतर समाजाचा उमेदवार त्याला निवडणून दिल पाहिजे. 70 वर्षात अनेक मोर्चे आंदोलन झाली परभणीच्या विद्यापीठाला वसंतराव नाईकांचे नाव द्यावं मी पण आंदोलनात होतो, सत्तेवर बसल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाही. वसंतराव नाईक महामंडळाला 500 कोटींचा भांडवल द्यायचं असेल तर सत्तेत यावं लागेल. वंचित आघाडीचे तुम्हाला सत्तेत आणू शकते. अस वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर कार्यक्रमात केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.