ETV Bharat / state

अमरावतीत बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू वरांनी केले वृक्षरोपण, वऱ्हाडी मंडळींना वाटले दोन हजार वृक्ष

author img

By

Published : Jul 28, 2019, 12:54 PM IST

विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना कपडे किंवा इतर कोणती भेटवस्तू न देता, वृक्षभेट देण्याचा निर्णय प्रशांत कांबळे व कविता बनसोड या वधू-वरांनी घेतला. या निमित्त त्यांनी आलेल्या पाहुण्यांना दोन हजार वृक्ष भेट दिले. तसेच विवाहबंधनात अडकण्यापुर्वी नवदांपत्यांनी वृक्षारोपण केले.

वृक्षरोपण करतांना वधू-वर

अमरावती - विवाह सोहळा म्हणजे आयुष्यातील एक महत्वाचा आनंदाचा क्षण. हा सोहळा अविस्मरणीय व्हावा अशी प्रत्येक वधू - वराची ईच्छा असते. यात अनेक वधू - वर या लग्न सोहळ्यातून सामाजिक उपक्रम राबवतांना दिसत असतात. असाच एक सामाजिक उपक्रम अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव मोझरी येथील एका तरुणाने आपल्या विवाहात राबवला आहे.

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू वरांनी केले वृक्षरोपण, मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा


वृक्षतोड,अपुऱ्या प्रमाणात वृक्षलागवड यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो आहे. यामुळे वातावरणात अनेक बदल होत असून पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. या गोष्टीची दखल घेत, विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना कपडे किंवा इतर कोणती भेटवस्तू न देता, वृक्षभेट देण्याचा निर्णय प्रशांत कांबळे व कविता बनसोड या वधू- वरांनी घेतला. या निमित्त त्यांनी आलेल्या पाहुण्यांना दोन हजार वृक्ष भेट दिले. तसेच विवाहबंधनात अडकण्यापुर्वी नवदांपत्यांनी वृक्षारोपण केले.


यावेळी या विवाह सोहळ्याला उपस्थीत काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अरुण अडसड, प्रताप अडसर यांनी देखील वृक्षारोपण केले.

अमरावती - विवाह सोहळा म्हणजे आयुष्यातील एक महत्वाचा आनंदाचा क्षण. हा सोहळा अविस्मरणीय व्हावा अशी प्रत्येक वधू - वराची ईच्छा असते. यात अनेक वधू - वर या लग्न सोहळ्यातून सामाजिक उपक्रम राबवतांना दिसत असतात. असाच एक सामाजिक उपक्रम अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव मोझरी येथील एका तरुणाने आपल्या विवाहात राबवला आहे.

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू वरांनी केले वृक्षरोपण, मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा


वृक्षतोड,अपुऱ्या प्रमाणात वृक्षलागवड यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो आहे. यामुळे वातावरणात अनेक बदल होत असून पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. या गोष्टीची दखल घेत, विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना कपडे किंवा इतर कोणती भेटवस्तू न देता, वृक्षभेट देण्याचा निर्णय प्रशांत कांबळे व कविता बनसोड या वधू- वरांनी घेतला. या निमित्त त्यांनी आलेल्या पाहुण्यांना दोन हजार वृक्ष भेट दिले. तसेच विवाहबंधनात अडकण्यापुर्वी नवदांपत्यांनी वृक्षारोपण केले.


यावेळी या विवाह सोहळ्याला उपस्थीत काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अरुण अडसड, प्रताप अडसर यांनी देखील वृक्षारोपण केले.

Intro:स्पेशल स्टोरी

अमरावतीत बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू वरांनी केले वृक्षरोपन, वऱ्हाडी मंडळींना वाटले दोन हजार वृक्षांची भेट


अमरावती अँकर/स्पेशल स्टोरी
आयुष्यात लग्नाला सर्वाधिक महत्व असते.प्रत्येक जण आपआपल्या पध्दतीने विवाह सोहळा साजरा करतो. अनेकाना वाटत की आपला विवाह इतरांच्या ही कायम आठवणीत राहावा .यासाठी अनेक वर वधू सामाजिक उपक्रम लग्नात राबवतात .असाच एक चांगला आणि निसर्गाचा समतोल राखणारा उपक्रम अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव मोझरी येथील एका तरुणाने आपल्या विवाहात राबवला पाहूया एक रिपोर्ट.

Vo-हातात झाड घेऊन उभे असलेले हे आहे प्रशांत कांबळे व कविता बनसोड या दाम्पत्यची निसर्गाशी असलेली मैत्री आणि दिवसान दिवस वातावरणात होणारे बदल त्यामुळे तापमान वाढ होत आहे.अशा विविध समस्यावर मात करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या विवाह मंडपात जाण्यापूर्वी वृक्ष लागवड केली नंतरच एकमेकांच्या विवाह बंधनात अडकले.

बाईट-नववधून -कविता बनसोड

लग्न म्हटल की आहेर ,कपडे ,मोठमोठ्या भेटवस्तू विवाहात दिल्या जातात परन्तु त्याच्या बदलीत नवरदेव व नवरी कडून सुद्धा कपडे हे दिल्या जाते परन्तु यांच्याही पलीकडे जाऊन या वराने येणाऱ्या प्रत्येक वऱ्हाडी ला एक वृक्ष भेट म्हणून दिले जवळपास दोन हजार वृक्ष हे वऱ्हाडी ला भेट देण्यात आले.या विवाहात सहभागी होऊन काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आ यशोमती ठाकूर,आमदार अरुण अडसड ,नागरड प्रताप अडसर यांनी सुद्धा वृक्षारोपण केले.

बाईट-आ.यशोमती ठाकूर
बाईट-प्रताप अडसड

प्रशांत आणि कविताने आपल्या विवाहात राबवलेला उपक्रम हा नकीच कौतुकास्पद आहे.प्रत्येक वधू वराने असे उपक्रम राबविल्यास वातावरणात झालेले बदल थांबविण्यासाठी मदत होईल.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.