ETV Bharat / state

दहा वर्षांपासून रुढी परंपरेला फाटा; महिला-मुलांनी स्मशानभूमीत घेतला फराळाचा आनंद

जगाला मानवतेची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर आपल्या प्रबोधनातून अंधश्रद्धेसारख्या अनिष्ट रूढींवर प्रहार केला. शेतकऱ्यांना अर्पण केलेल्या ग्रामगीता ग्रंथातूनही त्यांनी जगाला तोच संदेश दिला. तरीही आज २१ व्या शतकात महिला स्मशानभूमीत जात नाहीत.

author img

By

Published : Apr 28, 2019, 5:12 PM IST

Updated : Apr 29, 2019, 12:05 AM IST

दहा वर्षांपासून रुढी परंपरेला फाटा; महिला-मुलांनी स्मशानभूमीत घेतला जेवणाचा आनंद

अमरावती - जगाला मानवतेची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर आपल्या प्रबोधनातून अंधश्रद्धेसारख्या अनिष्ट रूढींवर प्रहार केला. शेतकऱ्यांना अर्पण केलेल्या ग्रामगीता ग्रंथातूनही त्यांनी जगाला तोच संदेश दिला. तरीही आज २१ व्या शतकात महिला स्मशानभूमीत जात नाहीत. त्यांच्या मनात वेगवेगळ्या अंधश्रद्धेने घर केले आहे. मात्र, या सर्व रूढी परंपरेला अमरावती जिल्ह्यातील संत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले यावली शहीद हे गाव अपवाद ठरत आहे. या गावातील महिला वर्षातून एकदा या स्मशानभूमीत कार्यक्रमाचे आयोजन करतात.

येथे मुली स्मशानभूमीचा रस्ता रांगोळी काढून सजवतात. हे अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या महिलांनी आदर्श घ्यावा, असे दृश्य आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या यावली शहिद या गावात तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती मोहत्सव सुरू आहे. स्मशानभूमी बद्दल महिलांच्या मनातील भय दूर व्हावे, स्मशानभूमी हे एक पवित्र मंदिर आहे, हे लोकांना समजावे, म्हणून या स्मशान भूमीत हा कार्यक्रम घेतला जातो. २००९ मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली होती. यावर्षी या उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. गावात दैनदिन सामुदायिक ध्यान आटोपल्यानंतर हजारो महिला व पुरुष स्मशानभूमीकडे येतात.

दहा वर्षांपासून रुढी परंपरेला फाटा; महिला-मुलांनी स्मशानभूमीत घेतला फराळाचा आनंद

या गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान ते मोक्षधामचा जवळपास २ किलोमीटर रस्ता हा सुंदर रांगोळीने सजवला जातो. सकाळी साडेसहा वाजता महिला व लहान मुले तुकडोजी महाराजांचा जयघोष करत स्मशानभूमीपर्यंत येतात. येथे महिला-महिला भजन-किर्तन करतात. त्यानंतर महिला-मुलांनी नाश्ता केला.

स्मशानभूमी म्हटले, की विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र, यावली शहीद गावातील स्मशाभूमीत निसर्गरम्य वातावरण आहे. येथे संत महात्म्यांच्या २५ मूर्तींची स्थापनाही करण्यात आली आहे.

अमरावती - जगाला मानवतेची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर आपल्या प्रबोधनातून अंधश्रद्धेसारख्या अनिष्ट रूढींवर प्रहार केला. शेतकऱ्यांना अर्पण केलेल्या ग्रामगीता ग्रंथातूनही त्यांनी जगाला तोच संदेश दिला. तरीही आज २१ व्या शतकात महिला स्मशानभूमीत जात नाहीत. त्यांच्या मनात वेगवेगळ्या अंधश्रद्धेने घर केले आहे. मात्र, या सर्व रूढी परंपरेला अमरावती जिल्ह्यातील संत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले यावली शहीद हे गाव अपवाद ठरत आहे. या गावातील महिला वर्षातून एकदा या स्मशानभूमीत कार्यक्रमाचे आयोजन करतात.

येथे मुली स्मशानभूमीचा रस्ता रांगोळी काढून सजवतात. हे अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या महिलांनी आदर्श घ्यावा, असे दृश्य आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या यावली शहिद या गावात तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती मोहत्सव सुरू आहे. स्मशानभूमी बद्दल महिलांच्या मनातील भय दूर व्हावे, स्मशानभूमी हे एक पवित्र मंदिर आहे, हे लोकांना समजावे, म्हणून या स्मशान भूमीत हा कार्यक्रम घेतला जातो. २००९ मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली होती. यावर्षी या उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. गावात दैनदिन सामुदायिक ध्यान आटोपल्यानंतर हजारो महिला व पुरुष स्मशानभूमीकडे येतात.

दहा वर्षांपासून रुढी परंपरेला फाटा; महिला-मुलांनी स्मशानभूमीत घेतला फराळाचा आनंद

या गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान ते मोक्षधामचा जवळपास २ किलोमीटर रस्ता हा सुंदर रांगोळीने सजवला जातो. सकाळी साडेसहा वाजता महिला व लहान मुले तुकडोजी महाराजांचा जयघोष करत स्मशानभूमीपर्यंत येतात. येथे महिला-महिला भजन-किर्तन करतात. त्यानंतर महिला-मुलांनी नाश्ता केला.

स्मशानभूमी म्हटले, की विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र, यावली शहीद गावातील स्मशाभूमीत निसर्गरम्य वातावरण आहे. येथे संत महात्म्यांच्या २५ मूर्तींची स्थापनाही करण्यात आली आहे.

Intro:तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत अमरावतीच्या यावलीतील स्मशान भूमित हजारो 10 वर्षांपासून भरतो महिलांचा मेळा.

अंधश्रद्धेला फाटा देण्यासाठी दहा वर्षपुर्वी सुरू केला उपक्रम.
------------------------------------------7 प7पी।ल पमरावती अँकर

अखिल विश्वाला मानवतेची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर आपल्या प्रबोधनातून अंधश्रध्दा सारख्या अनिरुद्ध रूढीवर प्रहार केला.शेतकऱ्यांला अर्पण केलेल्या ग्रामगीता ग्रँथातूनही त्यांनी जगाला तोच संदेश दिला.स्मशान भूमी म्हणजे मानवाच्या मृत्यूनंतर जिथे त्याच्यावर अंतिम अंत्यसंस्कार होते ते स्थळ, 21 व्या शतकातही महिला आज स्मशानभूमीत जात नाही वेगवेगळ्या शंका ,अंधश्रद्धानी त्यांच्या
मनात कायमचे घर केले आहे.परन्तु या सर्व रूढी परंपराना अपवाद ठरतंय ते अमरावती जिल्ह्यातील संत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेलं यावली शहीद हे गाव याच गावातील हजारो महिला वर्षातून एकदा याच स्मशानभूमीत जाऊन एक सोहळा साजरा करतात पाहूया विशेष रिपोर्ट.

VO-1
मंडळी या मुली जिथे रांगोळी काढून रस्ता सजवत आहे ना तो रस्ता कुठल्या घराचा नाही,मंगल कार्यालयाचाही नाही,कुठल्या कार्यक्रमाची सजावट पण नाही,आणि कुण्या नेत्याच्या स्वागता साठी नाही ,आता तूम्ही म्हणाल मग ही रांगोळी का व कुठे काढली जात आहे .आता कान देऊन ऐका ही रांगोळी आणि साफसफाई चालू आहे स्मशानभूमीत हो हे अगदी खरं आहे.येथे दरवर्षी याच दिवशीं मोठा सोहळा राहतो.अंधश्रद्धा च्या विळख्यात पडलेल्या महिलांनी आदर्श घ्यावा ही अशी दृश्य आहे.अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी याच कर्मभूमीत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती मोहत्सव सुरू आहे.स्मशानभूमी बद्दल महिलांच्या मनातील भय दूर व्हावं स्मशान भूमीही एक पवित्र मंदिर आहे .हे लोकांना कळाव म्हणून या स्मशान भूमीत हा कार्यक्रम घेतला जातो.2009 मध्ये या उपक्रमाची सुरवात झाली होती .यावर्षी या उपक्रमाला 10 वर्ष झाले. स्मशानभूमीत महिला येण्यापूर्वी गावात दैनदिन सामुदायिक ध्यान आटोपल्या नंतर हजारो महिलांची व पुरुषांची रामधूनची कूच स्मशानभूमी कडे होते.

बाईट-मंदा घोरपडे-ग्रामस्थ

जवळपास दोन किलोमीटर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान ते मोक्षधाम चा रस्ता सुंदर अशा रांगोळी ने सजविल्या जाते.सकाळी साडे सहा वाजता हजारो महिला लहान मुले तुकडोजी महाराज यांचा जयघोष करीत मोक्षधाम अर्थात स्मशान भूमी पर्यंत येतात. येथे आल्यावर हजारो महिला भजन किर्तन करतात. त्यानंतर त्यांना नाश्त्याची व्यवस्था केली जाते. स्मशान भूमी म्हटलं की विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळते परन्तु येथे एक निसर्गरम्य वातावरण आहे.संत महात्म्यांच्या 25 मूर्तींची स्थापनाही येथे केली आहे.

बाईट-2 मंदा जेवने-ग्रामस्थ

महिलांना स्मशान भूमी बद्दल असलेली भीती व स्मशान भूमीही एक पावित्र्य ठिकाण आहे हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविला जातोBody:अमरावतीConclusion:अकरावती
Last Updated : Apr 29, 2019, 12:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.